शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

ऐतिहासिक दहीकाला उत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:38 IST

पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण बाजूला सारत घणसोली ग्रामस्थांनी सलग ११६ वर्षांपूर्वीची ऐेतिहासिक परंपरा आजही जपली जात आहे.

प्राची सोनवणे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : एकीकडे थरावर थर रचण्यासाठी सुरू असलेले राजकारण, सण-उत्सवांमध्ये केले जाणारे पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण बाजूला सारत घणसोली ग्रामस्थांनी सलग ११६ वर्षांपूर्वीची ऐेतिहासिक परंपरा आजही जपली जात आहे. मंगळवारपासून या ठिकाणी हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून सलग १६८ तास मृदुंगाचे वादन हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. थरावर थर रचण्याच्या स्पर्धेला मागे टाकत ऐतिहासिक परंपरेनुसार गावातील सहा आळ््यांपैकी एका आळीतील गोविंदांना हा दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो.घणसोली गावात कौलआळी, कोळीआळी, म्हात्रेआळी, चिंचआळी, नवघरआळी, पाटीलआळी अशा सहा गावच्या मुख्य आळ्या आहेत. ही प्रत्येक आळी दिवसातील दोन-दोन तास असे एकूण २४ तास मृदुंगाचे वादन करते. मंगळवारपासून गावातील हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून कृष्णाष्टमीला सांगता होणार आहे. थरावर थर रचून जीवावर बेतणारी अशी ही दहीहंडी साजरी न करता प्रत्येक आळीला दरवर्षी हंडी फोडण्याचा मान दिला जातो. मागील वर्षी पाटीलआळीला हा मान मिळाला असून यंदा कौलआळीचे गोविंदा हंडी फोडणार आहेत. सात वर्षांतून एकदा आळीला हंडी फोडण्याचा मान दिला जात असल्याची माहिती माजी नगरसेवक दीपक पाटील यांनी दिली. घणसोलीमधील कौलआळी येथे सुरू झालेला उत्सव तत्कालीन पूर्वजांनी सुरू केला. दूध-दुभत्याचे पदार्थ सलग टिकावे म्हणून या काळात कोरा चहा पिण्याची परंपरा पाळली जाते. शनिवार पाटील, दगडू पाटीलबुवा म्हात्रे अशा विविध स्वातंत्र्यसैनिकांनी, दत्ताजी ताम्हणे अशी लढवय्यी परंपरा असलेल्या असा आगळावेगळा उत्सव साजरा केला जात आहे.नवी मुंबईतील सर्वात मोठा औद्योगिक भाग म्हणून घणसोली हा विभाग ओळखला जातो. या विभागात खारे बेलापूर या परिसरातील कामगार घणसोलीत सहा दशकांपासून अधिक वर्षे कार्यरत आहेत. स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू आणि दत्ताजी ताम्हणे यांच्या पदस्पर्शाने हा भाग पावन झाला आहे. स्वातंत्र्यसैनिकांना निरोप, देवाण-घेवाण करणारी लहान मुलांची वानरसेना या विभागात अर्थात सोनखाडी परिसरात ब्रिटिशांच्या गोटात खळबळ माजवत होती. याच वेळी अनेक संसर्ग पसरवणाºया आजारांनी डोके वर काढले. मात्र, आजार बळावू नये म्हणून अध्यात्म्य हा मार्ग निवडून स्थानिक ग्रामस्थांनी थेट वारकरी पंथाचा आधार घेत कीर्तन-प्रवचन या कार्याला सुरुवात केली होती. या परंपरेला तडा न जाऊ देता आजही अध्यात्म आणि अभंगाची सांगड घालत एकत्र येऊन दहीकाला उत्सव साजरा केला जातो. घणसोलीवासीय आजही पुरातन काळातील ‘गवळीदेव’ या जंगलातील देवाला (श्रीकृष्णाचे रूप) पूजतात. कृष्ण जन्माष्टमीच्या सात दिवस अगोदरपासूनच अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला जातो.१९०१ साली इंग्रजांच्या काळात जमावबंदी असल्याकारणाने देशस्वातंत्र्यासाठी धडे गिरविण्याकरिता अखंड हरिनाम सप्ताहाची शक्कल लढविण्यात आली होती. या उत्सवाला स्वातंत्र्यलढ्याचीही वेगळी परंपरा आजही कायम असून गावकीतील ग्रामस्थ कुठल्याही हेतूशिवाय हा उत्सव तितक्यात उत्साहात साजरा करत आहे.- दीपक पाटील, माजी नगरसेवक.