शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

असा आहे सिंधू करार

By admin | Updated: September 27, 2016 01:49 IST

भारतातील राज्यांराज्यांतून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कसे वाटून घ्यायचे, याचा कटुता न येता निर्णय कसा घ्यावा हे ठरत नव्हते, तेव्हापासून कायद्याच्या चौकटीत पाण्याचे स्रोत कसे

भारतातील राज्यांराज्यांतून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कसे वाटून घ्यायचे, याचा कटुता न येता निर्णय कसा घ्यावा हे ठरत नव्हते, तेव्हापासून कायद्याच्या चौकटीत पाण्याचे स्रोत कसे वापरावेत, याचे भारत व पाकिस्तान हे जिवंत उदाहरण आहे. भारत आणि पाकिस्तान गेल्या ५६ वर्षांपासून सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी शांतपणे वापरत आहेत. त्याचे श्रेय या कराराला आहे. सिंधु नदी पाणी वाटप करारावर १९ सप्टेंबर १९६० रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अय्युब खान यांनी स्वाक्षऱ्या केल्या.हा करार जागतिक बँकेने घडवून आणला होता.या दोन्ही देशांतून वाहणारी सिंधु नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याचा वापर दोन्ही देशांनी कसा करावा याचे प्रशासन हा करार करतो.करारानुसार रावी, बियास आणि सतलज नद्यांचे नियंत्रण भारताकडे तर पाकिस्तानकडे सिंधु, चिनाब व झेलम नद्यांचे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाल्यापासून अनेक मुद्द्यांवर वितुष्ट असले तरी सिंधूच्या पाण्यावरून कोणताही संघर्ष झालेला नाही, पण आता दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा ही चर्चा सुरू झाली.सिंधु नदी भारतातून वाहत असल्यामुळे तिचे २० टक्के पाणी सिंचन, वीज निर्मिती व वाहतुकीच्या कामांसाठी वापरण्यास परवानगी आहे.कराराची अमलबजावणी व व्यवस्थापन करण्यासाठी स्थायी सिंधु आयोगाची द्विपक्षीय आयोग म्हणून स्थापना करण्यात आलेली आहे. पाणी वाटपावरून उद््भवणारे वाद या आयोगामार्फत दूर केले जातात. वादांची सोडवणूक मित्रत्वाने होण्यासाठी हा करार लवाद व्यवस्थाही उपलब्ध करून देतो.सिंधू मुळात तिबेटमधून (चीन) उगम पावत असली तरी या करारात चीन नाही. जर चीनने या नदीचा प्रवाह बदलण्याचा किंवा थांबविण्याचा निर्णय घेतला तर भारत आणि पाकिस्तानच्या हितावर परिणाम होईल.तिबेटच्या पठारावरील बर्फ हवामान बदलामुळे वितळत आहे व शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यामुळे भविष्यात नदीवर परिणाम होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाल्यापासून अनेक मुद्यांवर वितुष्ट असले तरी या कराराला मान्यता मिळाल्यापासून पाण्यावरून कोणताही संघर्ष झालेला नाही, हे येथे लक्षात घ्यावे.