शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिल्या १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z समाज आक्रमक, सरकारविरोधात जोरदार निदर्शने
3
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
4
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
5
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
6
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
7
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
8
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
9
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
10
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
11
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
12
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक
13
"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."
14
विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?
15
Pitru Paksha 2025: पितृपक्षात इतर प्राणी पक्षी सोडून कावळ्यालाच एवढं महत्त्व का? वाचा!
16
खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे
17
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
18
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
19
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
20
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?

दिघ्यात रहिवाशांचा आक्रोश

By admin | Updated: October 3, 2015 02:38 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिघ्यातील ९९ बेकायदा बांधकामांवर एमआयडीसीने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे जवळपास २0 हजार रहिवासी बेघर होणार आहे

कमलाकर कांबळे, नवी मुंबईउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिघ्यातील ९९ बेकायदा बांधकामांवर एमआयडीसीने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे जवळपास २0 हजार रहिवासी बेघर होणार आहे. यातील बहुतांशी कुटुंबे आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील आहेत. आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करण्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी येथे खर्ची घातली आहे. दुर्दैवाने आता त्यांच्यावर बेघर होण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे या परिस्थितीला जबाबदार असणारे नामानिराळेच राहिले आहेत. त्यांच्या पापाची शिक्षा या गरीब कष्टकऱ्यांना भोगावी लागत आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहेत. सिडको, महापालिका आणि एमआयडीसी या तीन प्राधिकरणांच्या वादात येथील भूमाफियांचे फावले आहे. याचा परिणाम म्हणून मागील दीड दशकात शहरात बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. विशेषत: गाव - गावठाणात गरजेपोटीच्या नावाखाली प्रकल्पग्रस्तांनी फिफ्टी-फिफ्टीच्या बांधकामांचा धडाका लावला. दिघा परिसरात तर भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. मोकळ्या जागा बळकावून त्यावर सर्रास इमारती उभारल्या जात आहेत. बैठ्या चाळी बांधून त्या गरजूंच्या माथी मारल्या जात आहेत. दिवसाआड नवीन झोपड्या उभारल्या जात आहेत. अशा अनधिकृत प्रकल्पातील घरे स्वस्त असल्याने दहा ते बारा लाखांचे बजेट असणाऱ्या कष्टकऱ्यांनी आपल्या आयुष्याची कमाई खर्च करून येथे घरे घेतली आहेत. आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा हे मागील सहा वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देत आहेत. त्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने दिघ्यातील ९९ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसीने सोमवारपासून या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे या इमारतींतून राहणाऱ्या रहिवाशांचे धाबे दणाणले आहेत. नवी महापालिकेची उदासीनताअप्रत्यक्षपणे भूमाफियांना झुकते माप देणाऱ्या महापालिकेने सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. उलट अनधिकृत बांधकामांना रातोरात नळजोडण्या देण्यात आल्या. महावितरणने तातडीने वीज पुरवठा दिला. त्यामुळे ही घरे अधिकृत असल्याचे भासविण्यात भूमाफियांना यश आले. त्याद्वारे अनेक गरजू लोकांना फसविण्यात आले. नियोेजन प्राधिकरण या नात्याने अनधिकृत घरांच्या विक्रीला चाप लावणे महापालिकेला शक्य होते. त्यात महापालिकेकडून कुचराई झाली आहे. महापालिकेच्या उदासीनतेमुळे साधारण सव्वा लाख रहिवाशांवर बेघर होण्याचे संकट ओढावले आहे. विशेष म्हणजे अनधिकृत घरे विकत घेवू नये, अशा आशयाचे फलक गावांच्या प्रवेशद्वारावर लावण्याच्या सूचना माजी मंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाला केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले.महापालिकेचे वॉर्ड अधिकारी, वीज जोडण्या देणारे महावितरणचे अधिकारी, पोलीस व स्थानिक नगरसेवक यांच्यातील अर्थपूर्ण समझोत्यामुळेच शहरात बेकायदा बांधकामांचा भस्मासुर पोसला गेला आहे. तर मतांच्या राजकारणासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भूमाफियांना पाठीशी घालणारे येथील खासदार व आमदारही तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत असताना या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांची चौकशी व्हायला हवी. 99आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा हे सहा वर्षांपासून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देत आहेत. दिघ्यातील ९९ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.