शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

आंब्याची निर्यात घसरली

By admin | Updated: June 3, 2016 02:01 IST

फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आंब्याची निर्यात घसरू लागली आहे. आठ वर्षांमध्ये निर्यात पन्नास टक्क्याने कमी झाली आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबईफळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या आंब्याची निर्यात घसरू लागली आहे. आठ वर्षांमध्ये निर्यात पन्नास टक्क्याने कमी झाली आहे. बदलते हवामान, मालाचा दर्जा व इतर कारणांनी ही घसरण होत आहे. ७० टक्के व्यवसाय आखाती देशांवर अवलंबून असून दोन दशकांमध्ये नवीन बाजारपेठा शोधण्यात आलेल्या अपयशामुळेही निर्यातीवर परिणाम होऊ लागला आहे. कृषी मालाची निर्यात वाढविण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहेत. परंतु प्रत्यक्षात निर्यात वाढविण्यापेक्षा कमीच होत आहे. निर्यात घसरलेल्या कृषी मालामध्ये आंब्याचाही समावेश आहे. शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा व फळांचा राजा जगभर उपलब्ध व्हावा यासाठी दोन दशकांपासून आंब्याची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू झाली. १९९४ - ९५ मध्ये भारतामधून २५,४०६ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली होती. निर्यातीमधून ४५ कोटींची उलाढाल झाली होती. पुढील दहा वर्षे निर्यात दुप्पट झाली. एकविसाव्या शतकामध्ये जगभरातील व्यापाराची प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असे वाटले होते. २००८ मध्ये तब्बल ८३,६९८ मेट्रिक टन एवढी निर्यात झाली. १९९५ च्या तुलनेमध्ये हा आकडा तिप्पट होता. परंतु त्यानंतर सुरू झालेली घसरण अद्याप थांबलेली नाही. भारतीय आंब्याचा व्यापार अडीच दशकांपासून आखाती देशांना नजरेसमोर ठेवूनच केला जात आहे. संयुक्त अरब अमिराती, कुवेत, कतार, बहरीन या देशांमध्ये ७० टक्के निर्यात होत आहे. बहुतांश निर्यात समुद्रमार्गे होत असून आता हवाई मार्गाने निर्यातीचा टक्काही वाढला आहे. आखाती देशांव्यतिरिक्त मोठी बाजारपेठ निर्माण करण्यात अद्याप यश आलेले नाही. आंबा अमेरिकेमध्ये गेल्याचे कौतुक सर्वत्र होते. परंतु एकूण व्यापारामध्ये हा आकडा नगण्यच आहे. २०१४ - १५ मध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये २९,२३१ मेट्रिक टन निर्यात झाली होती. अमेरिकेमध्ये मात्र फक्त २७१ मेट्रिक टन निर्यात झाली होती. युरोपीयन देशांमध्ये व्यापार सुरू केला होता. परंतु दोन वर्षापूर्वी युरोपीयन देशांनी आंबा व इतर चार वस्तूंवर बंदी घातल्याने त्याचा परिणामही विदेशी व्यापारावर झाला आहे. निर्यातदार जास्तीत जास्त आंबा निर्यात करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक वर्षी हंगाम संपला की येणाऱ्या अडचणी शासनाकडे मांडल्या जात आहे. शासनही आता सहकार्य करू लागले आहे. परंतु त्यानंतरही निर्यात वाढत नाही. आंबा निर्यात वाढली तर देशांतर्गत मार्केटमध्येही चांगला बाजारभाव उपलब्ध होवू शकतो. यामुळे निर्यात वाढविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.