शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

...'या' कारणांमुळे पाकिस्तानला एकाकी पाडणे कठीण

By admin | Updated: September 21, 2016 13:52 IST

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी भारताकडून जोरदार कुटनितीक प्रयत्न सुरु झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ - उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी भारताकडून जोरदार कूटनितीक प्रयत्न सुरु झाले आहेत. २००८ साली मुंबईवरील हल्ल्यानंतरही असेच प्रयत्न झाले होते. लष्करी पर्यायापेक्षा कूटनितीक पर्याय अधिक प्रभावी ठरेल असे काहीजणांचे मत आहे. पण त्यात अपेक्षेइतके यश मिळण्याची शक्यता कमी आहे. भारतावरील दहशतवादी हल्ल्यानंतर अन्य देशांकडून तात्पुरता विरोध दर्शवला जातो पण नंतर सर्वकाही पूर्वीसारखे होते. मुंबई हल्ल्यानंतरही असेच झाले होते. पाकिस्तानला पूर्णपणे एकाकी पाडणे का शक्य नाही त्याची काही कारणे 
 
-  उरी दहशतवादी हल्ल्यानंतर काही देशांनी निषेधाचा संदेश प्रसिद्ध करताना स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख केला. अमेरिकेने काश्मीर खो-यावरील हल्ला म्हटले आहे स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख केलेला नाही. अमेरिकेप्रमाणेच काही महत्वाच्या देशांनी पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. 
 
- आज जगात अमेरिकेप्रमाणे चीनही एक महासत्ता आहे. चीनचा पाकिस्तानला भक्कम पाठिंबा आहे. त्यातुलनेत अमेरिकेचा आपल्याला तितका भक्कम पाठिंबा नाही. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी संयुक्त राष्ट्रामध्ये भारताकडून आणला जाणारा प्रस्ताव चीन आपल्या विशेषाधिकारा वापर करुन हाणून पाडतो. ही देखील भारताची एक मोठी अडचण आहे. 
 
- अमेरिका अनेक वर्ष भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना खेळवत आला आहे. भारताची बाजू अमेरिका उचलून धरते. पण त्यावर कारवाई करायला पाकिस्तानला भाग पाडत नाही. याचे मुख्य कारण आहे पाकिस्तानचे भौगोलिक स्थान. आजही अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये आहे त्याचप्रमाणे अमेरिकेला असलेला दहशतवादाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. पाकिस्तान दहशतवादाचा अड्डा असला तरी, पाकिस्तानला दूर लोटून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पाकिस्तान विरोधातील दहशतवादाच्या मुद्यावर अमेरिका पूर्णपणे भारताची साथ देणार नाही. 
 
- पाकिस्तानला आज जगातील अनेक महत्वाच्या मुस्लिम देशांचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा तोडणे इतके सोपे नाही.