शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार ‘निरंकुश’ नाही

By admin | Updated: May 14, 2016 03:16 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा ‘निरंकुश ’ नाही, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मानहानीशी संबंधित कायद्यातील दंडात्मक तरतुदींच्या संवैधानिक वैधतेची पुष्टी केली.

नवी दिल्ली : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा ‘निरंकुश ’ नाही, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मानहानीशी संबंधित कायद्यातील दंडात्मक तरतुदींच्या संवैधानिक वैधतेची पुष्टी केली.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल पारित दिला. ‘दंडात्मक तरतूद संवैधानिकदृष्ट्या वैध आहे, हे आम्ही मान्य केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा काही असीम किंवा निरंकुश अधिकार नाही,’ असे न्या. दीपक मिश्रा आणि न्या. प्रफुल्ल सी. पंत यांच्या पीठाने म्हटले आहे.राहुल गांधी यांचे वकील कपिल सिब्बल म्हणाले, राहुल गांधींना १९ जुलै रोजी कनिष्ठ न्यायालयासमक्ष हजर व्हायचे आहे आणि आठ आठवड्यासाठी कार्यवाहीवरील स्थगनादेश त्यांना सुरक्षा देऊ शकत नाही. स्थगनादेश १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आला पाहिजे.मानहानीवरील दंडात्मक कायदे आता ‘जुने (आऊटमोडेड) झालेले आहेत,’ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारासोबत ते विसंगत आहेत, या आधारावर या दंडात्मक कायद्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देण्यात आले होते. भादंविचे कलम ४९९ व ५०० रद्द केले पाहिजे, अशी मागणी अर्जदारांनी केली होती. (वृत्तसंस्था)१मानहानीच्या खासगी तक्रारींवरून समन्स जारी करताना देशभरातील दंडाधिकाऱ्यांनी अतिशय सतर्क राहावे.२फौजदारी मानहानीशी संबंधित भारतीय दंड संहितेचे कलम ४९९ व ५०० आणि फौजदारी दंड प्रक्रिया संहितेचे कलम ११९ संवैधानिकटृष्ट्या वैध आहेत.३कलम ५०० चा संबंध मानहानीसाठी शिक्षेच्या तरतुदीशी आहे, ज्या अंतर्गत दोन वर्षे कारावास किंवा दंड अथवा दोन्हीची तरतूद करण्यात आली आहे.मानहानीच्या प्रकरणात समन्स जारी करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील कनिष्ठ न्यायालयातील फौजदारी कार्यवाहीवर आपण दिलेला स्थगनादेश आठ आठवड्यांपर्यंत जारी राहील. या दरम्यान अर्जदार आजच्या निकालाबाबत दिलासा मिळविण्यासाठी आपली याचिका संबंधित उच्च न्यायालयात दाखल करू शकतात. अर्जदारांना देण्यात आलेली अंतरिम सुरक्षा आठ आठवडेपर्यंत जारी राहील.आरोग्य, पर्यावरण सुरक्षेवर भर...या धोरणानुसार आरोग्य, अन्न सुरक्षा आणि पर्यावरण सुरक्षेला प्रोत्साहन दिले जाईल. देशात बौद्धिक संपदेसाठी कायदेशीर चौकट तयार करण्यासह अंमलबजावणी, देखरेख आणि समीक्षेसाठी संस्थात्मक यंत्रणा आणली जाण्याची अपेक्षा आहे. जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट कार्यपद्धतीचा मेळ साधताच या धोरणाला देशाच्या अनुषंगाने अनुकूल बनविण्यावर भर दिला जाणार असल्याचे जेटली यांनी नमूद केले आहे.