शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

मजुरांच्या सात हजारांहून अधिक मुलांना दाखविली शिक्षणाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 01:24 IST

- प्राची सोनवणेनवी मुंबई परिसरातील झोपडपट्टी वसाहतींमधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून आजतागायत सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्यासाठी तुर्भे परिसरातील ‘आरंभ’ ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. उच्च पदवीधर असलेल्या शोभा मूर्ती यांनी गलेलठ्ठ पगाराच्या सीएच्या नोकरीचा त्याग करत साक्षरतेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले.१९९७ साली या ...

- प्राची सोनवणेनवी मुंबई परिसरातील झोपडपट्टी वसाहतींमधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून आजतागायत सात हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्यासाठी तुर्भे परिसरातील ‘आरंभ’ ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. उच्च पदवीधर असलेल्या शोभा मूर्ती यांनी गलेलठ्ठ पगाराच्या सीएच्या नोकरीचा त्याग करत साक्षरतेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले.१९९७ साली या संस्थेची सुरुवात झाली. सुरुवातीला शहरातील झोपडपट्टी परिसरातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या वंचित मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी शोभा मूर्ती यांनी त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. तुर्भे परिसरात शाळा सुरू केली. सुरुवातीला अनेक आव्हाने पेलत विद्यार्थी गोळा करावे लागले. पहिल्या दिवशी शाळेत आले की दुसºया दिवशी तो विद्यार्थी गायब. मग पुन्हा त्या विद्यार्थ्याला शोधून शाळेत बसवायचे, असा हा ठरलेला दिनक्रम, असे मूर्ती यांनी सांगितले. हळूहळू येथील विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले आणि त्यानंतर कामावर जाताना पालक मुलांना शाळेत सोडून जात असल्याचे मूर्ती यांनी सांगितले. या वेळेत या विद्यार्थ्यांना गणित, मराठी, हिंदी, विज्ञान आदी विषयांचे धडे देण्यात आले. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या झोपडपट्टी भागात शिक्षणाला कवडीमोल महत्त्व दिले जात नाही अशा ठिकाणी शाळा सुरू करून तेथील विद्यार्थ्यांना साक्षर करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आणि अशा वेळीकुटुंबाने मोलाची साथ दिली याचा खूप अभिमान वाटत असल्याचेही मूर्ती यांनी सांगितले.आरटीईअंतर्गत झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेत मोफत प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी दिली जाते तर ज्यांना अभ्यासासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही अशा गरजंूना येथे अभ्यासासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. शालेय साहित्य, गणवेश तसेच रोजचा डबादेखील या संस्थेच्या माध्यमातून पुरविला जातो. कोणत्याही कारणामुळे या मुलांना शिक्षणासाठी अडचण येऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. शहरातील दानशूर व्यक्तींकडून या संस्थेला निधी स्वरूपात धान्य, भाज्या, फळे दिली जातात, जेणेकरून या विद्यार्थ्यांना रोजचा जेवणाचा डबा दिला जाईल. बालवाडीपासून ते दहावीपर्यंत सध्या १११६ विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत.संस्थेतून बाहेर पडलेली मुले आज नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. तर काही विद्यार्थी या संस्थेत ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. तुर्भे, रबाळे एमआयडीसी, दिघा, घणसोली, नेरूळ, यादवनगर, तुर्भे नाका अशा सहा ठिकाणी या संस्था कार्यरत आहेत.महिलांना स्वयंरोजगारसातारा जिल्ह्यातील चौदा गावांमधील महिलांना शिवण क्लास, पापड,लोणची तयार करणे, हस्तकलेच्यावस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिलेजाते. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवून या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. संस्थेच्या वतीने लातूरमध्येही शेतकºयांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली जाते.