शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

राज्यात सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: August 29, 2015 01:25 IST

राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी तीन शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जबाजारीपण, नापिकी व दुष्काळ ही त्यांच्या आत्महत्येची कारणे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यात दगडथर येथील अशोक रामराव जटाळे (२९) यांनी गुरुवारी विष प्राशन केले. त्यांच्याकडे आठ एकर कोरडवाहू जमीन असून, त्यांच्यावर राष्ट्रीयीकृत बँकेचे ९० हजार रुपयांचे कर्ज आहे. चंद्रपूर सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव येथील दिलीप कामडी यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सेलडोह येथील मंगेश रामाजी राऊत (२८) यांनी गुरुवारी शेतात विष प्राशन केले. मराठवाड्यात प्रभाकर गणपतराव खांडे (६५, मच्छिंद्रनाथ चिंचोली, जि. जालना), कौतिकराव आनंदा ठाले (३७, वाडी बु., जि. जालना) आणि पुंडलिक मरीबा गवलवाड (५५, कोळनूर, जि. नांदेड) यांनी आत्महत्या केली. खांडे यांना तीन एकर शेती आहे. दरवर्षी शेतात खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, अशी त्यांची स्थिती होती. त्यांच्यावर ५० हजार रुपये कर्ज आहे. भोकरदन तालुक्यातील वाडी बु. येथील कौतिकराव यांच्यावर ३ लाखांचे कर्ज होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. पुंडलिक गवलवाड यांच्या नावावर ३५ हजार रुपयांचे पीक कर्ज होते़ त्याचे नूतनीकरण करण्यासाठी त्यांनी खासगी सावकाराकडूनही कर्ज काढले होते़ (लोकमत न्यूज नेटवर्क)