शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

केंद्रीय मंत्रिमंडळाचा धुव्वा

By admin | Updated: May 17, 2014 03:10 IST

भारतीय निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी ‘कॅबिनेट’वर इतका लाजिरवाणा पराभव स्वीकारण्याची नामुष्की ओढावली आहे.

नवी दिल्ली : भारतीय निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी ‘कॅबिनेट’वर इतका लाजिरवाणा पराभव स्वीकारण्याची नामुष्की ओढावली आहे. संपुआच्या मावळत्या मंत्रिमंडळात ९० टक्के मंत्री असे आहेत ज्यांनी एक तर निवडणूक लढवलीच नाही आणि ज्यांनी लढवली त्यांना मतदारांनी सपशेल नाकारले. केंद्र सरकारमधे मानाची पदे भूषवलेल्या अनेक केंद्रीय मंत्र्यांना अक्षरश: जेमतेम स्थानिक ओळख असलेल्या उमेदवारांनी मात दिली आहे. एवढेच नव्हे तर लोकसभा सभापती असलेल्या मीरा कुमारांनाही या निवडणुकीत परावभवाचे तोंड पहाणे भाग पडले आहे. संपुआ दोनचे नेतृत्व करणारे पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री पी. चिदंबरम, कृषी मंत्री शरद पवार, संरक्षण मंत्री ए. के. अ‍ॅँटोनी यांनी ही निवडणूक लढवलीच नाही. आणि ज्यांनी लढवली त्यात दस्तुरखुद्द कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शेवटपर्यंत अटीतटीच्या लढतीच्या अनिश्चततेचा सामना करावा लागला. कमलनाथ, जयपाल रेड्डी, मल्लिकार्जुन खारगे, ज्योतिरादित्य सिंदीया या चौघांनी फक्त आपापले मतदारसंघ राखत कॅबिनेटची उरलसुरली लाज राखली, असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे संपुआ सरकारच्या काळात ज्या ज्या कॅबिनेट मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यापैकी अनेकांना राजीनामे द्यावे लागले होते त्यांना आणि उरलेल्यांनाही मतदारांनी नाकारले. त्यात ए. राजा, श्रीप्रकाश जयस्वाल यांना पराभव पाहावा लागला. संपुआ सरकारचा गाडा हाकणारे, ज्यांचे मतदारसंघ म्हणजे हमखास विजयाची खात्री, असे वातावरण असताना मतदारांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनाही चकीत करत विजयाची माळ फिरवली. अनेक मतदारसंघात तर अत्यंत नवख्या, केवळ राज्याच्या राजकारणात जेमतेम ओळख असणार्‍या उमेदवारांनी या मातब्बरांचा पाडाव केला. केंद्रात मनुष्यबळ मंत्री असलेल्या एम. एम. आर. पल्लम राजू यांच्यावर तर डिपॉझिट जप्त होण्याची पाळी आली. पूर्वमंत्री अजय माकन, पवन बन्सल यांचाही दारुण पराभव झाला. आता नव्या संसदेत गत मंत्रिमंडळातले हातावर मोजता येतील एवढेच चेहरे दिसतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे..