शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

मराठा क्रांती मोर्चामध्ये माथाडींची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:59 IST

९ आॅगस्टला मुंबईमध्ये निघणा-या मराठा क्रांती मोर्चामध्ये माथाडी कामगारांची भूमिका निर्णायक राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी १९८२ मध्ये बलिदान दिले होते.

नामदेव मोरे।नवी मुंबई : ९ आॅगस्टला मुंबईमध्ये निघणा-या मराठा क्रांती मोर्चामध्ये माथाडी कामगारांची भूमिका निर्णायक राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी १९८२ मध्ये बलिदान दिले होते. त्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामगार एकवटू लागला आहे. मोर्चाच्या तयारीपासून तो यशस्वी करण्यासाठी हजारो कामगार सहकुटुंब परिश्रम घेत आहेत. एपीएमसीसह सर्व बाजारपेठा बंद करून कामगार मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये लाखोंचा मूक मोर्चा काढल्यानंतर क्रांतिदिनादिवशी ९ आॅगस्टला मुंबईमध्ये निर्णायक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील मराठा समाज व समाजाच्या संघटना मोर्चाच्या नियोजनासाठी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. राज्याच्या कानाकोपºयातून मुंबईत येणाºया लाखो समाजबांधवांनी गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. मोर्चाची तयारी व तो यशस्वी करण्यासाठी माथाडी कामगारांची भूमिका निर्णायक राहणार आहे. मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील दोन लाख माथाडी कामगार व त्यांचे नातेवाईक कुटुंबीयांसह मोर्चात सहभागी होत असून घरोघरी जाऊन याविषयी जनजागृती सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाची चळवळ सुरू केली ती माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी. ८० च्या दशकामध्ये राज्याच्या कानाकोपºयातील समाजाला एकत्र आणले. २२ मार्च १९८२ रोजी आरक्षणासाठी विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. आरक्षणाचा निर्णय जाहीर झाला नाही तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही असा इशारा अण्णासाहेबांनी सरकारला दिला होता. सरकारने शब्द पाळला नाही, पण माथाडीच्या या नेत्याने स्वत:वर गोळी झाडून घेऊन दुसºया दिवशी जीवनयात्रा संपविली. अण्णासाहेबांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, असे आवाहन कामगार करत असून त्या आवाहनाला कामगारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांनी सर्व कामगारांनी कुटुंबासह मोर्चामध्ये सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले आहे. नवी मुंबईमधील मराठा समाजाशी समन्वय साधून नियोजन करण्यामध्ये पाटील यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. राज्यातील मराठा समाज मुंबईमध्ये धडकणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून येणारे लाखो मराठा समाजबांधव नवी मुंबईमध्ये उतरणार आहे. त्यांची खासगी वाहने येथे उभी करून रेल्वेने मुंबईमध्ये जाणार आहेत. या कामगारांसाठी वाहनतळ उपलब्ध करून देणे. पाणी, प्रसाधनगृह व इतर सुविधा मिळवून देण्यासाठी सिडकोसह महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मुंबई बाजार समितीचे कामकाज बंद ठेवून तेथेही वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अण्णासाहेबांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही1मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ८० च्या दशकामध्ये माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी राज्यभर चळवळ उभी केली होती. मराठा महासंघाच्या माध्यमातून आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे यासाठी मोर्चे व आंदोलने करण्यात आली.2२२ मार्च १९८२ मध्ये आरक्षणासाठी विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांची भेटघेण्यात आली. सभागृहामध्ये आरक्षणाची घोषणा करा, असे आवाहन त्यांना केले.3आरक्षणाचा प्रश्न आज सुटला नाही तर उद्याचा सूर्य पाहणार नाही असा इशारा अण्णासाहेबांनी दिला. सरकारने शब्द पाळला नाही, परंतु अण्णासाहेब त्यांच्या शब्दावर ठाम राहिले. २३ मार्चला स्वत:वर गोळी मारून घेऊन समाजासाठी प्राणाची आहुती दिली. 4राज्यातील कामगारांसाठी तो काळा दिवस ठरला. यानंतरही कामगारांनी चळवळ सुरूच ठेवली होती. २०१३ ला आझाद मैदानामध्ये मोर्चा काढण्यात आला. अण्णासाहेबांनी केलेल्या त्यागाच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.