शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

‘त्याला’ वसतिगृहाने लाथाडले

By admin | Updated: July 17, 2015 23:30 IST

येथील हातेरी या अतिदुर्गम भागातील अनाथ आणि अपंग विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ५९ टक्के गुण मिळवून पुढच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले असले तरी, पुढील शिक्षणासाठी

जव्हार : येथील हातेरी या अतिदुर्गम भागातील अनाथ आणि अपंग विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ५९ टक्के गुण मिळवून पुढच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले असले तरी, पुढील शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी आल्यावर त्याला महाविद्यालयात प्रवेश तर मिळाला, परंतु वसतिगृहातील प्रवेश मात्र नाकारला गेला. नव्हे तर त्याला अक्षरश: हाकलून लावण्यात आले. जव्हारमधील हा प्रकार उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे.या पीडित विद्यार्थ्याचे नाव श्रीराम काकड्या गवते असून शिक्षक होण्याचे ध्येय आहे. त्याला जव्हार येथील कॉलेजमध्ये तेरावीच्या वर्गात प्रवेश मिळाला. परंतु, जव्हारपासून २० किमी अंतरावरून प्रवास करून कॉलेजचे शिक्षण घेणे त्याला अशक्य असल्याने त्याने जव्हार येथील आदिवासी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी लेखी व आॅनलाइन अर्जदेखील दिला होता. अपंगासाठी राखीव जागा असल्याने त्याचा वसतिगृहातील प्रवेश नक्की होता.महाविद्यालय सुरू होऊन १५ दिवस झाल्यानंतर आपल्या सामानासह तो १५ जुलै रोजी सकाळीच वसतिगृहाच्या कार्यालयात हजर झाला. त्याच्या प्रवेशाची वसतिगृहातील कार्यालयात नोंददेखील झाली असल्यामुळे आपल्या सामानासह कार्यालयात हजर झाला. परंतु, तेथील गृहपाल बी.आर. गायकवाड यांनी त्यास अजून प्रवेशाची यादी लागली नाही. यादी लागल्यावर ये, असे उद्धटपणे सुनावले व श्रीरामला हाकलून दिले. काठीच्या आधाराने एका पायावर चालणाऱ्या श्रीराम यास सामानासह बाहेर काढल्यामुळे तो गेटच्या बाहेर रडत बसला. ही वार्ता जव्हार तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कमळाकर धूम, दयानंद लहारे यांना समजताच त्यांनी जव्हार शासकीय मुलांच्या वसतिगृहात धडक देऊन श्रीराम यास आधार दिला व तत्काळ या संतापजनक प्रकाराची माहिती जव्हार प्रकल्प अधिकारी लोमेश सलामे यांना देऊन श्रीराम यास वसतिगृहात राहण्याची परवानगी न दिल्यास कार्यालयाच बसून आंदोलन करू, असा इशारा दिला. (वार्ताहर)लालफितीचा अजब प्रकारआंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रकल्प कार्यालयातील अधिकारी खडबडून जागे झाले व सलामे यांनी गृहपाल बी.आर. गायकवाड यांना फोन करून श्रीरामला प्रवेश देण्याचे आदेश दिले. मात्र, जव्हार शासकीय वसतिगृहातील गृहपाल आर.पी. गायकवाड हे ट्रेनिंगसाठी बाहेरगावी गेले असल्याने जव्हार येथील नवीन शासकीय वसतिगृहातील गृहपाल बी.आर. गायकवाड यांच्याकडे चार्ज असल्याने त्यांना या प्रवेशासंबंधी कल्पना नसल्याची माहिती प्रकल्प कार्यालयाने दिली. मात्र, जर एखादा अपंग विद्यार्थी दूर ग्रामीण अंतरावरून जेव्हा येतो, तेव्हा त्याला सन्मानाची वागणूक देऊन राहण्याची परवानगी द्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कमळाकर धूम यांनी दिली.