शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

कार्लसनकडे १ गुणाची आघाडी; आनंदचे पारडे मानसिकदृष्ट्या वरचढ

By admin | Updated: November 21, 2014 00:27 IST

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतला आजचा ९वा विजय अवघ्या २० चालीत बरोबरीत सुटला आणि जगभरातल्या बुद्धीबळ खेळाडूंकडून, अभ्यासकांकडून, प्रेक्षकांकडून आश्चर्याच्या प्रतिक्रिया उमटल्या

जयंत गोखले,जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतला आजचा ९वा विजय अवघ्या २० चालीत बरोबरीत सुटला आणि जगभरातल्या बुद्धीबळ खेळाडूंकडून, अभ्यासकांकडून, प्रेक्षकांकडून आश्चर्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. गेल्या अनेक वर्षातल्या जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धा विलक्षण अटीतटीने लढल्या जातायत. प्रत्येक डावागणिक ही चुरस वाढत जाताना आढळून आलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे अत्यंत मर्यादित असलेली डावांची संख्या. अवघ्या १२ डावांच्या मालिकेत जेव्हा प्रत्येक खेळाडूला फक्त सहा वेळा पांढरी मोहरी मिळणार असतात तेव्हा त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याकडेच दोन्ही खेळाडूंचा कल असतो.तमाम बुद्धीबळ विश्वात सर्वाधिक लांबलेल्या अनातोली कार्पोव्ह विरुद्ध गॅरी कास्पारोव्ह यांच्यातल्या १९८४ सालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अशाा कमी चालीत बरोबरी होत होत्या. सलग १७ सामने बरोबरीत सुटले होते आणि तेदेखील ३० खेळ्या होतायत न होतायत त्यातच!या पार्श्वभूमीवर आजच्या बरोबरीमुळे वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे, लढवय्या कार्लसननी पांढरी मोहरी असून आनंदला २० खेळ्यांतच कसे मोकळे सोडले? कार्लसन थकला असेल का? का कार्लसनला आनंदच्या तयारीचे दडपण आले होते का? असे एक ना अनेक तर्क मांडले जातायत.आनंदची तयारी अफलातून होती यात काही संशयच नाही. आनंदच्या ११ पासून १४ पर्यंतच्या चारही खेळ्या या कार्लसनसाठी नवीन होत्या आणि आनंदनी ज्या झपाट्याने त्या खेळला त्यावरून त्याचा आत्मविश्वास कार्लसनला धडकी भरवून गेला असेल असं वाटतंय. कारण, कार्लसनने भरपूर विचार करून सरळ सरळ बरोबरीचीच योजना आखली आणि आनंदच्या तयारीपुढे नमते घेतले. २० व्या चालीला बरोबरी मान्य केली तेव्हा आनंदच्या घड्याळात कार्लसनपेक्षा ५० मिनिटे जास्त होती!आता शेवटचे तीन डाव उरलेत आणि त्यातल्या दोन डावांत आनंदला पांढरी मोहरी आहेत... त्या एका दुर्दैवी पराभवानंतर आनंदने स्वत:ला कमालीचे सावरले आहे आणि प्रत्येक डावागणिक त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे.फक्त एक विजय, बाज....!