शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावांनी गाठला तळ

By admin | Updated: May 15, 2016 04:03 IST

जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका म्हणून कर्जतची ओळख आहे. मात्र पावसाचे पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसते. सद्य:स्थितीत तालुक्यातील सहा पाझर तलावांनी तळ गाठले आहेत

विजय मांडे, कर्जतजिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका म्हणून कर्जतची ओळख आहे. मात्र पावसाचे पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसते. सद्य:स्थितीत तालुक्यातील सहा पाझर तलावांनी तळ गाठले आहेत. तसेच तीन लघु पाटबंधारे प्रकल्प असलेली धरणेदेखील आटली आहेत. दोन मध्यम प्रकल्प असलेल्या धरणांमधील पाण्याची पातळी खालावल्याने कर्जतमधील जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कर्जत तालुक्यात खांडस, आर्ढे, वरई-अवसरे, कशेळे, जांबरु ख, अंभेरपाडा या ठिकाणी डोंगराचे पाणी अडवून पाझर तलावांची निर्मिती रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १९८० च्या दशकात करण्यात आली. त्याच कालावधीत खांडपे, डोंगरपाडा आणि बलीवरे येथे जिल्हा परिषदेने लघु पाटबंधारे प्रकल्पांची उभारणी सुरू केली. हे सर्व पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे प्रकल्प यांचे पाणी शेतीसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते. राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने पाली-भूतीवली आणि पाषाणे या ठिकाणी उच्चस्तर लघु पाटबंधारे प्रकल्प उभारून पावसाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न केला आहे . मात्र गतवर्षीच्या कमी पावसाने तालुक्यातील पाणीसाठा करणारी सर्व धरणे सध्या कोरडी पडू लागली आहेत. त्यामुळे पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे प्रकल्पातून नाल्यामध्ये किंवा नदीमध्ये सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. धरणातील पाणी पूर्णपणे आटून गेले, तर धरणाच्या जलाशयातील पाण्यामध्ये असलेल्या सजीवांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. जलाशय कोरडे पडल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना कोलमडून पडल्या आहेत. उद्भव विहिरी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नदी किंवा नाल्यात वाहणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे. पाली - भूतीवली या लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयात खासगी बिल्डर एकाच वेळी अनेक मोटर लावून पाणी उचलतात. मात्र ज्यांनी धरणासाठी, पाझर तलाव बांधण्यासाठी जमिनी दिल्या, त्यांच्या नळपाणी योजना धरणापासून दूर उभारण्यात आल्या आहेत. तालुक्यातील २०० हून अधिक आदिवासीवाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे.झाडे आणि वनराईने नटलेल्या तालुक्यातील पावसाचे पाणी अडविण्याची मोहीम राज्य सरकार आणि रायगड जिल्हा परिषदेने १९८० च्या दशकात घेतली होती. कर्जत तालुक्याच्या सर्व भागांत पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे प्रकल्प यांच्या माध्यमातून पाणी अडविण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. त्यातील सर्व प्रकल्प हे जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आले होते. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाझर तलाव आहेत, पण तरीही तालुक्यात तीव्र पाणीटंचाईस जनतेला सामोरे जावे लागत आहे. आता थेट धरणामधून पाणी उचलण्याची व्यवस्था करण्यासाठी नवीन नळपाणी योजनांचा विचार झाला पाहिजे. - उदय पाटील, शेतकरी