शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मुस्लीम मतदार कोणाच्या दिशेने?

By admin | Updated: February 14, 2017 00:48 IST

हे शहर नक्षीदार पितळी वस्तू बनवण्यासाठी वर्षानुवर्षे देशापरदेशात प्रसिध्द आहे. ही पितळनगरी आज नोटाबंदीमुळे त्रस्त आहे. दरवर्षी सुमारे ५ हजार कोटी

सुरेश भटेवरा / मुरादाबाद (उत्तर प्रदेश)हे शहर नक्षीदार पितळी वस्तू बनवण्यासाठी वर्षानुवर्षे देशापरदेशात प्रसिध्द आहे. ही पितळनगरी आज नोटाबंदीमुळे त्रस्त आहे. दरवर्षी सुमारे ५ हजार कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या या उद्योगात निम्म्याहून अधिक कलाकुसर केलेले पितळी वाण परदेशी जातात. मुरादाबादच्या मकबरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहल्ल्यात, पितळी धातूवर कलाकुसर करणारे लोक घरोघरी आहेत. मात्र आज अभूतपूर्व मंदीचा सामना करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. रोख रकमेवर चालणाऱ्या येथील कारखान्यांतील मशिन्स मजुरांअभावी बंद आहेत. मजुरीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने ९0 टक्क्योहून अधिक कारागीर अन्य रोजगारांच्या शोधात आहेत. अशा वातावरणामुळे मुरादाबादेत नोटाबंदी हा शब्द जणू शिवीच बनला आहे. गेल्या वेळी येथील सहाही जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या. यंदाही इथे सपा-काँग्रेसच्याचेच प्राबल्य जाणवते आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान बुधवार, १५ फेब्रुवारीला आहे. मुरादाबाद, सहारणपूर, बिजनौर, संभल, रामपूर, बरेली, अमरोहा, पीलीभीत, खीरी, शाहजहांपूर आणि बदायूं जिल्ह्यांतील ६७ मतदारसंघाचे भाग्य बुधवारी ठरेल. राज्यात मुस्लीम मतदारांचे प्रमाण १९.३ टक्के आहे. दुसऱ्या टप्प्यातील बहुतांश मतदारसंघ मुस्लीमबहुल आहेत. काही मतदारसंघात तर मुस्लीम मतांचे प्रमाण ५0 टक्के किंवा त्याहूनही अधिक आहे. मुरादाबाद, रामपूरमध्ये तसेच आसपासच्या परिसरात फिरताना, मुस्लिमांचा कल कोणाच्या दिशेने? बसपावर त्यांचा किती भरोसा आहे? सपाची ही व्होटबँक टिकवण्यातअखिलेश यादव यशस्वी ठरतील आहेत? मुस्लिमांविषयी भाजपचा दृष्टिकोन काय? या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला.या राज्यातून लोकसभेवर भाजपचे ७२ खासदार निवडून आले. त्यात एकही मुस्लीम नाही. विधानसभेसाठी भाजपने ४0३ पैकी एकाही ठिकाणी मुस्लिमाला उमेदवारी दिलेली नाही. साहजिकच मुस्लिमांची मते आपली नाहीच, अशी खूणगाठ भाजपने बांधली असावी. गेल्या, २0१२ च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांची बहुतांश मते समाजवादी पक्षाच्या पारड्यात पडली होती. अखिलेश त्यामुळेच मुख्यमंत्री झाले. मात्र अखिलेशनी मुस्लिमांसाठी काय केले, मुझफ्फरपूर दंगल व दादरीत अखलाखच्या निर्घृण हत्येच्या वेळी आणि नंतर अखिलेश सरकार काय करीत होते, याची उत्तरे सपा-काँग्रेस आघाडीला द्यावी लागत आहेत. मुस्लिमांना १८ टक्के आरक्षण मिळवून देण्याचे वचन गेल्यावेळी मुलायमसिंगांनी दिले होते. यंदा सपाच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेखही नाही. दुसरीकडे मायावतींनी सर्वाधिक म्हणजे ९७ मुस्लीम उमेदवार दिले आहेत. २१ टक्के दलित आणि १९.३ टक्के मुस्लिम असे समीकरण जुळवण्याचा बसपाचा प्रयत्न आहे. मायावतींनी केवळ अन्सारी बंधूंशी हातमिळवणी केली नाही, तर दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम व उलेमा पाठिंबा मिळवण्यातही त्या यशस्वी झाल्या आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशच्या मुस्लीमबहुल मतदारसंघांत अजितसिंग यांच्या रालोदनेही मुस्लीम उमेदवार उभे केले. तिथे मतदान पार पडले आहे. एमआयएम व डॉ. अयुब यांच्या पीस पार्टीचे सर्वच उमेदवार मुस्लीम आहेत. मुस्लीम मतांचे असे विभाजन झाल्यास हिंदुंचा मतांद्वारे विधानसभेची सत्ता ताब्यात येईल, असा भाजपचा आडाखा आहे. कोणत्याही एका पक्षाला वा आघाडीला बहुमत न मिळाल्यास, पूर्वेतिहास पाहता मायावती भाजपशी हात मिळवू शकतील या शंकेमुळे मुस्लीम समुदायात अस्वस्थता आहे.