शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मोदी सरकारचा कोणताही ‘रोडमॅप’ नाही

By admin | Updated: June 10, 2014 00:26 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून कोणतीही ठोस योजना सादर करण्यात नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरले आहे, असा स्पष्ट आरोप विरोधी पक्षांनी केला.

दाखविले केवळ ‘स्वप्न’ : अभिभाषणावरून विरोधी पक्षांचे जोरदार टीकास्त्र 
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून कोणतीही ठोस योजना सादर करण्यात नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरले आहे, असा स्पष्ट आरोप विरोधी पक्षांनी केला. हे अभिभाषण लोकांना केवळ स्वप्न दाखविणारे आणि त्यांच्या आकांक्षा वाढविणारे होते. या स्वप्नपूर्तीसाठी सरकारने कोणताही रोडमॅप मात्र सादर केलेला नाही, असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे.
भाजपप्रणीत रालोआ सरकारने प्रशासन, रोजगार निर्मिती आणि महागाईला आळा घालणो याकडे मुळीच लक्ष कें द्रित केलेले नाही, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एम. वीरप्पा मोईली म्हणाले. 6क् महिन्यांच्या आत देश गौरवशाली बनविण्याच्या मोदी सरकारच्या दाव्यावर मोईली यांनी प्रश्न उपस्थित केला. 
ते म्हणाले, मोदी सरकार केवळ लोकांच्या आकांक्षा वाढवित आहे. परंतु या आशा आकांक्षा आपण कशा पूर्ण करणार हे सांगण्यात या सरकारला अपयश आले आहे. लोकांना आशा आहे आणि ते प्रतीक्षा करीत आहेत. परंतु यात कोणतीही ठोस योजना सापडत नाही. कोणताही ठोस रोडमॅप दिसत नाही. ते हे सर्व कसे प्राप्त करणार आहेत?
 (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
-अभिभाषणानंतर संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ म्हणाले, राष्ट्रपतींचे अभिभाषण केवळ स्वप्न आणि आशांचे मृगजळ आहे, जे आम्ही गेले तीन महिने बाजारात पाहिलेले आहे. 
-मोदी सरकार हे स्वप्न आणि आशा आकांक्षांची पूर्तता कशाप्रकारे करते हे येत्या काही महिन्यांतच दिसेल.
 
मोदींचा अजेंडा : काहींना शंका तर काहींना आशा
काश्मीरबाबत ठोस प्रस्ताव नाही
-नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून मोदी सरकारने मांडलेल्या अजेंडय़ात जम्मू-काश्मीरच्या तोंडाला पानेच पुसली गेली आहेत, अशी टीका राज्यसभा सदस्य सैफुद्दीन सोझ यांनी केली. काश्मिरी पंडितांना मायभूमीत सुखरूप परत आणण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. परंतु हे कसे करणार, याचा प्रस्ताव नाही, असे ते म्हणाले.
 
आता घोषणांची पूर्तता हवी-पांडा
-बिजदचे खासदार बैजयंत पांडा म्हणाले, अभिभाषणात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. आता सरकारला त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारादरम्यान जे काही बोलत होते तेच सरकारच्या अजेंडय़ात पाहायला मिळाले. 
 
‘आश्वासन नक्की पूर्ण करणार’
-भाजपा नेते आदित्यनाथ म्हणाले सरकारने काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन, गंगा शुद्धीकरण, दहशतवादाविरुद्ध पाऊल आणि गावांना वीज व पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. सरकार ते निश्चितपणो पूर्ण करेल.
 
‘सरकारने काम करावे’
-या सरकारने लोकांसाठी काम केले पाहिजे. परंतु आपला पक्ष संसदेतच याबाबतचे विचार व्यक्त करेल, असे आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान म्हणाले.
 
अजेंडय़ाचे  स्वागत
-राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून मोदी सरकारने मांडलेल्या विविध मुद्यांवरील आपल्या अजेंडय़ाचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी स्वागत केले आहे. सा:यांच्या आशा उंचावल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.