शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कार्लसनकडे १ गुणाची आघाडी; आनंदचे पारडे मानसिकदृष्ट्या वरचढ

By admin | Updated: November 21, 2014 00:27 IST

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतला आजचा ९वा विजय अवघ्या २० चालीत बरोबरीत सुटला आणि जगभरातल्या बुद्धीबळ खेळाडूंकडून, अभ्यासकांकडून, प्रेक्षकांकडून आश्चर्याच्या प्रतिक्रिया उमटल्या

जयंत गोखले,जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतला आजचा ९वा विजय अवघ्या २० चालीत बरोबरीत सुटला आणि जगभरातल्या बुद्धीबळ खेळाडूंकडून, अभ्यासकांकडून, प्रेक्षकांकडून आश्चर्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. गेल्या अनेक वर्षातल्या जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धा विलक्षण अटीतटीने लढल्या जातायत. प्रत्येक डावागणिक ही चुरस वाढत जाताना आढळून आलेली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे अत्यंत मर्यादित असलेली डावांची संख्या. अवघ्या १२ डावांच्या मालिकेत जेव्हा प्रत्येक खेळाडूला फक्त सहा वेळा पांढरी मोहरी मिळणार असतात तेव्हा त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेण्याकडेच दोन्ही खेळाडूंचा कल असतो.तमाम बुद्धीबळ विश्वात सर्वाधिक लांबलेल्या अनातोली कार्पोव्ह विरुद्ध गॅरी कास्पारोव्ह यांच्यातल्या १९८४ सालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अशाा कमी चालीत बरोबरी होत होत्या. सलग १७ सामने बरोबरीत सुटले होते आणि तेदेखील ३० खेळ्या होतायत न होतायत त्यातच!या पार्श्वभूमीवर आजच्या बरोबरीमुळे वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे, लढवय्या कार्लसननी पांढरी मोहरी असून आनंदला २० खेळ्यांतच कसे मोकळे सोडले? कार्लसन थकला असेल का? का कार्लसनला आनंदच्या तयारीचे दडपण आले होते का? असे एक ना अनेक तर्क मांडले जातायत.आनंदची तयारी अफलातून होती यात काही संशयच नाही. आनंदच्या ११ पासून १४ पर्यंतच्या चारही खेळ्या या कार्लसनसाठी नवीन होत्या आणि आनंदनी ज्या झपाट्याने त्या खेळला त्यावरून त्याचा आत्मविश्वास कार्लसनला धडकी भरवून गेला असेल असं वाटतंय. कारण, कार्लसनने भरपूर विचार करून सरळ सरळ बरोबरीचीच योजना आखली आणि आनंदच्या तयारीपुढे नमते घेतले. २० व्या चालीला बरोबरी मान्य केली तेव्हा आनंदच्या घड्याळात कार्लसनपेक्षा ५० मिनिटे जास्त होती!आता शेवटचे तीन डाव उरलेत आणि त्यातल्या दोन डावांत आनंदला पांढरी मोहरी आहेत... त्या एका दुर्दैवी पराभवानंतर आनंदने स्वत:ला कमालीचे सावरले आहे आणि प्रत्येक डावागणिक त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे.फक्त एक विजय, बाज....!