शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

नरेंद्र मोदी-शरीफ यांची बैठक नाहीच

By admin | Updated: November 27, 2014 02:41 IST

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात सार्क परिषदेच्या दरम्यान बैठक होणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रलायचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी सांगितले.

काठमांडू : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात सार्क परिषदेच्या दरम्यान बैठक होणार नाही, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रलायचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी सांगितले. 
या दोन्ही पंतप्रधानांची बैठक आयोजित करण्याची आमची योजना नाही कारण पाकिस्तानकडून तशी विनंती करण्यात आलेली नाही, असे अकबरुद्दीन यांनी सांगितले. 
सार्क परिषदेसाठी आलेल्या राष्ट्र प्रमुखांना पंतप्रधान मोदी भेटणार आहेत, पण त्यात पाकिस्तानचा समावेश नाही. इतर नेत्यांच्या बैठकीत होणा:या वाटाघाटींची माहिती आम्ही देऊ, असे अकबरुद्दीन म्हणाले. मोदी यांच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेत शरीफ यांच्या भेटीचा उल्लेख नाही. अफगाणिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांगलादेश व भूतान  यांच्या नेत्यांशी भारताचे पंतप्रधान मोदी चर्चा करणार आहेत. 
बिझनेस व्हिसा 
भारत सार्क देशांना 3-5 वर्षाचा बिझनेस व्हिसा देईल, तसेच सार्क व्यापारी प्रवासी कार्डही जारी केले जाईल, यामुळे भारतात प्रवेश करणो सोपे होईल. दक्षिण आशिया हा समृद्ध लोकशाहीचा प्रदेश असून आपला वारसाही समृद्ध आहे.  युवापिढीची शक्ती, बदल व प्रगतीची इच्छा हे आपले सामथ्र्य आहे. मी भविष्यातील भारताची स्वप्ने पाहतो व हा संपूर्ण परिसर समृद्ध व्हावा, अशी आशा करतो, असे मोदी म्हणाले. 
पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सार्क नेत्यांचे आभार मानले. आपल्या परराष्ट्र दौ:याचे अनुभव सांगितले. (वृत्तसंस्था)
 
मोदी - शरीफ यांच्यात दुरावा
4काठमांडू- ते एकाच व्यासपीठावर होते, पण त्यानी हस्तांदोलनही केले नाही. सार्क परिषदेच्या पहिल्या दिवशी तीन तास कार्यक्रम चालले होते, पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यात दुरावाच होता. नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीपासून दोन आसने पलीकडे नवाज शरीफ बसले होते. पण त्यानी एकमेकाकडे पाहिलेही नाही. मधल्या आसनावर मालदीव व नेपाळचे नेते बसले होते. 
4मोदी व शरीफ यांच्यात बैठक ठरलेली नव्हती. पण दोघानी हास्यविनोदही करु नयेत असेकाही ठरले नव्हते. आज आणि उद्या गुरुवारीही दोघांना एकाच व्यासपीठावर बसायचे आहे. तसेच रिट्रिट कार्यक्रमातही सहभाग नोंदवायचा आहे. मंगळवारी शरीफ यांनी भारत-पाक वाटाघाटी होणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर भारताने द्यावे असे म्हटले होते.  भारताने पाकबरोबर वाटाघाटी होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.