शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
4
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
5
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
6
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
7
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
8
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
9
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
10
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
11
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
12
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
13
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
14
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
15
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
16
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
17
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
18
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
19
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

महापालिकेमधील कंत्राटी शिक्षकांना दिलासा

By admin | Updated: July 7, 2017 06:42 IST

महापालिकेच्या शाळांमध्ये सहा महिन्यांपासून विनावेतन ज्ञानदानाचे काम करणाऱ्या १२२ शिक्षकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेच्या शाळांमध्ये सहा महिन्यांपासून विनावेतन ज्ञानदानाचे काम करणाऱ्या १२२ शिक्षकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. शिक्षकांना वेतन देण्यात यावे व चार आठवड्यात थकबाकीही दिली जावी असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. शिक्षण मंडळाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे हे शक्य झाले असून यामुळे शिक्षकांची उपासमार थांबणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याने २०११ मध्ये पाच हजार रुपये ठोक मानधनावर १९६ शिक्षकांची नियुक्ती केली होती. शाळेत साफसफाई करणाऱ्या कंत्राटी कामगारांना १० हजार रुपये व ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना ५ हजार रुपये वेतन दिले जात होते. यामुळे काहींनी नोकरी सोडली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून गरीब घरातून आलेल्या १२२ शिक्षकांनी मात्र प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे काम सुरू ठेवले होते. काही शिक्षकांनी नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला तर अनेकांनी शाळा सुटल्यानंतर छोटी - मोठी कामे करून भाड्याच्या घरामध्ये वास्तव्य केले होते. प्रशासन व राज्यकर्त्यांकडे पाठपुरावा करून पहिल्यांदा सात हजार व नंतर १२ हजार रुपये वेतन मंजूर करून घेण्यात यश मिळविले होते. एक वर्षापूर्वी तुकाराम मुंढे आयुक्त झाल्यानंतर या कामगारांची भरती वशिलेबाजीने झाली असल्याचे सांगून त्यांना कामावरून कमी करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. नोकरी जाणार या भीतीने शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शासनाकडून कायमस्वरूपी शिक्षक येईपर्यंत आम्हाला नोकरीवर कायम ठेवावे अशी मागणी केली होती. ठोक मानधनावरील शिक्षकांनी आॅक्टोबरमध्ये न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी प्रशासनाने आम्हाला या शिक्षकांची गरज नसून आम्ही शासनाकडे कायमस्वरूपी शिक्षकांची मागणी केली असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु शिक्षकांनी अद्याप कायमस्वरूपी शिक्षक आलेले नाहीत. ते शिक्षक येईपर्यंत आम्ही विनावेतन काम करण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. तेव्हापासून तब्बल सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ वेतन न घेता विद्यादानाचे काम सुरू केले. अनेक अडचणी आल्या. घराचे भाडे देणे अशक्य झाले. कर्ज घेवून दोन वेळच्या अन्नाची सोय करावी लागली तरीही शिक्षकांनी ज्ञानदानाचे काम थांबविले नाही. गुरुवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये महापालिकेनेही या शिक्षकांना वेतन देण्यास आमची हरकत नसल्याची सकारात्मक भूमिका मांडली. यामुळे न्यायालयाने शिक्षकांना वेतन सुरू करावे व मागील थकीत रक्कम चार आठवड्यात देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षकांनी महापालिका आयुक्त,महापौर, विरोधी पक्षनेते यांच्यासह सर्वांचेच आभार मानले आहेत. आयुक्तांची भूमिका महत्त्वाचीमहापालिकेचे यापूर्वीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या कडक भूमिकेमुुळे १२२ शिक्षकांवर बेकार होण्याची वेळ आली होती. नोकरी वाचविण्यासाठी शिक्षकांना उच्च न्यायालयात जावे लागले व विनावेतन काम करावे लागले होते. विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनी शिक्षकांविषयी सकारात्मक भूमिका घेतली व प्रशासनाने उच्च न्यायालयामध्ये वेतन देण्यास अनुकूलता दाखविल्यामुळे उपासमार सुरू असलेल्या शिक्षकांना न्याय मिळण्यास मदत झाली.ठोक मानधनावरील शिक्षकांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सहा महिने विनावेतन काम केल्याने अक्षरश: उपासमारीची वेळ आली होती. परंतु प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे सर्व शिक्षकांना न्याय मिळाला असून यासाठी सहकार्य केलेल्या आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेते व सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. - सिद्धार्थ शिलवंत, शिक्षक प्रतिनिधी