शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईवर जलदानाचा पर्याय

By admin | Updated: April 22, 2016 02:08 IST

तालुक्यात १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. हा शासनाने तयार केलेला पाणीटंचाई आराखडा आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे.

कर्जत : तालुक्यात १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. हा शासनाने तयार केलेला पाणीटंचाई आराखडा आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. या वाड्यांमधील अनेक महिलांना डोक्यावर चार-चार हंडे घेऊन एक किलोमीटरपेक्षा जास्त पायपीट पाण्यासाठी करावी लागत आहे. हे चित्र लक्षात घेऊन कर्जतमधील जलदूतांनी जशी लातूरकरांची तहान भागविली तसेच या आदिवासींना पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.महिला वयोमानाप्रमाणे जमेल तशी भांडी घेवून पाणी भरण्यासाठी निघतात. काही ठिकाणी तर कोरड्या पडलेल्या नदीच्या पात्रात डवरे खोदून मिळेल तेवढे पाणी भरण्याचा प्रयत्न करत आहेत. टंचाईग्रस्त गावांचा व वाड्यांचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयात गेला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यावर या गावासाठी पाण्याचे टँकर मिळतील. मात्र तोपर्यंत या भगिनींना पाण्यासाठी दाहीदिशा फिरावे लागेल. माणुसकीच्या नात्यातून लातूरमधील तहानलेल्यांना पाणी पुरविण्याचे पुण्याचे काम करत आहेत. जलदान करणाऱ्या त्या संस्था, वैयक्तिक जलदान करणाऱ्या व्यक्ती यांनी पुढे येऊन कर्जत तालुक्यातील एक-एक वाडी दत्तक घेतली आणि त्यांना एक दिवसाआड पाण्याचा टँकर पुरविला. कर्जत तालुक्यातील गावांची आणि वाड्यांची पाणीटंचाई दूर होईल, असे येथील नागरिकांचे मत आहे. (वार्ताहर)> माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी१नेरळ : कर्जत तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन, आपली समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न नेरळ विद्या मंदिर शाळेच्या माजी विद्यार्थी यांच्या एका वर्गातील सहकाऱ्यांनी के ला आहे. त्यानुसार खांडस भागातील काही आदिवासी वाड्यांमध्ये ते माजी विद्यार्थी टँकरने पाणीपुरवठा करीत आहेत. अगदी पावसाळा सुरु वात होईपर्यंत तेथे पाणीपुरवठा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.२प्रवीण रामचंद्र ब्रम्हांडे याने आपल्या वडिलांकडून समाजसेवेचा वसा घेतला आहे. पाणीटंचाईग्रस्त गाव पाड्यांना भेट देवून नेरळ विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांनी दोन महिने टँकरने पाणीपुरवठा करण्याचे कार्य हाती घेतले आणि माणुसकीचे दर्शन घडवले. ९६-९७ च्या बॅचचे सदस्य सोशल मीडियावर एकत्र आले. तेव्हा प्रवीण ब्रह्मांडे यांनी वर्गमित्रांंच्या मदतीने केवळ सामाजिक बांधिलकीचे संदेश देणाऱ्या पोस्ट न टाकता प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जोपासली.३तालुक्यातील काटेवाडी, बेलाचीवाडी, अंबरपाडा, बांगरवाडी, ढाब्याचीवाडी, पेटरवाडी, खांडस या गावना स्व:ता वर्गणी काढून दररोज पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरु वात देखील के ली. हा उपक्र म ३१ मेपर्यंत सुरु राहणार आहे. प्रवीण ब्रह्मांडे, नरेश पवार, प्रभाकर जाधव, अमित ठाकूर, प्रवीण मोरगे, संदीप उतेकर, समीर शेख, विनायक बिडकर, केदार खडे, पराग तावडे, जगदीश डबरे, अरविंद ठोंबरे, रितेश भालेराव, प्रीतम पाटील आदींनी या कामी स्वत:ला झोकून दिले आहे.> जैन बांधव भागवणार ओलमणची तहाननेरळ : तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या ओलमण येथील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी नेरळ जैन संघाने पुढाकार घेतला आहे. तेथील विहिरीमध्ये एकावेळी दोन टँकर ओतून या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.सुमारे १०० घरांची लोकवस्ती असलेल्या ओलमण गावाला पाणीपुरवठा करणारी नळ पाणी योजना अनेक वर्षे बंद आहे. बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ओलमण गावासाठी दोन विहिरी खोदल्या आहेत, परंतु या विहिरींनी जानेवारी महिन्यातच तळ गाठल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ओलमण गाव उंचावर असल्याने आदिवासी महिलांना दुसऱ्या गावातील विहिरीवरून पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून जावे लागते. प्रत्येक उन्हाळ्यात चार महिने आदिवासींना पाण्यासाठी भटकावे लागते. याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यातही लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आदिवासी वाडीतील पाणीसमस्या सोडविण्यासाठी नेरळमधील जैन सकल संघ आणि श्री जैन संघ यांनी पुढाकार घेत टंचाईग्रस्त गावाला पाणीपुरवठा सुरु केला आहे. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र हे पाणी गावातील विहिरीत टाकण्यात येऊन त्यानंतर वितरीत करण्यात येते. (वार्ताहर)