शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्या शाळेची ‘वाट’ दलदलीची

By admin | Updated: September 30, 2015 00:03 IST

आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा असे सल्ले केडीएमसी प्रशासन नागरीकांना देत असले तरी स्वत:च्या शाळांच्या भोवतालच्या परिस्थितीकडे त्यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.

प्रशांत माने, कल्याणआपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा असे सल्ले केडीएमसी प्रशासन नागरीकांना देत असले तरी स्वत:च्या शाळांच्या भोवतालच्या परिस्थितीकडे त्यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. येथील पश्चिमेकडील मोहने-गाळेगाव परिसरातील पं. दिनदयाळ उपाध्याय शाळेच्या भोवताली सांडपाण्याने दलदल माजल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.हिंदी माध्यमाच्या या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. सद्यस्थितीला विद्यार्थी पटसंख्या १३५ इतकी आहे. याआधी ती १५१ च्या आसपास होती. परंतु, शाळेपासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर हिंदी माध्यमाची खाजगी शाळा आहे. त्याचा फटका या शाळेला बसल्याचे घटत्या पटसंख्येवरून दिसते. बालवाडीत १५ मुले असून अन्य इयत्ताचा आढावा घेता पहिलीत ९, दुसरीत १३, तिसरीमध्ये २२, चौथीत २४, पाचवीत २६, सहावीमध्ये १५ तर सातवीत २६ विद्यार्थी आहेत. याठिकाणी सहा शिक्षक कार्यरतआहेत. समुह साधन केंद्र असलेल्या या शाळेच्या अखत्यारीत प्राथमिक ९ तर माध्यमिक २ अशा ११ शाळा आहेत. १९७४ सालची शाळेची स्थापना आहे. परंतु, १९९४ मध्ये जिल्हा परिषदेकडून ताबा मिळाल्यानंतर केडीएमसी शिक्षण मंडळाने तिचे नुतनीकरण केले. सद्यस्थितीला छतावरील पत्र्यांमधून पाण्याची गळती लागल्याने याठिकाणी डागडुजीची आवश्यकता भासत आहे. शैक्षणिकसाहित्यांमध्ये गणवेश आणि बूट आजच्या घडीलाही मिळालेले नाहीत. दोन संगणक आहेत. परंतु,ते नादुरूस्त आहेत. शालेय पोषण आहार नियमितपणे मिळत आहे. तसेच मुलामुलींसाठी प्रसाधनगृहाची स्वतंत्र सुविधा आहे. दरम्यान शाळेच्या भोवतालची परिस्थिती चांगली नाही. परिसरात असलेल्या घरांचे सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याने शाळेच्या समोरच दलदल माजली आहे. यातून विद्यार्थ्यांना शाळेची वाट धरावी लागत आहे. काही वेळेस पर्यायी रस्त्याचादेखील आधार घेतला जात आहे. महापालिकांच्या शाळांमध्ये सहसा गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. एकंदरीतच ही परिस्थिती पाहता ‘गरीबाला कोणी वाली नाही’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.