शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

धोधो पावसातही पाण्यासाठी वणवण!

By admin | Updated: July 17, 2017 01:05 IST

एकीकडे पाऊस धोधो बरसत असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी नांदिवली गाव, मीनल पार्क प्रभागातील टॉवरवासीयांची चांगलीच वणवण सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : एकीकडे पाऊस धोधो बरसत असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी नांदिवली गाव, मीनल पार्क प्रभागातील टॉवरवासीयांची चांगलीच वणवण सुरू आहे. महिनाभर या ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. परिणामी, रहिवाशांना बोअरिंग आणि टँकरचा आधार घ्यावा लागला असून येथील रस्ताही दलदलीत सापडल्याने त्यांची पायवाटही बिकट झाली आहे. गटारांच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने या ठिकाणी साथीचे आजारही बळावले आहेत. केडीएमसीत समावेश झालेल्या २७ गावांमध्ये नांदिवली गाव, मीनल पार्क हा प्रभाग येतो. या ठिकाणी रविकिरण सोसायटी असून या सोसायटीअंतर्गत ४० टॉवर बांधण्यात आले आहेत. परंतु, आजघडीला येथील बहुतांश टॉवरमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. महिनाभर ते टँकर आणि बोअरिंगच्या पाण्याचा वापर करत आहेत. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून लाखो रुपयांची बिले पाठवली जातात. ते रहिवासी भरतातही. पण, पाण्याची कायम बोंब असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे या परिसरातील चाळींना मुबलक पाणी आहे. पण, टॉवरवासीयांना पाणी नाही. अखेर, या रहिवाशांना चाळींचा आधार घ्यावा लागला आहे. विकासकाचे याकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब असताना दुसरीकडे या ठिकाणी असलेल्या रस्त्यांची खड्ड्यांनी पुरती चाळण झाली आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने या दलदलीतून वाट काढतच संबंधित रहिवाशांना येजा करावी लागत आहे. येथील स्मृती टॉवर आणि त्या परिसरातील अन्य टॉवरकडे जाण्यासाठी गटाराच्या पाण्यातून जावे लागते. दलदलीमुळे डासांची पैदास होऊन स्मृती टॉवरमधील ६ ते ७ जण डेंग्यूने आजारी असल्याचे त्यांनी सांगितले.