शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

...'या' कारणांमुळे पाकिस्तानला एकाकी पाडणे कठीण

By admin | Updated: September 21, 2016 13:52 IST

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी भारताकडून जोरदार कुटनितीक प्रयत्न सुरु झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी भारताकडून जोरदार कूटनितीक प्रयत्न सुरु झाले आहेत. २००८ साली मुंबईवरील हल्ल्यानंतरही असेच प्रयत्न झाले होते. लष्करी पर्यायापेक्षा कूटनितीक पर्याय अधिक प्रभावी ठरेल असे काहीजणांचे मत आहे. पण त्यात अपेक्षेइतके यश मिळण्याची शक्यता कमी आहे. भारतावरील दहशतवादी हल्ल्यानंतर अन्य देशांकडून तात्पुरता विरोध दर्शवला जातो पण नंतर सर्वकाही पूर्वीसारखे होते. मुंबई हल्ल्यानंतरही असेच झाले होते. पाकिस्तानला पूर्णपणे एकाकी पाडणे का शक्य नाही त्याची काही कारणे 
 
-  उरी दहशतवादी हल्ल्यानंतर काही देशांनी निषेधाचा संदेश प्रसिद्ध करताना स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख केला. अमेरिकेने काश्मीर खो-यावरील हल्ला म्हटले आहे स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख केलेला नाही. अमेरिकेप्रमाणेच काही महत्वाच्या देशांनी पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. 
 
- आज जगात अमेरिकेप्रमाणे चीनही एक महासत्ता आहे. चीनचा पाकिस्तानला भक्कम पाठिंबा आहे. त्यातुलनेत अमेरिकेचा आपल्याला तितका भक्कम पाठिंबा नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रामध्ये भारताकडून आणला जाणारा प्रस्ताव चीन आपल्या विशेषाधिकारा वापर करुन हाणून पाडतो. ही देखील भारताची एक मोठी अडचण आहे. 
 
- अमेरिका अनेक वर्ष भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना खेळवत आला आहे. भारताची बाजू अमेरिका उचलून धरते. पण त्यावर कारवाई करायला पाकिस्तानला भाग पाडत नाही. याचे मुख्य कारण आहे पाकिस्तानचे भौगोलिक स्थान. आजही अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये आहे त्याचप्रमाणे अमेरिकेला असलेला दहशतवादाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. पाकिस्तान दहशतवादाचा अड्डा असला तरी, पाकिस्तानला दूर लोटून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पाकिस्तान विरोधातील दहशतवादाच्या मुद्यावर अमेरिका पूर्णपणे भारताची साथ देणार नाही. 
 
- पाकिस्तानला आज जगातील अनेक महत्वाच्या मुस्लिम देशांचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा तोडणे इतके सोपे नाही.