कत्तलीसाठी आणलेल्या सहा गायींची सुटका
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
एकावर गुन्हा दाखल : इंदापुरातील जागृत युवकांमुळे वाचले गायींचे प्राण
कत्तलीसाठी आणलेल्या सहा गायींची सुटका
एकावर गुन्हा दाखल : इंदापुरातील जागृत युवकांमुळे वाचले गायींचे प्राणइंदापूर : इंदापूर येथे कत्तलीसाठी आणलेल्या सहा गायींचे प्राण युवकांच्या सर्तकतेमुळे वाचले. पोलिसांच्या साहायाने या तीन गायींची सुटका करण्यात यश आले, तर या प्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुटका केलेल्या या गायींना बारामतीच्या पांजरपोळात ठेवण्यात आले आहे. नवाज नबीलाल कुरेशी (रा. इंदापूर) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन अनिल रणवरे (रा. निमसाखर) यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांनी सांगितले, की सुदर्शन रणवरे हे मंगळवारी (दि. २५) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सहकारी संदीप भगवान चौधरी (रा.भोडणी, ता. इंदापूर) ज्ञानेश्वर चौगुले, बाबासाहेब चौगुले, सागर लोखंडे, गणेश इंगळे (रा. संगम, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व प्रतीक हांगे हे कामानिमित्त अकलूज येथे निघाले होते. कांदा मार्केटजवळ आल्यानंतर, अकलूज रस्त्याच्या पिम बाजूकडून जनावरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. या सर्व युवकांनी तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहिले असता, एका पत्र्याच्या शेडमध्ये सहा गायी क्रूरपणे बांधलेल्या स्थितीत आढळून आल्या. जवळच हाडांचे ढीग आढळले. त्यानंतर त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. या सहा गायींची सुटका करण्यात आली. अद्याप आरोपीस अटक करण्यात आली नाही, असे पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांनी सांगितले. गायींची सुटका करणारे सर्व युवक शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते आहेत. फोटो ओळी : कत्तलीसाठी आणलेल्या सहा गायींची कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने सुखरूप सुटका केली.२६०८२०१५-बारामती-३२