शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ, आंदोलन कोणाच्या विरोधासाठी नाही - मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 09:02 IST

राममंदिर आंदोलन कोणाचाही विरोध करण्यासाठी सुरू केलेला नसल्याचे स्वयंसेवक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

RSS Mohan Bhagwat On Ram Mandir: राम मंदिर प्रतिष्ठापणेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख 'प्रतिष्ठा द्वादशी' म्हणून साजरी केली जावी कारण हे मंदिर अनेक शतकांपासून शत्रूच्या हल्ल्याचा सामना करत आणि भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना या दिवशी झाली, असं मोहन भागवत म्हणाले. राममंदिर आंदोलन कोणाचाही विरोध करण्यासाठी सुरू केलेला नसल्याचेही मोहन भागवत म्हणाले.

गेल्या वर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा आयोजित केली होती. मात्र, हिंदू कॅलेंडरनुसार, त्याची तारीख ११ जानेवारी २०२५ होती. इंदौर येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना 'राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार' प्रदान केल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी हे विधान केलं.

"राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हे भारताचे खरे स्वातंत्र्य आहे. हा दिवस पौष शुक्ल द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे, जो शतकानुशतके बाह्य आक्रमणाने सहन करणाऱ्या भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना याच दिवशी झाली," असं मोहन भागवत म्हणाले. 

"देश स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि जगाला रस्ता दाखवता यावा यासाठी भारताने स्वतःला जागृत करण्यासाठी राम मंदिर आंदोलन सुरू केले होते. कोणाचा विरोध करण्यासाठी राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केलेली नाही," असंही मोहन भागवत यांनी यावेळी म्हटलं. गेल्या वर्षी अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी देशात कोणताही वाद झाला नाही, असेही भागवत म्हणाले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर राय यांनी हा पुरस्कार राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांना समर्पित केला. "हा पुरस्कार मी राम मंदिर आंदोलनात सहभागी असलेल्या ज्ञात-अज्ञात लोकांना समर्पित करतो, ज्यांनी अयोध्येत हे मंदिर बांधण्यात मदत केली. अयोध्येत बांधलेले हे मंदिर हिंदुस्थानच्या अभिमानाचे प्रतीक आहे आणि तेच या मंदिराच्या उभारणीचे कारण आहे," असं चंपत राय यांनी म्हटलं. दरम्यान, राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे जो श्री अहिल्योत्सव समिती या इंदौर इथल्या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. माजी लोकसभा अध्यक्षा आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन या संघटनेच्या अध्यक्षा आहेत. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांमध्ये नानाजी देशमुख, विजया राजे सिंधिया, रघुनाथ अनंत माशेलकर आणि सुधा मूर्ती या दिग्गजांचा समावेश आहे. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ