शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

असा आहे सिंधू करार

By admin | Updated: September 27, 2016 01:49 IST

भारतातील राज्यांराज्यांतून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कसे वाटून घ्यायचे, याचा कटुता न येता निर्णय कसा घ्यावा हे ठरत नव्हते, तेव्हापासून कायद्याच्या चौकटीत पाण्याचे स्रोत कसे

भारतातील राज्यांराज्यांतून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कसे वाटून घ्यायचे, याचा कटुता न येता निर्णय कसा घ्यावा हे ठरत नव्हते, तेव्हापासून कायद्याच्या चौकटीत पाण्याचे स्रोत कसे वापरावेत, याचे भारत व पाकिस्तान हे जिवंत उदाहरण आहे. भारत आणि पाकिस्तान गेल्या ५६ वर्षांपासून सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी शांतपणे वापरत आहेत. त्याचे श्रेय या कराराला आहे. सिंधु नदी पाणी वाटप करारावर १९ सप्टेंबर १९६० रोजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान अय्युब खान यांनी स्वाक्षऱ्या केल्या.हा करार जागतिक बँकेने घडवून आणला होता.या दोन्ही देशांतून वाहणारी सिंधु नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याचा वापर दोन्ही देशांनी कसा करावा याचे प्रशासन हा करार करतो.करारानुसार रावी, बियास आणि सतलज नद्यांचे नियंत्रण भारताकडे तर पाकिस्तानकडे सिंधु, चिनाब व झेलम नद्यांचे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाल्यापासून अनेक मुद्द्यांवर वितुष्ट असले तरी सिंधूच्या पाण्यावरून कोणताही संघर्ष झालेला नाही, पण आता दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा ही चर्चा सुरू झाली.सिंधु नदी भारतातून वाहत असल्यामुळे तिचे २० टक्के पाणी सिंचन, वीज निर्मिती व वाहतुकीच्या कामांसाठी वापरण्यास परवानगी आहे.कराराची अमलबजावणी व व्यवस्थापन करण्यासाठी स्थायी सिंधु आयोगाची द्विपक्षीय आयोग म्हणून स्थापना करण्यात आलेली आहे. पाणी वाटपावरून उद््भवणारे वाद या आयोगामार्फत दूर केले जातात. वादांची सोडवणूक मित्रत्वाने होण्यासाठी हा करार लवाद व्यवस्थाही उपलब्ध करून देतो.सिंधू मुळात तिबेटमधून (चीन) उगम पावत असली तरी या करारात चीन नाही. जर चीनने या नदीचा प्रवाह बदलण्याचा किंवा थांबविण्याचा निर्णय घेतला तर भारत आणि पाकिस्तानच्या हितावर परिणाम होईल.तिबेटच्या पठारावरील बर्फ हवामान बदलामुळे वितळत आहे व शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यामुळे भविष्यात नदीवर परिणाम होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाल्यापासून अनेक मुद्यांवर वितुष्ट असले तरी या कराराला मान्यता मिळाल्यापासून पाण्यावरून कोणताही संघर्ष झालेला नाही, हे येथे लक्षात घ्यावे.