शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
2
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
3
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
4
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
5
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
6
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
7
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी भेटणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
8
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
9
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
10
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
11
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
12
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
13
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
14
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
15
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
16
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
17
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
19
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
20
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला

यशस्वी शेती उद्योजिका

By admin | Updated: March 8, 2017 04:41 IST

आपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे मुलगी हे ‘परक्याचे धन’ म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तर वारस म्हणून मुलाचेच नाव पुढे के ले जाते. मात्र, अंजली चुरी

- अंजली भुजबळआपली भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे मुलगी हे ‘परक्याचे धन’ म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तर वारस म्हणून मुलाचेच नाव पुढे के ले जाते. मात्र, अंजली चुरी यांनी त्यांचे वडील भालचंद्र पाटील यांचा वारसा पुढे चालवला आहे. ते ठाणे जिल्ह्यातील कुसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी शेतीमध्ये अनेक संधोधने के ली आणि हाच शेती क्षेत्राचा वारसा अंजली चुरी या गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून चालवित आहेत. आपल्या देशात पारंपरिक पद्धतीने शेती के ली जाते. मात्र, या पिकांना हमीभाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरीही अनेक वेळा खचून जातो. यावर पर्याय असणे गरजेचे आहे. या विचारातून शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याचे ध्येय बाळगून त्यांनी १९९२पासून कामाला सुरुवात के ली. यामध्ये त्यांना त्यांचे पती मकरंद चुरी यांनी मोलाची साथ दिली.सुरुवातीला त्यांनी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथील त्यांच्या शेतात देशी आणि विदेशी (एक्झॉटिक) भाज्या पिकविण्यास सुरुवात के ली. कारण, विदेशी भाज्या आपल्या देशात येथील वातावरणात पिकविणे तसे मोठे आव्हानच होते, त्यांनी ते समर्थपणे पेलले.त्या एक्झॉटिक भाज्या ताज महल, ओबेरॉय आणि प्रेसिडेन्ट या तीन पंचतारांकित हॉटेलमध्ये देण्यास सुरुवात के ली. कालांतराने याएक्झॉटिक भाज्यांची मागणी वाढली. यानंतर त्यांनी आपल्या देशातील विविध ठिकाणच्या हवामानात कोणत्या भाज्या पिकू शकतात, याचा अभ्यास करून हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या शेतकऱ्यांचे जाळे विणले.१९९७ला निसर्ग निर्माण याकं पनीची स्थापना के ली. आजघडीला त्यांनी ६०० ते ८०० शेतकऱ्यांना उभे के ले आहे. त्या शेतकऱ्यांना एक्झॉटिक भाजी कशी पिकवायची, त्यांचे पॅकिंग कसे करायचे? याचे प्रशिक्षण दिले. अशा प्रकारच्या शेतीमुळे चांगले उत्पादन मिळतेय, यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. आज त्या पॅशन फ्रूट, कीवी, मॉग्रुन, ड्रॅगन फ्रूट अशा विदेशी फळांच्या उत्पादनाकडे लक्ष पुरवित आहे. नवीन पिढीने या शेती क्षेत्राला करिअर म्हणून पाहणे गरजेचे आहे, असे अंजली चुरी यांचे मत असून त्या यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचा वारसा त्यांची मुलगी सायली पुढे चालवत आहे. सायलीने बायोके मेस्ट्रीची पदवी घेतली त्यानंतर फ्रूड सायन्स अ‍ॅण्ड क्वॉलिटीकंट्रोलचा डिप्लोमा करून पालकांना या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. फॅमिली मॅनज्डे बिझनेस मॅनेजमेंट केले. लग्नानंतर सायली विदेशात आहे. मात्र, भारतातील शेतकऱ्यांसाठी काही तरी करायचे हा संकल्प करून मिशीगन युनिव्हर्सिटीत शिकत असून सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक याचा अभ्यास करत आहे. लवकरच भारतात येऊन शेतकऱ्यांना याबाबत प्रशिक्षित करण्याचा तिचा मानस आहे.करिअर म्हणून शेतीचा विचार कराशेती क्षेत्राला ग्लॅमर नाही, त्यामुळे तरु ण पिढी याकडे पाठ फिरवत आहे. मात्र, या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणे गरजेचे आहे. आज एक्झॉटिक व्हिजिटेबलमध्ये उच्चशिक्षित तरुण आहेत आणि ते चांगल्या प्रकारे यामध्ये काम करीत आहेत. तेव्हा शेतीचा विचार आजच्या पिढीने करणे गरजेचे आहे. याचबरोबर रासायनिकपेक्षा आॅरगॉनिक आणि नॅचरल पद्धतीचा आवलंब करणे गरजेचे आहे, असे अंजली चुरी यांचे मत आहे.महिलांचे योगदान‘शेतीमध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. महिलांमध्ये अनेक गुणवत्ता आहेत. महिला या लहान बाळाचे संगोपन फार व्यवस्थित आणि जबाबदारीने करतात. त्यामुळे प्रोडक्शनमध्ये महिलांनी काम करावे,तर पुरुषांनी मार्केटिंगमध्ये काम केल्यास ही चैन पूर्ण होईल,’ असे अंजली चुरी म्हणाल्या.मिळालेले पुरस्कार१. मराठी व्यापारी यशस्वीनी २.सह्याद्री वाहिनी कृ षी सन्मान३.जिजामाता कृ षीभूषण