शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

द्रोणागिरी नोडच्या विकासात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:51 IST

सिडकोचा गलथान कारभार; खारफुटी क्षेत्रातील भूखंडवाटपाचा फटका

नवी मुंबई : द्रोणागिरी हा सिडकोचा सर्वात मोठा नोड म्हणून विकसित केला जात आहे. त्यानुसार मागील दोन वर्षांपासून सिडकोने येथील पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यानंतरही द्रोणागिरीच्या विकासाला अपेक्षित चालना मिळताना दिसत नाही. अनेक बांधकाम प्रकल्प जैसे थे अवस्थेत आहेत. विकासक आणि गुंतवणूकदार वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.दहा वर्षांपूर्वी सिडकोच्या माध्यमातून या विभागात सदोष पद्धतीने साडेबारा टक्के योजनेतील भूखंडांचे वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेले बहुतांशी भूखंड खारफुटीत मोडत असल्याने या भूखंडाचा विकास रखडला आहे. हे भूखंड बदलून देण्यासंदर्भात मागील दोन वर्षांपासून सिडकोत चर्चा आहे. मात्र, कोणतीही कार्यवाही होत नसल्याने द्रोणागिरीच्या विकासात मोठा अडथळा निर्माण झाल्याचे विकासकांचे म्हणणे आहे.नवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने सिडकोच्या माध्यमातून येथील शेतजमिनी संपादित केल्या. या संपादित जमिनीच्या मोबदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना विकसित साडेबारा टक्के भूखंड देण्याचे धोरण राज्य शासनाने जाहीर केले. त्यानुसार मागील ३० वर्षांपासून साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वाटप केले जात आहे. या योजनेअंतर्गत मागील काही वर्षांत सिडकोने द्रोणागिरी नोडमध्ये २५० पेक्षा अधिक भूखंडांचे वाटप केले आहे; परंतु हे सर्व भूखंड ना विकास क्षेत्रात देण्यात आले आहेत. प्रकल्पग्रस्तांनी त्रिपक्षीय करार करून हे भूखंड विकासकांना विकले आहेत. मात्र, त्यावर बांधकाम करण्यास परवानगी मिळत नसल्याने विकासकांची कोंडी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोने दिलेले भूखंड बदलून देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त आणि विकासक करीत आहेत.नवी मुंबई विमानतळ व न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे द्रोणागिरी नोडला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे द्रोणागिरी नोडच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने सिडको प्रशासनाने भूखंड बदलून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हे भूखंड बदलून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार द्रोणागिरी नोडमध्ये एक मोठा भूखंड शोधण्याच्या सूचना भूमी व भूमापन विभागाला दिल्या आहेत.मात्र, दोन वर्षे उलटली तरी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे भूधारक आणि विकासक हवालदिल झाले आहेत.सदोष भूखंडवाटपाचा फटकासिडकोने २००८ मध्ये द्रोणागिरी विभागातील सुमारे २६० प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेतील भूखंडाचे वाटप केले. जागेचा प्रत्यक्ष सर्व्हे न करताच या भूखंडांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे यातील बहुतांशी भूखंड खारफुटी क्षेत्रात आहेत. तर काही भूखंडांवर अतिक्रमण आहे.कोट्यवधींचे भूखंड धूळखातसिडकोच्या माध्यमातून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. रस्ते, नाले, गटारे, उद्याने व क्रीडांगणाचे कामे अगदी वेगाने सुरू आहेत. तसेच या विभागात सिडकोने मोठमोठे गृहप्रकल्पही प्रस्तावित केले आहेत. असे असतानाही पूर्वी वाटप झालेल्या साडेबारा टक्के योजनेतील भूखंडांचा प्रश्न जैसे आहे.बांधकाम परवानगी मिळत नसल्याने शेकडो भूखंड विकासाअभावी पडून आहेत. शेकडो कोटींचे भूखंड अशाप्रकारे धूळखात पडल्याने विकासक आणि गुंतवणूकदार धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोने या प्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे.

टॅग्स :cidcoसिडको