शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

नोटाबंदीच्या जखमेवरील फुंकर कृषी क्षेत्राला पुरेशी ठरेल का?

By admin | Updated: February 2, 2017 00:28 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या या अंदाजपत्रकावर नोटाबंदीच्या निर्णयाचे सावट असणे अपरिहार्य होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या अनेक

- मिलिंद मुरुगकरकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या या अंदाजपत्रकावर नोटाबंदीच्या निर्णयाचे सावट असणे अपरिहार्य होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रातील उत्पन्न घटल्याचे वस्तुनिष्ठ अहवाल आहेत. हे परिणाम मोठे असतील तर पुढील आर्थिक वर्षात सरकारकडे जमा होणारा महसूल कमी असेल आणि अंदाजपत्रकातील अनेक योजनांना त्याचा फटका बसेल. नोटाबंदीचा संदर्भ न घेता या अंदाजपत्रकाचे विश्लेषण करणे चुकीचे ठरेल. नोटाबंदीने अर्थव्यवस्थेचे किती मोठे नुकसान झाले आहे, याचा अंदाज आपल्याला देशाचे प्रमुख आर्थिक सल्लागार असलेले अरविंद सुब्रमण्यम यांच्या विधानांवरून येऊ शकतो. नोटाबंदीच्या निर्णयाच्या तोट्यापेक्षा फायदे जास्त असतील असे तुम्ही म्हणाल का?, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे त्यांनी टाळले. हे त्यांचे मौन बरेच बोलके आहे. त्यांनी पुढे म्हटले की, असंघटीत (कृषी आणि लघुउद्योग) क्षेत्रावरचा परिणाम आत्ताच सांगता येणार नाही. दुचाकी वाहनांच्या (विशेषत: मोटार सायकल) खपात झालेली मोठी घट ही ग्रामीण, कमी उत्पन्न असलेल्या लोकांच्या उत्पन्नातील घट दर्शवते. नोटाबंदीचा असंघटीत क्षेत्रावरील परिणाम किती मोठा आहे, हे या विधानांवरून सिद्ध होते. अशा वेळेस कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा विचार करू. १. गेल्या वर्षी मनरेगामधून पाच लाख शेततळ््यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते आणि ते पूर्ण झाले. आता पुन्हा पाच लाख शेततळ््यांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आले आहे. देशातील कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या अनेक कोटी आहे, असे असताना केवळ पाच लाख शेततळ््यांचे उद्दिष्ट हे हास्यास्पद आहे. ज्या गोष्टींमुळे शेतीची उत्पादकता वाढेल. सर्वात शेवटच्या माणसाला रोजगार उपलब्ध होईल आणि औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनाला मागणी तयार होईल, अशा शेततळ्यासारख्या पायाभूत गोष्टीचे उद्दिष्ट केवळ दिखावू स्वरूपाचे असावे, हे दुर्दैवी आहे. २. कर्जपुरवठ्यातील वाढीव उद्दिष्ट स्वागतार्ह आहे. ३. पंतप्रधान पीक विमा योजनेसाठीच्या निधीत झालेली वाढ वास्तवता सांगत नाही. देशातील ८० टक्के शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षणच नाही. त्यामुळे केवळ आधीच्या वर्षीच्या तुलनेत आम्ही निधीत वाढ केली हे म्हणणे पुरेसे नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत किती अधिक शेतकरी पीक विम्याच्या कक्षेत आले याबद्दल सरकार मौन बाळगून आहे. ४. बांधकाम क्षेत्राला विशेषत: (ग्रामीण भागातील) दिलेले जोरदार प्रोत्साहन हे नोटाबंदीच्या आपत्तीवर इलाज आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे ग्रामीण, अकुशल श्रमाची मागणी वाढेल. परंतु जर काही अर्थतज्ज्ञांची नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था मंदीकडे वाटचाल करते आहे, ही भीती खरी ठरली तर सरकारकडे या सर्व गुंतवणुकीसाठी पुरेसा निधी उपलब्ध असेल का हा प्रश्न उरतोच. ५. हे सरकार शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन देवून सत्तेत आले आहे. त्याबद्दल काहीच बोलले जात नाही. नंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे आश्वासन देण्यात आले. आणि असे करायचे असेल तर पाच वर्षात सिंचनावर तीन लाख कोटी खर्च केला गेला पाहिजे. म्हणजे दरवर्षी निदान ६० हजार कोटी रु पये. पण प्रत्यक्षात त्याच्या एक तृतीअंशच निधी दिला गेला आहे. ६. मनरेगासाठी १० हजार कोटी रु पयांची वाढ अतिशय स्वागतार्ह आहे. सत्तेवर आल्यावर या योजनेचा पंतप्रधानांनी उपहासच केला होता. पण ग्रामीण भागातील पायाभूत सोयींच्या निर्मितीसाठी आणि लोकांची क्र यशक्ती वाढवण्यासाठी मनरेगा हा प्रभावी कार्यक्र म याचीच कबुली मोदी सरकारने दिली आहे.

(लेखक कृषी क्षेत्राचे अभ्यासक व आर्थिक विश्लेषक आहेत)