शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
6
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
7
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
8
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
9
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
10
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
11
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
12
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
13
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
15
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
16
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
17
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
18
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
19
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
20
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना

By admin | Updated: March 2, 2016 02:31 IST

डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना

नवी दिल्ली : एरवी फायदेशीर ठरणाऱ्या डाळींच्या उत्पादनात अपुरा पाऊस, पिकांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे घट झाली आहे; मात्र केंद्र सरकारतर्फे राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशनखाली डाळींचे उत्पादन वाढवण्याची योजना राबवण्यात येत आहे.कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री मोहनभाई कुंडारिया यांनी राज्यसभेमध्ये ही माहिती दिली. खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, देशाच्या मागणीच्या तुलनेत डाळींचे उत्पादन कमीच होत असते. त्यामुळे देशाला डाळी आयात कराव्या लागतात. सन २०१४-१५ मध्ये २१० टन डाळींची मागणी असताना उत्पादन १७१.५ टन इतकेच झाले होते.त्यामुळे डाळींचे उत्पादन वाढवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू असून, राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशनअंतर्गत राज्यांतील ६२२ जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे. याशिवाय भारतीय कृषी संशोधन परिषदेने उत्पादनवाढीसाठी काही प्रयोग सुरू केले आहेत. डाळींचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किमान आधारभूत दरातही वाढ करण्यात आली आहे, असे राज्यमंत्री म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)