शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
3
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
4
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
5
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
6
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
7
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
8
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
9
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
10
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
11
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
12
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
13
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
14
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
15
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
16
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
17
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
18
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
19
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
20
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...

आॅस्ट्रेलियाची भारत दौऱ्याची तयारी दुबईत

By admin | Updated: January 3, 2017 00:48 IST

अलीकडच्या कालावधीतील भारताची चमकदार कामगिरी बघितल्यानंतर आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी कंबर कसली आहे

सिडनी : अलीकडच्या कालावधीतील भारताची चमकदार कामगिरी बघितल्यानंतर आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी कंबर कसली आहे. आॅस्ट्रेलियाने भारत दौऱ्याच्या तयारीसाठी दुबईमध्ये उपखंडातील खेळपट्ट्यांवर सराव करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून भारताने सलग पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत. भारताने अलीकडेच वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांविरुद्ध मोठ्या फरकाने मालिका जिंकल्या आहेत. भारतात खेळल्या गेलेल्या आठ कसोटी सामन्यांपैकी विराटच्या नेतृत्वाखाली भारताने सात सामन्यांत विजय मिळविला आहे.

आॅस्ट्रेलियासाठी भारतात कसोटी विजय मिळविणे कठीण ठरले आहे. आॅस्ट्रेलियाला २००४ पासून भारतात एकही कसोटी सामना जिंंकता आलेला नाही. २०१३ च्या भारत दौऱ्यात त्यांना चार कसोटी सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आॅस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या दुबई येथील अकादमीमध्ये शिबिर आयोजित करण्यास इच्छुक आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे हाय परफॉरमन्स मॅनेजर पॅट होवर्ड म्हणाले, ‘भारतात प्रत्येक ठिकाणी परिस्थिती समान नसते. आयसीसीने अलीकडच्या कालावधीत चांगले कार्य केले आहे. त्यांनी विविध शहरांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. त्यामुळे तेथे केवळ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्याच नाही तर विविध प्रकारच्या खेळपट्ट्या उपलब्ध आहेत. आम्हाला कुठल्या परिस्थितीला सामोरे जायचे आहे, त्याची नक्कल करता येणार नाही, पण केवळ परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करता येईल. ’

आॅस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध मंगळवारपासून सिडनीमध्ये प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठी संघाची निवड करताना भारताविरुद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेवर लक्ष ठेवून केली आहे. या संघात नॅथन लियोन व स्टीव्ह ओ किफे अशा दोन फिरकीपटूंचा समावेश आहे. तिसरा फिरकीपटू एस्टन एगर १३ सदस्यांच्या संघाचा सदस्य होता, पण त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळवता आले नाही. भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान पहिला कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये खेळला जाणार आहे. इंग्लंडकडून प्रेरणादुबईमध्ये सराव करण्यासाठी आॅस्ट्रेलियाने निश्चितपणे इंग्लंडकडून प्रेरणा घेतली असेल. त्यांनी २०१२ मध्ये भारत दौऱ्यापूवी दुबईमध्ये सराव केला होता. त्यावेळी इंग्लंडने २-१ ने मालिका जिंकली होती. त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजने गेल्या वर्षी भारतात विश्व टी-२० स्पर्धेत जेतेपद पटकावण्यापूर्वी आयसीसीच्या अकादमीमध्ये वेळ घालविला होता.