शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

स्वाईन फ्लू- भाग २

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

-आयसोलेशनच्या २० खाटा रिकाम्याच

-आयसोलेशनच्या २० खाटा रिकाम्याच
स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णाना घेऊन आयसोलेशन वॉर्डात स्वाईन फ्लू कक्ष सुरू करणे अपेक्षित होते. परंतु दीड महिना उलटूनही या संदर्भात काहीच निर्णय घेण्यात आला नाही. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या स्थितीत आयसोलेशनमध्ये एकही रुग्ण भरती नाही. रुग्णालयातील तब्बल २० खाटा रिकाम्या पडल्या आहेत.

-तीन रुग्णालय, रुग्ण मात्र शून्य
महानगरपिालकेच्या तीन मोठ्या रुग्णालयात रुग्णांना भरती करून घेण्याची सोय आहे. गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडा येथील आयसोलेशन रुग्णालय आणि सदर येथील रोग निदान केंद्र. या रुग्णालयांच्या देखभालीपासून ते डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कोट्यावधी रुपये खर्च होतात. परंतु रुग्णाला याचा किती फायदा होतो, हा संशोधनाचा विषय आहे. अख्खे शहर स्वाईन फ्लूच्या दहशतीत असताना एकही रुग्ण या इस्पितळात भरती करून घेतला जात नाही. यासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याचे सांगून मनपाचे अधिकारी वेळ मारून नेतात.

- ३८ डॉक्टरांचा ताफा
पण उपचार नाहीत
मनपाच्या आरोग्य विभागाकडे ३८ एमबीबीएस डॉक्टर आहेत. यातील २८ डॉक्टर नियमित असून १० डॉक्टर कंत्राटी पद्धतीवर आहे. यांच्या मदतीने स्वाईन फ्लू रुग्णांना भरती करून उपचार करणे शक्य आहे. गरज पडल्यास मेयो, मेडिकलमधील स्पेशालिस्ट डॉक्टरांची चमू मागविणे शक्य आहे. परंतु कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही.

-जनजागृती नावापुरतीच
स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्याकरिता जनजागृतीसाठी पाच लाख पत्रके वितरित केली जात असल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे केला जात आहे. ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स लावली आहेत. परंतु शहरात रुग्णांची वाढती संख्या पाहता विशेषत: दहा वर्षाखालील लहान मुलांमध्ये हा आजार वाढत असल्याने ही जनजागृती नावापुरतीच असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. जनजागृती सोबत आवश्यक वैद्यकीय सुविधा महापालिकेेने उपलब्ध करून द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.