गाठींच्या दरात वाढ
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
अहमदनगर: हिंदू संस्कृतीप्रमाणे पाडव्याला नवीन वर्षाची सुरूवात होते. यादिवशी अभ्यंगस्नान, दाराला तोरण बांधून घरासमोर गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. गुढीसाठी साखरेची गाठ आवश्यक आहे. साखरेचे भाव घसरले असले तरी मजुरीचे दर वाढल्यामुळे यंदा गाठीच्या किंमतीमध्ये गतवर्षापेक्षा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच दिवशी लहान मुलांना गाठी भेट देण्याची परंपरा असल्याने गाठी विक्रीचे दुकाने शहर व उपनगरात थाटली आहे.
गाठींच्या दरात वाढ
अहमदनगर: हिंदू संस्कृतीप्रमाणे पाडव्याला नवीन वर्षाची सुरूवात होते. यादिवशी अभ्यंगस्नान, दाराला तोरण बांधून घरासमोर गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. गुढीसाठी साखरेची गाठ आवश्यक आहे. साखरेचे भाव घसरले असले तरी मजुरीचे दर वाढल्यामुळे यंदा गाठीच्या किंमतीमध्ये गतवर्षापेक्षा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच दिवशी लहान मुलांना गाठी भेट देण्याची परंपरा असल्याने गाठी विक्रीचे दुकाने शहर व उपनगरात थाटली आहे. पाडव्यानिमित्ताने घरासमोर उभारल्या जाणार्या गुढीला सारखेची गाठी लागते. गाठी तयार करणारे जवळपास दहा कारखाने नगरमध्ये आहेत. या कारखान्यात काम करणार्या मजुरांचे दर वाढले आहेत. त्यामुळे बाजारात साखरेचे दर घसरले असले तरीही यंदाच्या वर्षी गाठीचे दर मात्र वाढले आहे. सावेडीतील पाईपलाईन रस्ता, गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसरात गाठी विक्रेत्यांची दुकाने थाटली आहेत. पाडव्याच्या पूर्वसंध्येला गाठी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती.