शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

३०० हेक्टर भातशेती पडीक

By admin | Updated: May 11, 2016 02:17 IST

तालुक्यातचे भौगोलिक क्षेत्र २६ हजार ५२५ हेक्टर असून, शहरी ३ किमी व ग्रामीण ४२ किमी सागरीकिनारा लाभलेल्या तालुक्यात ७५ गावे व ७५ हजार लोकसंख्या आहे

मुरुड : तालुक्यातचे भौगोलिक क्षेत्र २६ हजार ५२५ हेक्टर असून, शहरी ३ किमी व ग्रामीण ४२ किमी सागरीकिनारा लाभलेल्या तालुक्यात ७५ गावे व ७५ हजार लोकसंख्या आहे. भातशेती व मासेमारी हा लोकांचा प्रमुख व्यवसाय. भातशेती क्षेत्र तालुक्यात ३ हजार ९०० हेक्टर केवळ कागदावर उरले आहे. उधाणाचे पाणी शेतात घुसून सुमारे ७०० ते ८०० हेक्टर जमीन खारफुटी तसेच खाजणाने व्यापाली आहे. प्रत्यक्षात २,९०० हेक्टर भातशेती लागवडीखाली आहे. याचा अर्थच असा की सुमारे ३०० हेक्टरहून अधिक जमीन लागवडीखाली नाही. भाताला योग्य हमी भाव मिळत नसल्याने भात शेती परवडत नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे भाताचे कोठार असलेल्या मुरूड तालुक्यात भात क्षेत्र कमी होत आहे.अत्यल्प भूधारकांना शासकीय पातळीवर प्रोत्साहन पर आर्थिक साहाय्य देऊ केल्यास पडीक क्षेत्र भातशेतीखाली वा पीक पद्धतीत बदल करून लावगडीयोग्य करता येईल. श्रमाला प्रतिष्ठा असून शेतीतून सोने पिकविता येईल, असा विश्वास देण्यासाठी लोकप्रबोधनाची गरज आहे. कृषी विभागातर्फे असे प्रयत्न व्हावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. शेती धारण क्षेत्राचा विचार करीत १५ ते २० गुंठे इतके अल्पभूधारक असलेल्यांची संख्या ७५ ते ८० टक्के इतकी असून, १ एकर क्षेत्र असलेल्यांची संख्या २० ते २५ टक्के एवढी भरते. १ एकर क्षेत्र असलेली जमीन लागवडीखाली आहे. भात शेती पडीक राहण्याचे मुख्य कारण म्हणजे शेती लागवडीसाठी लागणारा खर्च आणि खरीप हंगामात मिळणारे आताचे उत्पन्न याचे प्रमाण व्यस्त आहे. शेत लागवडीखाली नांगरणी, रानभाजणी, संकरीत भाताचे वाण पेरणी, लावणी, रासायनिक खते, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, कापणी, मळणी आदींचा खर्च प्रतिएकरी १३ हजार ते १३ हजार ५०० इतका येतो. तर प्रत्यक्ष प्रति एकरी भाताचे उत्पन्न जेमतेम १२ हजार ते १२ हजार ५०० इतकेच मिळते. तत्पर्य भातशेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्याचा समजतात. शासनाकडून भाताला हमीभाव नाही. प्रति क्विंटल एक हजाराने भात विकावे लागल्यावर अगतिक शेतकरी कसा जगणार, अशी प्रतिक्रिया खार आंबोलीचे सरपंच मनोज कमाने यांनी दिली. त्यांच्या मते पाणलोट योजनेचा कालावधी संपत आला तरी अनुदान न मिळणे ही क्रूर थट्टा आहे. (वार्ताहर)