शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

एपीएमसीमधील हॉटेलमध्ये राबत आहेत बालमजूर

By admin | Updated: July 6, 2017 06:40 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांना राबवून घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आॅपरेशन

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांना राबवून घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आॅपरेशन मुस्कान अंतर्गत धाड टाकून ८ मुलांची सुटका केली आहे. या प्रकरणी सहा हॉटेल मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. कृषी मालाची विक्री करणाऱ्यांपासून हॉटेल व टपरी चालकही नियमांचे उल्लंघन करत आहेत. हॉटेल व खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या मालकांनी अल्पवयीन मुलांना नोकरी दिली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ४ जुलैला पोलिसांच्या विशेष पथकाने बाजार समितीमधील हॉटेलमध्ये धाडी टाकल्या. प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये हॉटेल साईप्रसाद, भैरवनाथ ज्युस सेंटर, साईप्रसाद कँटीन नंबर ३, हॉटेल तुषार, सुपर स्नॅक्स कॅन्टीन व साई भाग्यम हॉटेलमध्ये तपासणी करण्यात आली. यामध्ये ८ बालकांची सुटका करण्यात आली आहे. या मुलांकडून साफसफाई, भांडी धुणे, वेटर, टेबल सफाई व किचनमध्ये कामे करून घेतली जात असल्याचे निदर्शनास आले. या मुलांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण व पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी कामगार अधिकारी आनंद भोसले यांनी हॉटेल मालक प्रवीण कोट्यायन, हनुमंत किसन उरूमकर, कृष्णा गौडा, संजय तुकाराम यनपुरे, मनीकुमार अंबाडी, रविराज शेट्टी यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. सदरच्या बालकांची सुटका करून त्यांच्याकडे विचारपूस करता ८ बालकांपैकी ५ उत्तर प्रदेशमधील राहणारे असून ३ जण बिहार येथील राहणारे आहेत. या सर्व मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त तुषार दोशी, नितीन कौसाडीकर, आनंद चव्हाण, सुनीता भोर, संजय क्षीरसागर, शशिकांत पाटील, हनुमंत शितोळे, जगदीश पाटील,राजेश कोकरे, गोरक्षनाथ पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बाजार समितीचे दुर्लक्ष बाजार समितीमध्ये काम करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीजवळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे. परंतु प्रशासन या नियमांची अंमलबजावणी करत नाही. परिणामी उत्तर प्रदेश व बिहारमधून आलेल्या अल्पवयीन मुलांना नोकरी देण्यात आली आहे. या मुलांची नोंद कोणाकडेही नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच अल्पवयीन मुलांचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण व पिळवणूक झाली असून यानंतरही प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.