शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

कर्नाळा अभयारण्यात पक्षी, प्राण्यांवर पाणीसंकट

By admin | Updated: May 10, 2016 02:10 IST

राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. या दुष्काळाचा फटका पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यालादेखील बसल्याचे दिसून येत आहे

पनवेल : राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. या दुष्काळाचा फटका पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यालादेखील बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अभयारण्याला पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींसह परिसरातील ग्रामस्थांनी वन खात्याकडे जुन्या पाण्याच्या तलाव स्रोतांचा गाळ काढून पुनरुज्जीवित करण्याची मागणी केली आहे. पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्यात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. त्याचप्रमाणे मोर, लांडोर, माकडे, रानडुकरे, ससे, हरणे व नुकतेच दर्शन झालेले बिबटे व इतर निशाचर प्राणी यांचे वास्तव्य आहे. यातील सुमारे ४ चौरस कि. मी.च्या परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. मुंबईपासून ६२ कि. मी. अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे, कल्हं, रानसई-चिचवण गावाच्या पंचक्रोशीत हे अभयारण्य वसलेले आहे. या ठिकाणी आपण केव्हाही गेलात तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी आढळतात. अगदी परदेशी पर्यटकांनादेखील या अभयरण्याच्या प्रेमात आहेत. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकिळा, फ्लाय कॅचर, भरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शहीन ससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी येथे आढळतात. अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळतात. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण यांचे प्रमाण जास्त आहे तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भेकरे, रानमांजर, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आझळतात. हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असून ते मुंबईपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. हे महाराष्ट्रीतील पहिले पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा येथे निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असून, येथे १५० जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी, ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात. मात्र आज या अभयारण्यातील पक्षी आणि प्राण्यांनादेखील दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथे देखील पाण्याचे दुर्भिक्ष दिसून येते. कर्नाळा अभयारण्यात दोन मोठे तलाव आहेत. यापैकी एक तलाव जरी सुकलेला असला तरी एका तलावमध्ये काही प्रमाणात पाणी असल्याचे चित्र दिसत आहे. या तलावातील गाळ काढल्यास या तलावापासून पशु-पक्ष्यांची तहान भागू शकते. परंतु वन अधिकाऱ्यांचे वेगळेच नियाजन या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. तलावांचे खोलीकरण करण्यापेक्षा नवीन तलाव खोदण्याचे काम सुरू केले आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत ही कामे केली जात आहेत. या कामामुळे जुने तलावेही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग या ठिकाणी चालू असल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्या शाखप्रमुखांकडून होत आहे.