शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

By admin | Updated: January 25, 2016 01:28 IST

शासनाने ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा कोणताही मोबदला दिलेला नाही, त्यांना आता त्यांची १०० टक्के जमीन परत मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या

नामदेव मोरे,  नवी मुंबईशासनाने ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा कोणताही मोबदला दिलेला नाही, त्यांना आता त्यांची १०० टक्के जमीन परत मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवी मुंबईसह राज्यभरातील प्रकल्पबाधितांना मोठा दिलासा मिळणार आहे. साडेबारा टक्के योजनेनंतर भूमिपुत्रांच्या लढाईतील हे सर्वात मोठे यश ठरणार आहे. मुंबईमधील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी शासनाने पर्यायी शहर वसविण्याचा निर्णय घेतला. यासाठी ठाणे व रायगड जिल्ह्यातील ९५ गावांमधील शेतकऱ्यांची १७,००० हेक्टर जमीन अल्प किमतीमध्ये संपादित केली. जमिनी संपादित केल्यानंतर ४६ वर्षे झाली तरी अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला व साडेबारा टक्के योजनेचा लाभ झालेला नाही. या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रकल्पग्रस्त नेत्यांसोबत आगरी कोळी युथ फाउंडेशननेही पाठपुरावा सुरू केला आहे. उरण तालुक्यामधील चांजे गावामधील शेतकरी हरेश्वर मढवी यांचीही जमीन सिडकोने संपादित केली. परंतु चार दशकांमध्ये त्यांना काहीच मोबदला मिळाला नसल्याने याविषयी प्रकल्पग्रस्त चळवळीतील कार्यकर्ते अ‍ॅड. राहुल ठाकूर यानी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जमीन अधिगृण कायद्यामधील कलम २४ (२) प्रमाणे जमीन संपादित केल्यानंतर पाच वर्षांमध्ये मोबदला दिला नाही किंवा मोबदल्याची रक्कम सक्षम न्यायाधिकरणाकडे जमा केली नाही तर जमीन संपादन रद्द होते. हरेश्वर मढवी यांना ४० वर्षे होऊन गेल्यानंतरही कोणताच मोबदला दिलेला नसल्यामुळे त्यांना त्यांची जमीन परत मिळावी, असा युक्तिवाद करण्यात आला. याविषयी नवीन जमीन अधिगृहण कायद्यातील तरतूद व याविषयी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा दाखलाही देण्यात आला. न्यायालयाने १२ जानेवारी २०१६ मध्ये याविषयी निकाल शेतकऱ्याच्या बाजूने दिला आहे. उच्च न्यायालयाने दिलेला निकाल नवी मुंबई, उरण व पनवेल परिसरातील मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना होणार आहे. याशिवाय राज्यभरातील सर्व प्रकल्पबाधितांनाही त्याचा लाभ होणार आहे. सिडकोच्या स्थापनेपासून भूमिपुत्र हक्कासाठी लढा देत आहेत. आतापर्यंत जमिनीचा मोबदला व साडेबारा टक्के योजनेचा भूखंड मिळावा, यासाठी शेकडो वेळा सिडकोच्या पायऱ्या झिजविल्या होत्या. परंतु आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संपादित केलेली १०० टक्के जमीन परत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. ९५ गावांमधील काही ठिकाणची जमीन अद्याप संपादित झालेली नाही. या जमिनीचे संपादन करायचे असल्यास त्यासाठी आता पुन्हा संपादनाची प्रक्रिया राबवावी लागेल व शेतकऱ्यांना मोबदला द्यावा लागणार आहे. नवी मुंबईतील शेतकऱ्यांनी ९० दशकामध्ये संघर्ष करून साडेबारा टक्के योजना राबविण्यास शासनास भाग पडले. देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचा निर्णय झाला. यश दि. बा. पाटील यांना समर्पितनवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांना संघर्ष केल्याशिवाय कोणताच लाभ अद्याप मिळालेला नाही. पाच शेतकरी शहीद झाल्यानंतर १९९० मध्ये साडेबारा टक्के योजना मंजूर करण्यात आली. देशात प्रथमच संपादित केलेल्या जमिनीतील काही भाग परत देण्याचा निर्णय झाला. यानंतर आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या लढाईमुळे मोबदला न दिलेली शंभर टक्क जमीन परत मिळण्याचा निर्णय झाला असून, याचाही लाभ राज्य व देशातील प्रकल्पबाधितांना होणार असून, हे यश प्रकल्पग्रस्तांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या दि. बा. पाटील यांना समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया युथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.प्रत्येक गावात जनजागृतीआगरी कोळी युथ फाऊंडेशनने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी ९५ गावांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांनी सिडकोकडून अद्याप जमीनीचा काहीही मोबदला घेतलेला नाही, त्यांनी आता शंभर टक्के जमीन परत मिळविण्यासाठीच प्रयत्न करायचे असे आवाहन केले आहे. प्रत्येक गावनिहाय अशा प्रकल्पग्रस्तांची यादी तयार केली जाणार आहे. जी जमीन संपादीत झालेली नाही त्याची माहीतीही घेतली जाणार आहे.