शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

३०० हेक्टर भातशेती पडीक

By admin | Updated: May 11, 2016 02:17 IST

तालुक्यातचे भौगोलिक क्षेत्र २६ हजार ५२५ हेक्टर असून, शहरी ३ किमी व ग्रामीण ४२ किमी सागरीकिनारा लाभलेल्या तालुक्यात ७५ गावे व ७५ हजार लोकसंख्या आहे

मुरुड : तालुक्यातचे भौगोलिक क्षेत्र २६ हजार ५२५ हेक्टर असून, शहरी ३ किमी व ग्रामीण ४२ किमी सागरीकिनारा लाभलेल्या तालुक्यात ७५ गावे व ७५ हजार लोकसंख्या आहे. भातशेती व मासेमारी हा लोकांचा प्रमुख व्यवसाय. भातशेती क्षेत्र तालुक्यात ३ हजार ९०० हेक्टर केवळ कागदावर उरले आहे. उधाणाचे पाणी शेतात घुसून सुमारे ७०० ते ८०० हेक्टर जमीन खारफुटी तसेच खाजणाने व्यापाली आहे. प्रत्यक्षात २,९०० हेक्टर भातशेती लागवडीखाली आहे. याचा अर्थच असा की सुमारे ३०० हेक्टरहून अधिक जमीन लागवडीखाली नाही. भाताला योग्य हमी भाव मिळत नसल्याने भात शेती परवडत नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे भाताचे कोठार असलेल्या मुरूड तालुक्यात भात क्षेत्र कमी होत आहे.अत्यल्प भूधारकांना शासकीय पातळीवर प्रोत्साहन पर आर्थिक साहाय्य देऊ केल्यास पडीक क्षेत्र भातशेतीखाली वा पीक पद्धतीत बदल करून लावगडीयोग्य करता येईल. श्रमाला प्रतिष्ठा असून शेतीतून सोने पिकविता येईल, असा विश्वास देण्यासाठी लोकप्रबोधनाची गरज आहे. कृषी विभागातर्फे असे प्रयत्न व्हावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. शेती धारण क्षेत्राचा विचार करीत १५ ते २० गुंठे इतके अल्पभूधारक असलेल्यांची संख्या ७५ ते ८० टक्के इतकी असून, १ एकर क्षेत्र असलेल्यांची संख्या २० ते २५ टक्के एवढी भरते. १ एकर क्षेत्र असलेली जमीन लागवडीखाली आहे. भात शेती पडीक राहण्याचे मुख्य कारण म्हणजे शेती लागवडीसाठी लागणारा खर्च आणि खरीप हंगामात मिळणारे आताचे उत्पन्न याचे प्रमाण व्यस्त आहे. शेत लागवडीखाली नांगरणी, रानभाजणी, संकरीत भाताचे वाण पेरणी, लावणी, रासायनिक खते, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, कापणी, मळणी आदींचा खर्च प्रतिएकरी १३ हजार ते १३ हजार ५०० इतका येतो. तर प्रत्यक्ष प्रति एकरी भाताचे उत्पन्न जेमतेम १२ हजार ते १२ हजार ५०० इतकेच मिळते. तत्पर्य भातशेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्याचा समजतात. शासनाकडून भाताला हमीभाव नाही. प्रति क्विंटल एक हजाराने भात विकावे लागल्यावर अगतिक शेतकरी कसा जगणार, अशी प्रतिक्रिया खार आंबोलीचे सरपंच मनोज कमाने यांनी दिली. त्यांच्या मते पाणलोट योजनेचा कालावधी संपत आला तरी अनुदान न मिळणे ही क्रूर थट्टा आहे. (वार्ताहर)