शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशन अल्पावधीचे राहणार

By admin | Updated: November 3, 2015 02:10 IST

अनेक मुद्दे आणि विधेयकांना असलेला विरोधकांचा प्रखर विरोध आणि कामकाज सुरळीतपणे चालविणे कठीण जाण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन विलंबानेच

- हरीश गुप्ता,  नवी दिल्लीअनेक मुद्दे आणि विधेयकांना असलेला विरोधकांचा प्रखर विरोध आणि कामकाज सुरळीतपणे चालविणे कठीण जाण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन विलंबानेच बोलावण्याची योजना आखली आहे. साऊथ ब्लॉकमधून मिळालेले वृत्त खरे असेल तर हिवाळी अधिवेशन पूर्वी ठरल्याप्रमाणे १९ नोव्हेंबरऐवजी २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होईल आणि ते अल्पावधीचे राहील.१९ नोव्हेंबर रोजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती असल्याकारणाने त्या दिवसापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावण्यात येऊ नये, अशी विनंती काँग्रेसने केली होती. पंतप्रधान २१ नोव्हेंबरपासून तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे २० नोव्हेंबरपासून अधिवेशन बोलावल्यास त्यातून कसलाही उद्देश साध्य होणार नाही. त्याशिवाय बिहार, उत्तर प्रदेशचा काही भाग आणि अन्य राज्यांत १७ नोव्हेंबरला छटपूजा उत्सव असल्याने सोमवारी १६ नोव्हेंबरपासूनही अधिवेशन बोलावले जाऊ शकणार नाही. परिणामी २६ नोव्हेंबरपासूनच अधिवेशन घेण्याबाबत सरकार फेरविचार करीत आहे. हिवाळी अधिवेशन २६ नोव्हेंबरपासून सुरू झाले तर ते ख्रिसमस आणि नववर्ष सोहळ्यामुळे लवकर संस्थगित करावे लागेल आणि असे झाले तर या अधिवेशनात केवळ २२ दिवसांचेच कामकाज चालू शकेल. संसदेच्या कामकाजावर अर्थातच बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा प्रभाव पाहायला मिळेल. ८ नोव्हेंबरला हे निकाल जाहीर होणार आहेत.दरम्यान, संसदीय कामकाजावरील कॅबिनेट कमिटीने (सीसीपीए) २६ आॅक्टोबर रोजी बैठक घेऊन राज्यसभेत प्रलंबित असलेल्या ५३ विधेयकांचा आढावा घेतला. दादरी हत्याकांड, गोमांस बंदी आणि संबंधित मुद्यांसह नुकत्याच उफाळलेल्या सांप्रदायिक हिंसाचारावरून रालोआ सरकारविरुद्ध कपात प्रस्ताव आणण्याची विरोधकांची योजना आहे.आगामी अधिवेशनात आपला आर्थिक सुधारणांचा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न सरकार करू शकते; परंतु जीएसटी विधेयक पारित होण्याचा मार्ग मोकळा करणारी घटना दुरुस्ती पारित करण्यासाठी मतैक्य होण्याची शक्यता मात्र कमी आहे. अतिशय महत्त्वाचे हे विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच पारित होईल, अशी अपेक्षा होती. पण सरकारला मतैक्य तयार करण्यात अपयश आले आणि हे विधेयक पुन्हा बारगळले.