शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मनपाच्या सत्ताकेंद्रातून राष्ट्रवादी बाद

By admin | Updated: May 10, 2016 02:11 IST

शिवसेना, भाजपाने काँग्रेसच्या मदतीने माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. स्थायी समिती सभापतीपद आपल्याकडे खेचून विरोधकांनी

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई शिवसेना, भाजपाने काँग्रेसच्या मदतीने माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला आहे. स्थायी समिती सभापतीपद आपल्याकडे खेचून विरोधकांनी नाईक यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला महापालिकेच्या सत्ताकेंद्रातून जवळ जवळ बाद केले आहे. कारण संख्याबळाने सर्वात मोठा पक्ष असून, राष्ट्रवादीकडे आता महापालिकेचे एकही महत्त्वाचे पद राहिलेले नाही. नवी मुंबईचे सर्वेसर्वा म्हणून गणेश नाईक यांची ओळख आहे. सलग २५ वर्षे महापालिकेत त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता मिळवून त्यांनी हे सिद्धही केले आहे. असे असले तरी मागील दोन वर्षांपासून नाईक यांचा हा डोलारा ढासळू लागला आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर लगेच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फारसी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे जेमतेम काठावर पास झालेल्या राष्ट्रवादीला अपक्ष आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन करावी लागली. विशेष म्हणजे ही तडजोड करीत असताना अपक्षाला चक्क महापौर आणि काँग्रेसला उपमहापौर पद द्यावे लागले. महापालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादीला पहिल्या वर्षी केवळ स्थायी समिती सभापती पदावर समाधान मानावे लागले. परंतु नेत्यांच्या फाजील आत्मविश्वासामुळे आता हे पदसुध्दा राष्ट्रवादीला गमवावे लागले आहे. एकूणच सर्व असून ही काहीच नाही, अशीच काहीशी अवस्था आता राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. या सर्व परिस्थितीला नाईक यांची पारंपरिक कार्यपध्दती जबाबदार असून, यात त्यांच्या दोन सुपुत्रांचे बऱ्यापैकी योगदान असल्याचे दिसून आले आहे.गणेश नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे छोटे चिरंजीव संदीप नाईक हे ऐरोली मतदारसंघातून काठावर पास झाले. मात्र बेलापूर विधानसभा क्षेत्रातून नाईक यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. याचा परिणाम म्हणून पुढील काही महिने त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी बंद केल्या. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात सापडले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली. परंतु या आक्रमकपणामुळे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाला जेमतेम सत्तेच्या काठापर्यंतच पोचता आले. एकूणच मागील दोन वर्षांत राजकीय रणनीती आखण्यात नाईक सातत्याने अपयशी ठरल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानतंर खऱ्या अर्थाने नाईक यांच्या साम्राज्याला हादरे बसायला सुरुवात झाली. नेत्यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते हवालदिल झाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मोठे भगदाड पडले. पक्षातील आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी स्वहिताचा विचार करीत सोयीच्या पक्षांची कास धरली. पक्षाला लागलेल्या या गळतीकडे नाईक पिता-पुत्रांनी सपशेल पाठ फिरविली. फाजील आत्मविश्वास व निष्ठावंताना गृहीत धरून विरोधकांना गोंजारण्याची नाईक पिता-पुत्रांची कार्यप्रणाली त्यांच्याच अंगलट आली. याचा जबर फटका महापालिका निवडणुकीत बसला. विशेष म्हणजे याचे दुरगामी परिणाम ज्ञात असतानाही नाईक बेसावध राहिले. त्यामुळे महापालिका तिजोरीच्या चाव्याही गमवाव्या लागल्या.