शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

एपीएमसीत पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:56 IST

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नाही.

नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहने उभी करण्यासाठी जागाच नाही. यामुळे मार्केटच्या बाहेरील मुख्य रोडवर वाहने उभी केली जात असून त्यामुळे प्रचंड वाहतूककोेंडी होवू लागली आहे. यामुळे नाल्यावर वाहनतळ विकसित करण्यात यावा, अशी मागणी व्यापाºयांनी केली असून पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडेही याविषयी निवेदन दिले आहे.राज्यातील ३९५ बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. ७२ हेक्टर जमिनीवर कांदा, बटाटा, भाजी, फळ, मसाला व धान्य मार्केटच्या इमारती उभारल्या आहेत. मार्केटमध्ये रोज ३ ते ४ हजार ट्रकमधून कृषी मालाची आवक होते. तेवढ्याच वाहनांमधून माल मुंबई, नवी मुंबईमध्ये नेला जात आहे. पाच ते सहा हजार अवजड वाहनांनी या परिसरामध्ये ये-जा असते. याशिवाय व्यापारी, माथाडी कामगारांची पाच ते सहा हजार वाहनेही मार्केटमध्ये व मार्केटच्या बाहेर उभी केली जात आहेत.वाहनांची संख्या प्रचंड वाढली असल्याने वाहने उभी करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. परिणामी अन्नपूर्णा चौक ते माथाडी भवन, अन्नपूर्णा चौक ते तुर्भे स्मशानभूमी, विस्तारित भाजी मार्केट, एसटी, डेपोकडील रोडवर मोटारसायकल व इतर वाहने मोठ्या प्रमाणात उभी करण्यात येत आहेत. मार्केट आवारामध्ये मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने कृषी माल घेवून येणारी व माल घेवून जाणाºया वाहनांना जागाच उपलब्ध होत नाही. रोजच्या वाहतूककोेंडी व अपघातामुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. वाहतूककोंडी फोडण्यासाठी नवीन वाहनतळ उभा करण्याची मागणी केली जात आहे. व्यापाºयांनी बाजार समिती प्रशासनाकडेही याविषयी मागणी केली आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे.महापालिका आयुक्तांनी गुरुवारी बाजार समितीला भेट दिली. वाहतूक पोलीस चौकी ते माथाडी भवनच्या रोडवर अनधिकृतपणे फेरीवाले बसत आहेत. या फेरीवाल्यांवर कारवाई करून सर्व्हिस रोड खाजगी वाहने उभी करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा. मसाला व भाजी मार्केटच्या बाहेरील नैसर्गिक नाल्यावर स्लॅब टाकून दोन वाहनतळ विकसित करण्यात यावेत. यामुळे नाल्यामध्ये कोणी कचरा टाकणार नाही. कचºयामुळे होणारी दुर्गंधी थांबेल अशी सूचना व्यापाºयांनी केली आहे. नाल्यावर वाहनतळ विकसित झाला तर कार व दुचाकींच्या पार्किंगचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पार्किंगचा प्रश्न सुटला नाही तर भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही व्यापाºयांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.