शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था

By admin | Updated: May 10, 2016 02:05 IST

कर्जत तालुक्यात ग्रामीण भागातून तालुक्याला जोडणारे व ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवरील डांबर उडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे

नेरळ : कर्जत तालुक्यात ग्रामीण भागातून तालुक्याला जोडणारे व ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवरील डांबर उडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अशा रस्त्यांवरून प्रवास करताना जनता हैराण झाली आहे. अनेक रस्त्यांची डागडुजी करूनही पुन्हा रस्ते जैसे थे आहेत. अनेक रस्त्यांची १५ ते २० वर्षांपासून दुरु स्ती न केल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. परंतु बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींना ग्रामीण भागातील जनतेचे हाल दिसत नाहीत का, असा प्रश्न वाहनचालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील नेरळ-कळंब, कळंब-बोरगाव, वारे-कुरु ंग-ताडवाडी, ओलमण-पेंढरी, पोशीर-माले, दहीवली-देवपाडा, नेरळ-गूढवण, सावळेफाटा ते हेदवली, मोहिली-बीड, मिरचोली-कडाव, वडवली-पाली-भुतीवली, बेकरे, बोर्ले फाटा ते आंबिवली अशा अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी जंगलभाग असल्याने या खराब रस्त्यावरील चढ-उतार करणे वाहनचालक व प्रवाशांना त्रास दायक ठरत आहे. परंतु अशा या खराब रस्त्यांकडे लक्ष देण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ मिळत नाही. आजच्या स्थितीत तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट आहे.अनेक रस्त्यांवर डांबरीकरण करण्याऐवजी लाल मातीचा भराव टाकण्यात आला असून, उन्हात अनेक रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरत आहे. त्याचा मोठा त्रास प्रवाशांना होत आहे. तसेच काही रस्त्यांवर नुसती खाडीच शिल्लक राहिल्याने हा प्रवास खडतर झाला आहे. डागडुजी आणि नवीन रस्त्यांसाठी बांधकाम विभागाने कोट्यवधी रु पये खर्च केले. परंतु ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या छुप्या दोस्तीमुळे शासनाचे कोट्यवधी रु पये खर्च करून रस्त्यांची अवस्था सहा महिने व वर्षाने जैसे थे होते. कोट्यवधींच्या कामांना लाखो रु पयांची मलमपट्टी केली जाते. मग याला जबाबदार कोण? यात ठेकेदांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत मतांची झोळी पसविणाऱ्या नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे, असे कर्जतकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत असल्याने त्याचे तर खूपच हाल होत आहेत. या खराब रस्त्यांमुळे अनेक भागांतील एसटी सेवा बंद पडल्याने तीन ते चार किमीची पायपीट करावी लागत आहे. याचा त्रास विद्यार्थ्यांनाही होत आहे. त्यामुळे यावर्षी तरी पावसाळ्याच्या आत अनेक नादुस्त रस्ते चांगल्या दर्जाचे करावे अशी मागणी होत आहे.जिल्ह्यात सुमारे आठ हजार एकर लांबी जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची असून, त्या रस्त्यांसाठी हजारो कोटी रुपये बजेट लागेल. परंतु जिल्हा परिषदेचे बजेट १०० कोटींचे आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवर जिल्हा परिषद जास्तीत जास्त पाच ते १० कोटी रुपये खर्च करू शकते. त्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात जे जिल्हा परिषदेचे रस्ते आहेत, ते एकूण लांबीच्या २५ टक्के दरवर्षी नवीन कसे होतील याची बजेटमध्ये तरतूद करणे गरजेचे आहे.-सुदाम पेमारे, जिल्हा परिषद सदस्यखरे म्हणजे हे रस्ते त्या त्या भागातील विकासाची नाडी आहेत. हे रस्ते जर चांगल्या दर्जाचे असतील तर तालुक्यात विकासाची संपत्ती मिळू शकते. परंतु याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. जर हे रस्ते चांगल्या दर्जाचे झाले तर ग्रामीण भागाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही- भरत भगत, माजी तालुकाप्रमुख शिवसेना