शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

By admin | Updated: January 25, 2016 01:28 IST

शासनाने ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा कोणताही मोबदला दिलेला नाही, त्यांना आता त्यांची १०० टक्के जमीन परत मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या

नामदेव मोरे,  नवी मुंबईशासनाने ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा कोणताही मोबदला दिलेला नाही, त्यांना आता त्यांची १०० टक्के जमीन परत मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवी मुंबईसह राज्यभरातील प्रकल्पबाधितांना मोठा दिलासा मिळणार आहे. साडेबारा टक्के योजनेनंतर भूमिपुत्रांच्या लढाईतील हे सर्वात मोठे यश ठरणार आहे. मुंबईमधील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी शासनाने पर्यायी शहर वसविण्याचा निर्णय घेतला. यासाठी ठाणे व रायगड जिल्ह्यातील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची १७,००० हेक्टर जमीन अल्प किमतीमध्ये संपादित केली. जमिनी संपादित केल्यानंतर ४६ वर्षे झाली तरी अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला व साडेबारा टक्के योजनेचा लाभ झालेला नाही. या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रकल्पग्रस्त नेत्यांसोबत आगरी कोळी युथ फाउंडेशननेही पाठपुरावा सुरू केला आहे. उरण तालुक्यामधील चांजे गावामधील शेतकरी हरेश्वर मढवी यांचीही जमीन सिडकोने संपादित केली. परंतु चार दशकांमध्ये त्यांना काहीच मोबदला मिळाला नसल्याने याविषयी प्रकल्पग्रस्त चळवळीतील कार्यकर्ते अ‍ॅड. राहुल ठाकूर यानी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जमीन अधिगृण कायद्यामधील कलम २४ (२) प्रमाणे जमीन संपादित केल्यानंतर पाच वर्षांमध्ये मोबदला दिला नाही किंवा मोबदल्याची रक्कम सक्षम न्यायाधिकरणाकडे जमा केली नाही तर जमीन संपादन रद्द होते. हरेश्वर मढवी यांना ४० वर्षे होऊन गेल्यानंतरही कोणताच मोबदला दिलेला नसल्यामुळे त्यांना त्यांची जमीन परत मिळावी, असा युक्तिवाद करण्यात आला. याविषयी नवीन जमीन अधिगृहण कायद्यातील तरतूद व याविषयी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा दाखलाही देण्यात आला. न्यायालयाने १२ जानेवारी २०१६ मध्ये याविषयी निकाल शेतकऱ्याच्या बाजूने दिला आहे. उच्च न्यायालयाने दिलेला निकाल नवी मुंबई, उरण व पनवेल परिसरातील मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना होणार आहे. याशिवाय राज्यभरातील सर्व प्रकल्पबाधितांनाही त्याचा लाभ होणार आहे. सिडकोच्या स्थापनेपासून भूमिपुत्र हक्कासाठी लढा देत आहेत. आतापर्यंत जमिनीचा मोबदला व साडेबारा टक्के योजनेचा भूखंड मिळावा, यासाठी शेकडो वेळा सिडकोच्या पायऱ्या झिजविल्या होत्या. परंतु आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संपादित केलेली १०० टक्के जमीन परत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. ९५ गावांमधील काही ठिकाणची जमीन अद्याप संपादित झालेली नाही. या जमिनीचे संपादन करायचे असल्यास त्यासाठी आता पुन्हा संपादनाची प्रक्रिया राबवावी लागेल व शेतकऱ्यांना मोबदला द्यावा लागणार आहे. नवी मुंबईतील शेतकऱ्यांनी ९० दशकामध्ये संघर्ष करून साडेबारा टक्के योजना राबविण्यास शासनास भाग पडले. देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचा निर्णय झाला. यश दि. बा. पाटील यांना समर्पितनवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांना संघर्ष केल्याशिवाय कोणताच लाभ अद्याप मिळालेला नाही. पाच शेतकरी शहीद झाल्यानंतर १९९० मध्ये साडेबारा टक्के योजना मंजूर करण्यात आली. देशात प्रथमच संपादित केलेल्या जमिनीतील काही भाग परत देण्याचा निर्णय झाला. यानंतर आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या लढाईमुळे मोबदला न दिलेली शंभर टक्क जमीन परत मिळण्याचा निर्णय झाला असून, याचाही लाभ राज्य व देशातील प्रकल्पबाधितांना होणार असून, हे यश प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या दि. बा. पाटील यांना समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया युथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.प्रत्येक गावात जनजागृतीआगरी कोळी युथ फाऊंडेशनने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी ९५ गावांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांनी सिडकोकडून अद्याप जमीनीचा काहीही मोबदला घेतलेला नाही, त्यांनी आता शंभर टक्के जमीन परत मिळविण्यासाठीच प्रयत्न करायचे असे आवाहन केले आहे. प्रत्येक गावनिहाय अशा प्रकल्पग्रस्तांची यादी तयार केली जाणार आहे. जी जमीन संपादीत झालेली नाही त्याची माहीतीही घेतली जाणार आहे.