शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

मनपाच्या सत्ताकेंद्रातून राष्ट्रवादी बाद

By admin | Updated: May 10, 2016 02:11 IST

शिवसेना, भाजपाने काँग्रेसच्या मदतीने माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. स्थायी समिती सभापतीपद आपल्याकडे खेचून विरोधकांनी

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई शिवसेना, भाजपाने काँग्रेसच्या मदतीने माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. स्थायी समिती सभापतीपद आपल्याकडे खेचून विरोधकांनी नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला महापालिकेच्या सत्ताकेंद्रातून जवळ जवळ बाद केले आहे. कारण संख्याबळाने सर्वात मोठा पक्ष असून, राष्ट्रवादीकडे आता महापालिकेचे एकही महत्त्वाचे पद राहिलेले नाही. नवी मुंबईचे सर्वेसर्वा म्हणून गणेश नाईक यांची ओळख आहे. सलग २५ वर्षे महापालिकेत त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता मिळवून त्यांनी हे सिद्धही केले आहे. असे असले तरी मागील दोन वर्षांपासून नाईक यांचा हा डोलारा ढासळू लागला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर लगेच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फारसी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे जेमतेम काठावर पास झालेल्या राष्ट्रवादीला अपक्ष आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन करावी लागली. विशेष म्हणजे ही तडजोड करीत असताना अपक्षाला चक्क महापौर आणि काँग्रेसला उपमहापौर पद द्यावे लागले. महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादीला पहिल्या वर्षी केवळ स्थायी समिती सभापती पदावर समाधान मानावे लागले. परंतु नेत्यांच्या फाजील आत्मविश्वासामुळे आता हे पदसुध्दा राष्ट्रवादीला गमवावे लागले आहे. एकूणच सर्व असून ही काहीच नाही, अशीच काहीशी अवस्था आता राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. या सर्व परिस्थितीला नाईक यांची पारंपरिक कार्यपध्दती जबाबदार असून, यात त्यांच्या दोन सुपुत्रांचे बऱ्यापैकी योगदान असल्याचे दिसून आले आहे.गणेश नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे छोटे चिरंजीव संदीप नाईक हे ऐरोली मतदारसंघातून काठावर पास झाले. मात्र बेलापूर विधानसभा क्षेत्रातून नाईक यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. याचा परिणाम म्हणून पुढील काही महिने त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी बंद केल्या. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात सापडले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली. परंतु या आक्रमकपणामुळे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला जेमतेम सत्तेच्या काठापर्यंतच पोचता आले. एकूणच मागील दोन वर्षांत राजकीय रणनीती आखण्यात नाईक सातत्याने अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानतंर खऱ्या अर्थाने नाईक यांच्या साम्राज्याला हादरे बसायला सुरुवात झाली. नेत्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते हवालदिल झाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठे भगदाड पडले. पक्षातील आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी स्वहिताचा विचार करीत सोयीच्या पक्षांची कास धरली. पक्षाला लागलेल्या या गळतीकडे नाईक पिता-पुत्रांनी सपशेल पाठ फिरविली. फाजील आत्मविश्वास व निष्ठावंताना गृहीत धरून विरोधकांना गोंजारण्याची नाईक पिता-पुत्रांची कार्यप्रणाली त्यांच्याच अंगलट आली. याचा जबर फटका महापालिका निवडणुकीत बसला. विशेष म्हणजे याचे दुरगामी परिणाम ज्ञात असतानाही नाईक बेसावध राहिले. त्यामुळे महापालिका तिजोरीच्या चाव्याही गमवाव्या लागल्या.