शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धक्कादायक : दोन वर्षांत गुजरातेत १८४ सिंहांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 01:55 IST

गुजरातमध्ये २०१६ व २०१७मध्ये १८४ सिंहांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र त्यातील बहुसंख्य मृत्यू हे नैसर्गिक कारणांनी झाले असल्याचा दावा राज्य सरकारने विधानसभेत केला आहे.

अहमदाबाद -  गुजरातमध्ये २०१६ व २०१७मध्ये १८४ सिंहांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र त्यातील बहुसंख्य मृत्यू हे नैसर्गिक कारणांनी झाले असल्याचा दावा राज्य सरकारने विधानसभेत केला आहे.गुजरातमध्ये २०१५मध्ये करण्यात आलेल्या गणनेमध्ये तिथे ५२३ सिंह असल्याचे स्पष्ट झाले होते. दोन वर्षांच्या आकडेवारीतून हे दिसते की दरवर्षी एकूण सिंहांपैकी १८ टक्के मरण पावतात. सिंहांची संख्या ज्या दराने वाढत आहे, त्याच्या तुलनेत मृत्यू दर हा सामान्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सिंहांच्या मृत्यूचा दर विचारात घेतला तर सिंहांच्या संख्येत दरवर्षी दोन टक्के वाढ होत आहे.सिंहाचे 100 छावे जन्माला आले तर वयाच्या तीन वर्षांपर्यंत त्यातील फक्त 36 जगतात.सिंहांच्या मृत्यूमध्ये तीन वर्षांच्या आतील छाव्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. तिथे २०१६मध्ये १२ सिंहांचा अनैसर्गिक मृत्यू झाला होता व त्या वर्षी मरण पावलेल्या एकूण सिंहांमध्ये हे प्रमाण १२ टक्के होते. तथापि, २०१७मध्ये सिंहांच्या अनैसर्गिक मृत्यूंचे प्रमाण एकदम २५ टक्क्यांवर गेले. त्या वर्षी ८० सिंह मरण पावले त्यात २० सिंहांचा मृत्यू अनैसर्गिक होता.दोन महिन्यांत 106 बिबट्यांचा मृत्यूदेशात या वर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांतच तब्बल १०६ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी आॅफ इंडियाने गोळा केलेल्या माहितीनुसार, यातील बहुतेक मृत्यू हे शिकारीमुळे झाले आहेत.२०१७मध्ये ४३१ बिबटे मरण पावले होते. त्यापैकी १५९ शिकारीचे बळी होते. त्याआधी २०१६मध्ये ४५० बिबिटे मरण पावले, त्यातील १२७ बिबट्यांचा मृत्यू शिकारीत झाला होता.बिबट्याची कातडी व शरीराचे इतर अवयव ज्या पद्धतीने गायब झाले होते, त्यावरून हे स्पष्ट झाले. फक्त १२ बिबटेच नैसर्गिक कारणांनी मरण पावले. सगळ्यात जास्त बिबटे (२४) उत्तराखंडमध्ये मरण पावले. त्याखालोखाल महाराष्ट्रात १८ व राजस्थानात ११ बिबट्यांचा मृत्यू झाला. १८ राज्यांतून बिबट्यांच्या मृत्यूची माहिती घेण्यात आली.

टॅग्स :Gujaratगुजरातnewsबातम्या