शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
2
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
3
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
4
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
5
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
6
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
7
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
8
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
9
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
10
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
11
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
12
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
13
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
14
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
15
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
16
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन्स दिले...
17
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
18
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
19
टाळ-मृदुंगात आधुनिकतेचा सूर, 'AI DIndi'तून अनुभवता येणार वारीतील नवचैतन्याची दिंडी!
20
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

वित्त संस्थांना बसणार फटका!

By admin | Updated: October 8, 2015 00:55 IST

दिघा येथील अनधिकृत इमारतींमधील घरांना गृहकर्ज देणे वित्त संस्थांना चांगलेच महागात पडणार आहे. भूमाफियांशी संगनमत करून या वित्त संस्थांनी जादा

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईदिघा येथील अनधिकृत इमारतींमधील घरांना गृहकर्ज देणे वित्त संस्थांना चांगलेच महागात पडणार आहे. भूमाफियांशी संगनमत करून या वित्त संस्थांनी जादा टक्केचे व्याज आकारून कर्ज दिल्याची शक्यता आहे. परंतु त्यावर कारवाई झाल्याने कर्जाच्या परतफेडीची शक्यता नसल्याने त्या वित्त संस्थांना फटका बसण्याची शक्यता आहे.दिघा परिसरातील ९९ अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होत आहे. एमआयडीसीने त्यापैकी तीन इमारती जमीनदोस्त केल्या असून, उर्वरित इमारतींवरदेखील टप्प्याटप्प्याने कारवाई होणार आहे. या संपूर्ण कारवाईत ३,२६० रहिवासी घरे तर २८९ दुकाने तोडली जाणार आहेत. भूमाफियांनी तिथली घरे १३ ते १५ लाखांना तर दुकाने २५ ते ३० लाखांना विकून स्वत:ची तिजोरी भरलेली आहे. तर ग्राहकांना भुरळ घालण्यासाठी वित्त संस्थांशी संगनमत करून त्यांना गृहकर्जही मिळवून दिलेले आहे. त्यानुसार निम्याहून अधिक रहिवाशांनी विविध वित्त संस्थांकडून गृहकर्ज घेतलेले आहे. त्यामध्ये सर्वाधिक पतसंस्थांचा समावेश आहे. १० ते १४ टक्के व्याज दराने गृहकर्ज देऊन जादा नफा कमवण्याच्या प्रयत्नात त्यांनी केलेला हा प्रकार आहे. अनधिकृत बांधकामांना किंवा झोपडपट्टी भागातील घरांसाठी राष्ट्रीयकृत बँका गृहकर्ज नाकारत असल्याचा फायदा अशा वित्त संस्था घेतात. त्यामुळे अनेक भूमाफियांनी अशा काही वित्तसंस्था हाताशी बाळगलेल्या आहेत. मात्र भूमाफियांशी संगनमत करून दिघा येथील अनधिकृत घरांना गृहकर्ज देणाऱ्या वित्त संस्थांना कोट्यवधींचा फटका बसणार आहे. तिथल्या एकूण घरांचे गृहकर्ज १५० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे कर्ज बुडाल्यास काही पतसंस्था डबघाईला देखील जाण्याची शक्यता आहे.दिघा येथील एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडावर काही वर्षांपूर्वी अनधिकृत चाळी उभारण्यात आल्या होत्या. याचवेळी ते भूखंड काहींच्या खाजगी मालकीचे असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांद्वारे तिथे राहणाऱ्यांना सर्व सोयी - सुविधा पुरवण्यात आल्या. यामुळेच वीज बिल, घरपट्टी अशा महत्त्वाच्या दस्तावेजांवर तिथल्या रहिवाशांची नावे नमूद आहेत. या मिलीभगत कारभाराची माहिती काहींना घर घेण्यापूर्वीच होती, तर काहींना नुकतेच कारवाईच्या नोटिसा आल्यावर हा धक्का बसला. ज्यांना या अनधिकृत इमारतींची माहिती होती, त्यांना भविष्यात ही बांधकामे नियमित होतील असा विश्वास भूमाफिया व त्यांच्यावर वरदहस्त असलेल्यांनी दाखवला होता. त्यामुळे एकमेकांच्या ओळखीने व विश्वासावर अनेकांनी तिथे घर घेतले आहे. त्यामध्ये काही जण आपले जीवनमान सुधारण्यासाठी झोपडीतून त्याठिकाणी आले होते. अशांकडे सध्या झोपडी, घर राहिले नसून अंगावर मात्र कर्जाचा डोंगर कोसळला आहे.कोट्यवधींचे गृहकर्जदिघ्यातल्या ९९ अनधिकृत इमारतींमध्ये ३,२६० घरे तर २८९ दुकाने आहेत. त्यांनी साधारण १३ ते ३० लाख रुपयांना ही घरे व दुकाने घेतलेली आहे. एकूण रहिवाशांपैकी निम्म्याहून अधिकांनी वित्त संस्थांकडून गृहकर्ज घेतलेले आहे. त्यानुसार सुमारे १५० कोटी रुपयांपर्यंत एकूण गृहकर्ज होत आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी ज्यांनी स्वत:ची दुसरी वास्तू तारण ठेवलेली आहे यांच्यापुढे पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. तर ज्यांनी दिघ्याच्याच राहत्या घरावर कर्ज घेतले त्यांच्यावर केवळ कर्जाचा भार उरला आहे.उद्ध्वस्त होतानाही लूटन्यायालयाच्या आदेशानुसार होणारी कारवाई थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी प्रत्येक सदनिकाधारकाकडून प्रति २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. हे पैसे जमा करण्यासंदर्भातली पत्रके त्याठिकाणी वाटण्यात आलेली होती. त्यामुळे संसार उद्ध्वस्त होतानाही त्यांच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न काहींनी त्या ठिकाणी केला.