शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

‘त्याला’ वसतिगृहाने लाथाडले

By admin | Updated: July 17, 2015 23:30 IST

येथील हातेरी या अतिदुर्गम भागातील अनाथ आणि अपंग विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ५९ टक्के गुण मिळवून पुढच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले असले तरी, पुढील शिक्षणासाठी

जव्हार : येथील हातेरी या अतिदुर्गम भागातील अनाथ आणि अपंग विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ५९ टक्के गुण मिळवून पुढच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले असले तरी, पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी आल्यावर त्याला महाविद्यालयात प्रवेश तर मिळाला, परंतु वसतिगृहातील प्रवेश मात्र नाकारला गेला. नव्हे तर त्याला अक्षरश: हाकलून लावण्यात आले. जव्हारमधील हा प्रकार उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे.या पीडित विद्यार्थ्याचे नाव श्रीराम काकड्या गवते असून शिक्षक होण्याचे ध्येय आहे. त्याला जव्हार येथील कॉलेजमध्ये तेरावीच्या वर्गात प्रवेश मिळाला. परंतु, जव्हारपासून २० किमी अंतरावरून प्रवास करून कॉलेजचे शिक्षण घेणे त्याला अशक्य असल्याने त्याने जव्हार येथील आदिवासी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी लेखी व आॅनलाइन अर्जदेखील दिला होता. अपंगासाठी राखीव जागा असल्याने त्याचा वसतिगृहातील प्रवेश नक्की होता.महाविद्यालय सुरू होऊन १५ दिवस झाल्यानंतर आपल्या सामानासह तो १५ जुलै रोजी सकाळीच वसतिगृहाच्या कार्यालयात हजर झाला. त्याच्या प्रवेशाची वसतिगृहातील कार्यालयात नोंददेखील झाली असल्यामुळे आपल्या सामानासह कार्यालयात हजर झाला. परंतु, तेथील गृहपाल बी.आर. गायकवाड यांनी त्यास अजून प्रवेशाची यादी लागली नाही. यादी लागल्यावर ये, असे उद्धटपणे सुनावले व श्रीरामला हाकलून दिले. काठीच्या आधाराने एका पायावर चालणाऱ्या श्रीराम यास सामानासह बाहेर काढल्यामुळे तो गेटच्या बाहेर रडत बसला. ही वार्ता जव्हार तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कमळाकर धूम, दयानंद लहारे यांना समजताच त्यांनी जव्हार शासकीय मुलांच्या वसतिगृहात धडक देऊन श्रीराम यास आधार दिला व तत्काळ या संतापजनक प्रकाराची माहिती जव्हार प्रकल्प अधिकारी लोमेश सलामे यांना देऊन श्रीराम यास वसतिगृहात राहण्याची परवानगी न दिल्यास कार्यालयाच बसून आंदोलन करू, असा इशारा दिला. (वार्ताहर)लालफितीचा अजब प्रकारआंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रकल्प कार्यालयातील अधिकारी खडबडून जागे झाले व सलामे यांनी गृहपाल बी.आर. गायकवाड यांना फोन करून श्रीरामला प्रवेश देण्याचे आदेश दिले. मात्र, जव्हार शासकीय वसतिगृहातील गृहपाल आर.पी. गायकवाड हे ट्रेनिंगसाठी बाहेरगावी गेले असल्याने जव्हार येथील नवीन शासकीय वसतिगृहातील गृहपाल बी.आर. गायकवाड यांच्याकडे चार्ज असल्याने त्यांना या प्रवेशासंबंधी कल्पना नसल्याची माहिती प्रकल्प कार्यालयाने दिली. मात्र, जर एखादा अपंग विद्यार्थी दूर ग्रामीण अंतरावरून जेव्हा येतो, तेव्हा त्याला सन्मानाची वागणूक देऊन राहण्याची परवानगी द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कमळाकर धूम यांनी दिली.