शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

मराठा क्रांती मोर्चामध्ये माथाडींची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:59 IST

९ आॅगस्टला मुंबईमध्ये निघणा-या मराठा क्रांती मोर्चामध्ये माथाडी कामगारांची भूमिका निर्णायक राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी १९८२ मध्ये बलिदान दिले होते.

नामदेव मोरे।नवी मुंबई : ९ आॅगस्टला मुंबईमध्ये निघणा-या मराठा क्रांती मोर्चामध्ये माथाडी कामगारांची भूमिका निर्णायक राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी १९८२ मध्ये बलिदान दिले होते. त्यांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कामगार एकवटू लागला आहे. मोर्चाच्या तयारीपासून तो यशस्वी करण्यासाठी हजारो कामगार सहकुटुंब परिश्रम घेत आहेत. एपीएमसीसह सर्व बाजारपेठा बंद करून कामगार मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे व इतर प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये लाखोंचा मूक मोर्चा काढल्यानंतर क्रांतिदिनादिवशी ९ आॅगस्टला मुंबईमध्ये निर्णायक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल परिसरातील मराठा समाज व समाजाच्या संघटना मोर्चाच्या नियोजनासाठी दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. राज्याच्या कानाकोपºयातून मुंबईत येणाºया लाखो समाजबांधवांनी गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. मोर्चाची तयारी व तो यशस्वी करण्यासाठी माथाडी कामगारांची भूमिका निर्णायक राहणार आहे. मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील दोन लाख माथाडी कामगार व त्यांचे नातेवाईक कुटुंबीयांसह मोर्चात सहभागी होत असून घरोघरी जाऊन याविषयी जनजागृती सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाची चळवळ सुरू केली ती माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांनी. ८० च्या दशकामध्ये राज्याच्या कानाकोपºयातील समाजाला एकत्र आणले. २२ मार्च १९८२ रोजी आरक्षणासाठी विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. आरक्षणाचा निर्णय जाहीर झाला नाही तर उद्याचा सूर्य मी पाहणार नाही असा इशारा अण्णासाहेबांनी सरकारला दिला होता. सरकारने शब्द पाळला नाही, पण माथाडीच्या या नेत्याने स्वत:वर गोळी झाडून घेऊन दुसºया दिवशी जीवनयात्रा संपविली. अण्णासाहेबांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, असे आवाहन कामगार करत असून त्या आवाहनाला कामगारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांनी सर्व कामगारांनी कुटुंबासह मोर्चामध्ये सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले आहे. नवी मुंबईमधील मराठा समाजाशी समन्वय साधून नियोजन करण्यामध्ये पाटील यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. राज्यातील मराठा समाज मुंबईमध्ये धडकणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून येणारे लाखो मराठा समाजबांधव नवी मुंबईमध्ये उतरणार आहे. त्यांची खासगी वाहने येथे उभी करून रेल्वेने मुंबईमध्ये जाणार आहेत. या कामगारांसाठी वाहनतळ उपलब्ध करून देणे. पाणी, प्रसाधनगृह व इतर सुविधा मिळवून देण्यासाठी सिडकोसह महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला आहे. मुंबई बाजार समितीचे कामकाज बंद ठेवून तेथेही वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अण्णासाहेबांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही1मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ८० च्या दशकामध्ये माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांनी राज्यभर चळवळ उभी केली होती. मराठा महासंघाच्या माध्यमातून आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे यासाठी मोर्चे व आंदोलने करण्यात आली.2२२ मार्च १९८२ मध्ये आरक्षणासाठी विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांची भेटघेण्यात आली. सभागृहामध्ये आरक्षणाची घोषणा करा, असे आवाहन त्यांना केले.3आरक्षणाचा प्रश्न आज सुटला नाही तर उद्याचा सूर्य पाहणार नाही असा इशारा अण्णासाहेबांनी दिला. सरकारने शब्द पाळला नाही, परंतु अण्णासाहेब त्यांच्या शब्दावर ठाम राहिले. २३ मार्चला स्वत:वर गोळी मारून घेऊन समाजासाठी प्राणाची आहुती दिली. 4राज्यातील कामगारांसाठी तो काळा दिवस ठरला. यानंतरही कामगारांनी चळवळ सुरूच ठेवली होती. २०१३ ला आझाद मैदानामध्ये मोर्चा काढण्यात आला. अण्णासाहेबांनी केलेल्या त्यागाच्या आठवणींना उजाळा मिळत आहे.