शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

घणसोलीत साकारतेय एनएमएमटीचे आदर्श आगार

By admin | Updated: October 6, 2015 00:54 IST

घणसोली येथे एनएमएमटीचे आदर्श आगार साकारत असून त्याचे काम शीघ्रगतीने सुरू आहे. मार्च २०१६ पर्यंत हे आगार सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या आगारामुळे

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबई घणसोली येथे एनएमएमटीचे आदर्श आगार साकारत असून त्याचे काम शीघ्रगतीने सुरू आहे. मार्च २०१६ पर्यंत हे आगार सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या आगारामुळे तुर्भे व आसुडगाव आगारावरील ताण कमी होवून परिवहनच्या सुविधेतही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.घणसोली सेक्टर १५ येथे ९.५ एकर क्षेत्रफळाच्या भूखंडावर महापालिका परिवहन उपक्रमाच्या आगाराचे काम सुरु आहे. डिसेंबर २०१४ पासून सुरू झालेल्या या कामाला मार्च २०१६ पर्यंतची मुदत आहे. त्यानुसार उर्वरित सहा महिन्यांत हे आगार पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्याठिकाणी शीघ्र गतीने कामे सुरूआहेत. घणसोलीचे आगार हे परिवहनच्या इतर दोन आगारापेक्षा आदर्श आगार बनवण्याचा परिवहनचा प्रयत्न आहे. याकरिता दोन आगारात आजपर्यंतच्या जाणवलेल्या त्रुटी त्याठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. आगार होत असलेल्या भूखंडाच्या तीन बाजूला रस्ता असल्याने बस आत व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे प्रवेशद्वार बनवले जाणार आहेत.त्याठिकाणी वाहनांची दुरुस्ती करुन धुण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानांचा वापर केला जाणार आहे. त्याशिवाय प्रशासकीय इमारत व कर्मचारी कँटीन यांचीही सोय त्याठिकाणी केली जात असल्याचे कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांनी सांगितले. परिवहनच्या ताफ्यात लवकरच १२५ नव्या बस येणार आहेत. या बस घणसोली आगारामार्फत घणसोली व कोपरखैरणे येथून सुटणाऱ्या विविध मार्गावर सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या घणसोली व कोपरखैरणे येथून पनवेल, खारघर, तळोजा, उरण अशा लांबच्या मार्गावर धावणाऱ्या अनेक बस सुटतात. परंतु मार्ग फेरी संपल्यानंतर या बस उभ्या करण्यासाठी किंवा पुढचा मार्ग ठरवण्यासाठी तुर्भे आगारात पाठवल्या जातात. यामध्ये इंधनाचा वापर वाढून चालकांवरही ताण येतो. मात्र घणसोली येथील आगार सुरु झाल्यानंतर या सर्व मार्गावरील बस त्याठिकाणी थांबवल्या जाणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांवरील अतिरिक्त ताण कमी होवून इंधनातही बचत होणार आहे. यामुळे परिवहनच्या दृष्टीने हे आदर्श आगार ठरणार आहे. तुर्भे आगाराच्या ठिकाणी डांबरीकरणामुळे काही वर्षातच खड्डे पडू लागले होते. यामुळे त्याठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात आले. या अनुभवावरुन घणसोली आगारात सुरवातीलाच काँक्रीटीकरण केले जाणार आहे. या संपूर्ण कामाच्या दर्जावर आयआयटीचे नियंत्रण असणार आहे.घणसोली आगाराचे काम १८ महिन्यांच्या कामाच्या मुदतीवर देण्यात आले आहे. तुर्भे व आसुडगाव आगारात जाणवलेल्या त्रुटी त्याठिकाणी भेडसावणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे परिवहनच्या सुविधेत सकारात्मक बदल होवून हे आदर्श आगार ठरणार आहे.- शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक