शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

प्रकल्पग्रस्तांचा २०३८ एकर जमिनीसाठी लढा सुरू

By admin | Updated: May 7, 2017 06:30 IST

शासनाने संपादित केलेल्या जमिनीमधील साडेबारा टक्के भूखंड प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचा निर्णय घेतला; परंतु प्रत्यक्षात

नामदेव मोरे / लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शासनाने संपादित केलेल्या जमिनीमधील साडेबारा टक्के भूखंड प्रकल्पग्रस्तांना परत देण्याचा निर्णय घेतला; परंतु प्रत्यक्षात ८.७५ टक्के जमीन परत दिली व ३.७५ टक्के जमीन सामाजिक सुविधेसाठी राखून ठेवली. आतापर्यंत तब्बल २०३८ एकर जमीन सिडकोने त्यांच्याकडे राखून ठेवली असून त्यामधील फक्त ३७ एकर प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांना दिली आहे. उर्वरित जमिनीचा वापर आमच्यासाठी केला नसेल तर ती परत मिळविण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला असून आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी १९८४मध्ये जासईमध्ये केलेल्या तीव्र आंदोलनामध्ये पाच शेतकरी हुतात्मा झाले व ३८ जण गंभीर जखमी झाले. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने संपादित केलेल्या जमिनीपैकी १२.५ टक्के जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. देशामध्ये संपादित केलेल्या जमिनीपैकी काही भाग परत देण्याचा निर्णय पहिल्यांदा झाला. ७ मार्च १९९० मध्ये शासनाने हा निर्णय घेतला. सिडकोला २७ वर्षांमध्ये अद्याप सर्व भूखंडाचे वाटप होऊ शकले नाही. भूखंड वितरीत करताना पूर्ण साडेबारा टक्के जमीन दिली नाही. शेतकऱ्यांना ८.७५ टक्के जमीन परत दिली व उरलेली ३.७५ टक्के जमीन सामाजिक सुविधेसाठी राखून ठेवली. प्रकल्पग्रस्तांची ५४ हजार ३१३ एकर जमीन संपादित केली आहे. साडेबारा टक्के योजनेअंतर्गत जवळपास ६७९३ एकर जमीन परत देणे आवश्यक आहे. यापैकी पावणेचार टक्केप्रमाणे २०३८ एकर जमीन सामाजिक सुविधेसाठी राखून ठेवली आहे. प्रत्यक्षात गावांमध्ये सामाजिक सुविधा देण्यात आलेल्या दिसत नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या संस्थांना फक्त ३७ एकर जमीन वितरीत केली आहे. उर्वरित २००१ एकर जमिनीचे काय झाले याविषयी आगरी कोळी युथ फाउंडेशनने अनेक महिन्यांपासून अभ्यास सुरू केला होता. आगरी कोळी युथ फाउंडेशनने अ‍ॅड. राहुल ठाकूर यांच्या वतीने ४ मे रोजी जनहित याचिका दाखल केली आहे. यामध्ये प्रत्यक्षात २८ याचिकाकर्ते आहेत. सामाजिक सुविधेसाठी कपात करून घेतलेले भूखंड मूळ मालकांना परत देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. न्यायालयात लढा देण्यासाठी गावनिहाय वितरीत केलेल्या जमिनीचा व मिळालेल्या मोबदल्यासह इतर सर्व माहिती संकलित केली असून, ते म्हणने न्यायालयात सादर केले जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांसाठीच्या याचिकाकर्त्यांची यादी मनोज जगन्नाथ म्हात्रे (जुहूगाव), मिलिंद अविनाश पाटील (घणसोली), अ‍ॅड. सुनील महादेव पाटील (कुकशेत), संदीप जनार्दन पाटील (कोपरखैरणे), जयश्री अरविंद पाटील (जुहूगाव), अजय पंडित मुंडे (घणसोली), महेश प्रल्हाद पाटील (शिरवणे), कोमल कैलास पाटील (रबाळे), संदेश विठ्ठल ठाकूर (उरण), प्रमोद रामनाथ ठाकूर (उरण), हर्षद ठाकूर (उरण), सुशांत श्रीकांत पाटील (वसई), डॉ. सुरेंद्र हरिश्चंद्र पाटील (शिरवणे), डॉ. रवींद्र द्वारकानाथ म्हात्रे (घणसोली), डॉ. अमोल म्हात्रे (तुर्भे), डॉ. वेदांगिनी किशोर नाईक (बोनकोडे), डॉ. निवेदिता दीपक पाटील (करावे), आगरी समाज सेवा संस्था (महाराष्ट्र प्रदेश), आगरी विकास सामाजिक संस्था (वाघबीळ, ठाणे), आगरी एकता विकास सामाजिक संस्था (कळवा, ठाणे), जाणता राजा सामाजिक विकास मंडळ (बामन डोंगरी, पनवेल), सन्नी वासुदेव चौधरी (ठाणे), प्रीतेश छगन पाटील (ठाणे), प्रकाश पद्माकर पाटील (ठाणे), स्वप्निल किशोर वाफेकर (ठाणे), महेंद्र पंजानंद पाटील (ठाणे), मयूर कोटकर (ठाणे).तालुकानिहाय जमिनीचा तपशील (एकर)तालुकासंपादित जमीन३.७५ टक्केठाणे११५९१४३४.६८उरण१९८८५७४५पनवेल२२८७५७५७एकूण५४३५१२०३८