शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

वैद्यकिय अधिकार्‍याची गळफास घेवून आत्महत्या

By admin | Updated: November 20, 2015 23:54 IST

जळगाव: वरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपळनेर उपकेंद्रात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ.दिनेश अमृत पाटील (मुळ.रा.म्हसास ता.पाचोरा) यांनी गुरुवारी मध्यरात्री जळगावातील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, डॉ.पाटील यांचा स्थानिक कर्मचारी व काही पुढार्‍यांकडून छळ होत होता, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली. त्या दोषींवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला.

जळगाव: वरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपळनेर उपकेंद्रात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ.दिनेश अमृत पाटील (मुळ.रा.म्हसास ता.पाचोरा) यांनी गुरुवारी मध्यरात्री जळगावातील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, डॉ.पाटील यांचा स्थानिक कर्मचारी व काही पुढार्‍यांकडून छळ होत होता, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली. त्या दोषींवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला.
डॉ.पाटील व त्यांची पत्नी डॉ.पुजा हे दोघं जण रिंग रोडवरील हरेश्वर नगरातील वृंदावन अपार्टमेंटमध्ये २० क्रमांकाच्या खोलीत भाड्याने वास्तव्याला होते. पत्नी या दिवाळीनिमित्त नाशिक येथे माहेरी गेल्या होत्या. पिंपळनेर येथे ड्युटी असल्याने ते जळगावहून ये-जा करीत होते. गुरुवारी ते ड्युटी आटोपून संध्याकाळी सहा वाजता घरी आले. रात्री जेवण झाल्यानंतर त्यांनी बारा वाजेच्या सुमारास घरातच गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मेहुणे ईश्वर पवार यांनी जिल्हा पेठ पोलिसांना ही माहिती कळविली. सकाळी उपनिरीक्षक गिरधर निकम यांनी मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.
खोट्या स‘ांच्या प्रकरणात नाव गुंतवले
गेल्या काही दिवसापुर्वी आरोग्य केंद्राचे लिपिक अविनाश पाटील याने प्रोसेडींगमध्ये जि.प.सदस्य संजय पाटील यांच्या डुप्लीकेट स‘ा करुन आर्थिक घोळ केला. हा प्रकार पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर अविनाश पाटील यांनी त्या स‘ा डॉ.दिनेश पाटील यांनी केल्याचे खोटे सांगितले. दरम्यान,या प्रकरणात त्यांना पैशांसाठी काही लोकांकडून ब्लॅकमेल केले जात होते, असा आरोप डॉ.पाटील यांचे भुसावळचे मेहुणे ईश्वर पवार यांनी केला. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी वरणगावच्या नगरसेवकाच्या मध्यस्थीने ६० हजार रुपये देवून तंटा मिटविला होता. परंतु तरीही लिपीक, वाहन चालक व काही पुढार्‍यांकडून त्यांचा छळ सुरुच होता.

शवविच्छेदनाला उशिर
डॉ.दिनेश पाटील यांचा छळ करणार्‍यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पोलिसांचीही अडचण झाली होती. त्यामुळे शवविच्छेदनालाही उशिर झाला. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनलाही बराच वेळ गोंधळ चालला. संध्याकाळी उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूचीच नोंद करण्यात आली होती.