शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

५६ नवीन शाळांना मान्यता

By admin | Updated: June 21, 2016 01:28 IST

सरकारने रायगड जिल्ह्यात सुमारे ५६ नवीन शाळांना, तर २७ शाळांचा दर्जा वाढविण्यास मान्यता दिली आहे. मात्र या शाळांना सरकार कोणत्याही प्रकारचा निधी अथवा अनुदान देणार नाही.

आविष्कार देसाई,  अलिबागसरकारने रायगड जिल्ह्यात सुमारे ५६ नवीन शाळांना, तर २७ शाळांचा दर्जा वाढविण्यास मान्यता दिली आहे. मात्र या शाळांना सरकार कोणत्याही प्रकारचा निधी अथवा अनुदान देणार नाही. सरकारने अशा शाळांना परवानगी देणे म्हणजे खासगी शैक्षणिक संस्थांना आर्थिक कुरण देण्यासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालकवर्गातून व्यक्त केली जात आहे. मराठी माध्यमातून शिक्षण देण्याची ओरड सर्वत्र सुरु असतानाच मात्र या नवीन यादीमध्ये तब्बल ४९ इंग्रजी माध्यमाच्या आणि फक्त सात मराठी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे, असे असले, तरी सेमी इंग्रजी माध्यमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. स्वयंअर्थसहायित तत्त्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच उच्च प्राथमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेचा दर्जावाढ करण्याचा विचार सरकार करीत होते. मात्र नव्याने अशा कोणत्याही शाळांना मान्यता देण्यात शिक्षण मंत्रालय राजी नव्हते. विविध शिक्षण संस्थांच्या हट्टापायी सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या शिक्षण क्षेत्रात होत आहे. जिल्ह्यात झपाट्याने शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे तेथे आपल्या संस्थेची शाळा असावी असे जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील शिक्षण संस्थांना वाटत होते. यासाठीच त्यांनी नवीन शाळांना आणि दर्जावाढीसाठी शिक्षण विभागाकडे अर्ज दाखल केले होते.रायगड जिल्ह्यामध्ये गतवर्षी तीन हजार २९१ मराठी माध्यमाच्या शाळांची सर्वाधिक संख्या होती. मराठी माध्यमातून शिक्षण घेणारे तब्बल तीन लाख ३९ हजार ५४८ विद्यार्थी होते, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या ही ३३७ होती. याद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही दीड लाखाच्या आसपास होती. सरकारने नव्याने मान्यता दिलेल्या शाळांची संख्या ५६ आहे. त्यामध्ये ४९ इंग्रजी आणि सात मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. २७ शाळांचा दर्जा वाढविण्यात आला आहे. त्यामध्ये सात मराठी आणि एका उर्दू शाळेसह १९ इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या शाळांना सरकार कोणतेही अनुदान देणार नाही. संबंधित शिक्षण संस्थेने यासाठीचा सर्व खर्च करायचा आहे. रायगड जिल्ह्यातील ५३ शैक्षणिक संस्था, तर ३३ शैक्षणिक संस्था या परजिल्ह्यातील आहेत. या निर्णयाने शैक्षणिक संस्था आर्थिकदृष्ट्या गब्बर होणार असल्याचे बोलले जाते. एकदा का शाळा सुरु करण्याची परवानगी प्राप्त झाली की या शैक्षणिक संस्था सरकारला जुमानत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत.