शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
2
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
3
'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क हॉगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
4
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
5
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
6
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
7
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
8
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
9
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
10
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
11
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
12
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
13
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी
14
धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा! कृषी विभागाची 'ती' खरेदी नियमानुसारच झाल्याचा निर्णय
15
मक्का मशीद आणि अजमेर ब्लास्ट प्रकरणात का केले नाही अपील? सरकारवर एवढे का भडकले ओवेसी?
16
आता भगतसिंगगिरी सुरु, कुठल्याही क्षणी मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू; बच्चू कडूंचा सरकारला इशारा
17
अंड्यामुळे ८० विद्यार्थ्यांनी दिली शाळा सोडायची धमकी, अखेर मंत्र्यांना बोलवावी लागली बैठक
18
Shravan 2025: 'ऋतू हिरवा, ऋतू बरवा' यांसारख्या पावसाळी गीतांनी द्या श्रावण मासाच्या शुभेच्छा
19
"ओंकारने हास्यजत्रा सोडल्यानंतर मी एकटा पडलो...", असं का म्हणाला गौरव मोरे?
20
भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; PM मोदींनी सांगितले फायदे, म्हणाले...

त्यांच्या शाळेची ‘वाट’ दलदलीची

By admin | Updated: September 30, 2015 00:03 IST

आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा असे सल्ले केडीएमसी प्रशासन नागरीकांना देत असले तरी स्वत:च्या शाळांच्या भोवतालच्या परिस्थितीकडे त्यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.

प्रशांत माने, कल्याणआपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा असे सल्ले केडीएमसी प्रशासन नागरीकांना देत असले तरी स्वत:च्या शाळांच्या भोवतालच्या परिस्थितीकडे त्यांचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. येथील पश्चिमेकडील मोहने-गाळेगाव परिसरातील पं. दिनदयाळ उपाध्याय शाळेच्या भोवताली सांडपाण्याने दलदल माजल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.हिंदी माध्यमाच्या या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. सद्यस्थितीला विद्यार्थी पटसंख्या १३५ इतकी आहे. याआधी ती १५१ च्या आसपास होती. परंतु, शाळेपासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर हिंदी माध्यमाची खाजगी शाळा आहे. त्याचा फटका या शाळेला बसल्याचे घटत्या पटसंख्येवरून दिसते. बालवाडीत १५ मुले असून अन्य इयत्ताचा आढावा घेता पहिलीत ९, दुसरीत १३, तिसरीमध्ये २२, चौथीत २४, पाचवीत २६, सहावीमध्ये १५ तर सातवीत २६ विद्यार्थी आहेत. याठिकाणी सहा शिक्षक कार्यरतआहेत. समुह साधन केंद्र असलेल्या या शाळेच्या अखत्यारीत प्राथमिक ९ तर माध्यमिक २ अशा ११ शाळा आहेत. १९७४ सालची शाळेची स्थापना आहे. परंतु, १९९४ मध्ये जिल्हा परिषदेकडून ताबा मिळाल्यानंतर केडीएमसी शिक्षण मंडळाने तिचे नुतनीकरण केले. सद्यस्थितीला छतावरील पत्र्यांमधून पाण्याची गळती लागल्याने याठिकाणी डागडुजीची आवश्यकता भासत आहे. शैक्षणिकसाहित्यांमध्ये गणवेश आणि बूट आजच्या घडीलाही मिळालेले नाहीत. दोन संगणक आहेत. परंतु,ते नादुरूस्त आहेत. शालेय पोषण आहार नियमितपणे मिळत आहे. तसेच मुलामुलींसाठी प्रसाधनगृहाची स्वतंत्र सुविधा आहे. दरम्यान शाळेच्या भोवतालची परिस्थिती चांगली नाही. परिसरात असलेल्या घरांचे सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याने शाळेच्या समोरच दलदल माजली आहे. यातून विद्यार्थ्यांना शाळेची वाट धरावी लागत आहे. काही वेळेस पर्यायी रस्त्याचादेखील आधार घेतला जात आहे. महापालिकांच्या शाळांमध्ये सहसा गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. एकंदरीतच ही परिस्थिती पाहता ‘गरीबाला कोणी वाली नाही’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.