शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

स्मार्ट सिटीपुढे लोकसंख्येचे आव्हान

By admin | Updated: July 11, 2016 02:29 IST

प्रस्तावित विमानतळ व नैना प्रकल्पामुळे पुढील दोन दशकांमध्ये देशातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ पनवेल तालुक्यामध्ये होणार आहे. सद्य:स्थितीमध्ये या परिसराची लोकसंख्या

नामदेव मोरे, नवी मुंबई प्रस्तावित विमानतळ व नैना प्रकल्पामुळे पुढील दोन दशकांमध्ये देशातील सर्वाधिक लोकसंख्या वाढ पनवेल तालुक्यामध्ये होणार आहे. सद्य:स्थितीमध्ये या परिसराची लोकसंख्या ६ लाख ९२ हजार असून, सिडकोच्या अंदाजाप्रमाणे २०३१ मध्ये हा आकडा २० लाख होणार आहे. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला पिण्यासाठी पाणी पुरविण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण वाहिन्या, उद्यान, मैदान व इतर अत्यावश्यक सुविधा पुरविताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. केंद्र शासनाने स्मार्ट सिटी स्पर्धेची घोषणा करताच सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून दक्षिण नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा केली. वास्तविक दक्षिण नवी मुंबई नावाचे कोणतेही शहर अस्तित्वात नाही. ज्या नोडच्या विकासाचे मॉडेल मांडण्यात आले तो पनवेल तालुक्याचा भाग असून, पनवेल हे नाव बदलणे कोणालाही शक्य होणार नाही. सिडकोने स्मार्ट सिटीसाठी जी पुस्तिका प्रकाशित केली, त्यामध्येच स्मार्ट सिटीसमोरील आव्हानांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. १९५१ मध्ये पनवेल तालुक्याची लोकसंख्या ९१,३८६ एवढी होती. तेव्हाच्या कुलाबा जिल्ह्यात अलिबाग, महाड व मानगावनंतर पनवेलचा नंबर येत होता. परंतु २०११ मध्ये पनवेलची लोकसंख्या तब्बल ६ लाख ९२ हजार झाली आहे. महाराष्ट्रात हवेलीनंतर सर्वात जास्त लोकसंख्या पनवेल तालुक्यात वाढली आहे. भविष्यात येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो व इतर अनेक महत्त्वाचे प्रकल्प येत आहेत. घर बांधण्यासाठी नैना परिसरामध्ये मुबलक जमीन असल्याने शहरीकरण झपाट्याने वाढणार आहे. सिडकोच्या अंदाजाप्रमाणे २०३१ पर्यंत लोकसंख्या २० लाखांपेक्षा जास्त होणार आहे. नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये वाढणाऱ्या लोकसंख्येला पिण्यासाठी पाणी देणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. पनवेल परिसरातील नागरिकांना पाणी पुरविण्यास सिडको व नगरपालिकेला अपयश आले आहे. परिसरासाठी २१६ एमएलडी पाण्याची आवश्यकता असून, प्रत्यक्षात १८३ एमएलडी पाणी उपलब्ध आहे. २०३१ मध्ये लोकसंख्या २० लाख होणार असून, रोज ९०० एमएलडी पाणी लागणार आहे. १५ वर्षांमध्ये ७०० एमएलडीपेक्षा जास्त पाणी कोठून आणणार, हा प्रश्न आहे. सिडकोने बाळगंगा, कोंढाणे, हेटवणे, बारवी, एमजेपीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु बाळगंगा व कोंढाणे धरणाचे काम सिंचन घोटाळ्याच्या चौकशीमुळे सुरू झालेले नाही. हेटवणेची उंची वाढविण्यासाठी जमीन संपादनही झालेले नसल्याने पाणीप्रश्न कसा सोडवायचा, हा प्रश्नच आहे. पाणी येणार कोठून?सिडकोने नैना व विमानतळ परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रचंड मोठी गुंतवणूक करण्याचे निश्चित कले आहे. बाळगंगा धरणासाठी ७०० कोटी, जमीन संपादनासाठी १,१०५ कोटी, कोंढाणे धरणासाठी १ हजार कोटी, हेटवणेसाठी १५० कोटी, एमजेपीसाठी १३९ कोटी, बारवीसाठी १५० कोटी रुपये अशाप्रकारे ३,२४४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. परंतु वास्तवामध्ये सिंचन घोटाळ्यामुळे प्रस्तावित धरणांचे काम सुरूच झाले नाही. यामुळे धरणच नाही तर पाणी कोठून येणार, असा प्रश्न आहे. पनवेल तालुक्याचे पूर्णपणे शहरीकरण झाले आहे. शहर वाढत असताना येथील घनकचरा व्यवस्थापनासाठी काहीच उपाययोजना केलेली नाही. सद्य:स्थितीमध्ये कचऱ्याची शास्त्रोक्तपद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंडच नाही. तळोजामधील डम्पिंग ग्राउंडला नागरिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे भविष्यात या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी व कुठे लावायची, याविषयी काहीच नियोजन नाही. पनवेल तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यास सिडको व शासनाला अपयश आले आहे. प्रस्तावित स्मार्ट सिटीमध्ये एकही सरकारी सुपर स्पेशालिटी रुग्णालय नाही. नागरी आरोग्य केंद्र, माता-बाल रुग्णालय, जनरल रुग्णालयांची सुविधाच नाही.