शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

द्रोणागिरी नोडच्या विकासात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:51 IST

सिडकोचा गलथान कारभार; खारफुटी क्षेत्रातील भूखंडवाटपाचा फटका

नवी मुंबई : द्रोणागिरी हा सिडकोचा सर्वात मोठा नोड म्हणून विकसित केला जात आहे. त्यानुसार मागील दोन वर्षांपासून सिडकोने येथील पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यानंतरही द्रोणागिरीच्या विकासाला अपेक्षित चालना मिळताना दिसत नाही. अनेक बांधकाम प्रकल्प जैसे थे अवस्थेत आहेत. विकासक आणि गुंतवणूकदार वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.दहा वर्षांपूर्वी सिडकोच्या माध्यमातून या विभागात सदोष पद्धतीने साडेबारा टक्के योजनेतील भूखंडांचे वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेले बहुतांशी भूखंड खारफुटीत मोडत असल्याने या भूखंडाचा विकास रखडला आहे. हे भूखंड बदलून देण्यासंदर्भात मागील दोन वर्षांपासून सिडकोत चर्चा आहे. मात्र, कोणतीही कार्यवाही होत नसल्याने द्रोणागिरीच्या विकासात मोठा अडथळा निर्माण झाल्याचे विकासकांचे म्हणणे आहे.नवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने सिडकोच्या माध्यमातून येथील शेतजमिनी संपादित केल्या. या संपादित जमिनीच्या मोबदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना विकसित साडेबारा टक्के भूखंड देण्याचे धोरण राज्य शासनाने जाहीर केले. त्यानुसार मागील ३० वर्षांपासून साडेबारा टक्के योजनेअंतर्गत प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वाटप केले जात आहे. या योजनेअंतर्गत मागील काही वर्षांत सिडकोने द्रोणागिरी नोडमध्ये २५० पेक्षा अधिक भूखंडांचे वाटप केले आहे; परंतु हे सर्व भूखंड ना विकास क्षेत्रात देण्यात आले आहेत. प्रकल्पग्रस्तांनी त्रिपक्षीय करार करून हे भूखंड विकासकांना विकले आहेत. मात्र, त्यावर बांधकाम करण्यास परवानगी मिळत नसल्याने विकासकांची कोंडी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोने दिलेले भूखंड बदलून देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त आणि विकासक करीत आहेत.नवी मुंबई विमानतळ व न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे द्रोणागिरी नोडला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे द्रोणागिरी नोडच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने सिडको प्रशासनाने भूखंड बदलून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हे भूखंड बदलून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. त्यानुसार द्रोणागिरी नोडमध्ये एक मोठा भूखंड शोधण्याच्या सूचना भूमी व भूमापन विभागाला दिल्या आहेत.मात्र, दोन वर्षे उलटली तरी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे भूधारक आणि विकासक हवालदिल झाले आहेत.सदोष भूखंडवाटपाचा फटकासिडकोने २००८ मध्ये द्रोणागिरी विभागातील सुमारे २६० प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के योजनेतील भूखंडाचे वाटप केले. जागेचा प्रत्यक्ष सर्व्हे न करताच या भूखंडांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे यातील बहुतांशी भूखंड खारफुटी क्षेत्रात आहेत. तर काही भूखंडांवर अतिक्रमण आहे.कोट्यवधींचे भूखंड धूळखातसिडकोच्या माध्यमातून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. रस्ते, नाले, गटारे, उद्याने व क्रीडांगणाचे कामे अगदी वेगाने सुरू आहेत. तसेच या विभागात सिडकोने मोठमोठे गृहप्रकल्पही प्रस्तावित केले आहेत. असे असतानाही पूर्वी वाटप झालेल्या साडेबारा टक्के योजनेतील भूखंडांचा प्रश्न जैसे आहे.बांधकाम परवानगी मिळत नसल्याने शेकडो भूखंड विकासाअभावी पडून आहेत. शेकडो कोटींचे भूखंड अशाप्रकारे धूळखात पडल्याने विकासक आणि गुंतवणूकदार धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर सिडकोने या प्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे.

टॅग्स :cidcoसिडको