शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

शांतीदेव यांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

- डॉ. वांगचूक दोरजी नेगी : बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमाला

- डॉ. वांगचूक दोरजी नेगी : बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमाला
नागपूर : शांतीदेव यांनी केलेली साधना समाजाला एक नवी दिशा देणारी होती. प्रत्येक धर्म, जातीतील लोकांची मानसिकता सकारात्मक करण्याचे काम त्यांनी बुद्ध धम्माच्या माध्यमातून केले. भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान त्यांनी आत्मसात केले आणि त्यांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत ते सहजपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकालाच सुख हवे असते पण सुख आणि दु:ख आपली मानसिकताच ठरवित असते. हे त्यांनी समजावून सांगितले आणि लोकांना जगण्याचा मंत्र दिला, असे मत सारनाथ, वाराणसी येथील डॉ. वांगचुक दोरजी नेगी यांनी व्यक्त केले.
पवित्र दीक्षाभूमी येथे आयोजित बुद्ध महोत्सवात रत्नावली व्याख्यानमालेत आचार्य शांतीदेव यांच्या जीवनचरित्रावर ते बोलत होते. आयुष्यात दु:खी कुणीच होऊ इच्छित नाही. पण खरे सुख मिळविण्यासाठी महापुरुषांचे चरित्र समजून घेतले पाहिजे. प्रयास केला तर आपणही आपली मानसिकता बदलू शकतो. त्यासाठी प्रयत्नात सातत्य असले पाहिजे. प्रत्येकातच बुद्ध होण्याची क्षमता आहे पण आपण आपली ताकद ओळखत नाही. शांतीदेवानी ही क्षमता ओळखली आणि ते बुद्ध झाले. त्यासाठी बुद्धाजवळ आपले मन एकाग्र करावे लागते. चुकीच्या मार्गावर आपले मन एकाग्र झाले तरीही तत्कालिक आनंद मिळतो. योग्य मार्गाने आपण सकारात्मकतेने मन एकाग्र केले तर चिरंतन आनंद मिळतो. आचार्य शांतीदेवांनी बुद्धाची साधना केली आणि ते बुद्ध झाले. जो आनंद तत्कालिक आहे तो खरा आनंद नाही. चुकीच्या परंपरेचे पालन केले तर तत्कालिक सुख मिळाले तरी अंतत: दु:खच मिळते, हा विचार आचार्यांनी समाजात रुजविला.
भगवान बुद्ध आणि आचार्य शांतीदेव यांच्या चरित्रात एक समानता आहे. दोघेही राजपुत्र होते पण त्यांचा जन्म वनात झाला. आचार्य सौराष्ट्रचे राजा राजा कल्याण वर्मा यांचे पुत्र होते. नांलदाच्या कुशल देव यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. त्यांनीच आचार्यांना शांतीदेव हे नाव दिले. साऱ्या भौतिक सुखावर लाथ मारूनही त्यांनी आपला आनंद शोधला. बाबासाहेब आंबेडकरांनीही गरीब घरातच जन्म घेतला आणि तमाम गरीब, शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांचे हे महान कार्य जगात सर्वाधिक महत्त्वाचे आहे. जेथे त्यांनी दीक्षा घेतली त्याच भूमीवर हा बुद्ध महोत्सव होतो आहे, ही बाबही अतिशय महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.