शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

अपंगांचे आरक्षण वाढवून पाच टक्के करण्याचा प्रस्ताव

By admin | Updated: August 24, 2016 05:15 IST

‘पर्सन्स विथ डिसेबिलिटिज (इक्वल अपॉर्च्युनिटिज, प्रोटेक्शन आॅफ राईट्स अ‍ॅण्ड फुल पार्टिसिपेशन) अ‍ॅक्ट’ हा कायदा पूर्णपणे नव्याने करण्याचा केंद्र सरकारचा विचार

नवी दिल्ली : अपंगांना समान संधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २० वर्षांपूर्वी केलेला ‘पर्सन्स विथ डिसेबिलिटिज (इक्वल अपॉर्च्युनिटिज, प्रोटेक्शन आॅफ राईट्स अ‍ॅण्ड फुल पार्टिसिपेशन) अ‍ॅक्ट’ हा कायदा पूर्णपणे नव्याने करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून त्यासाठी एक विधेयक तयार करण्यात येत आहे. त्यात सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये अपंगांसाठी असलेले आरक्षण दोन टक्क्यांनी वाढविण्याचा व अपंगत्वाची व्याख्या अधिक व्यापक करून त्यात नव्या प्रवर्गांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने या नव्या विधेयकाचा कच्चा मसुदा तयार केला. त्यानंतर पंतप्रधानांनी हा मसुदा तपासून त्यात सुधारणा सुचविण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगट नेमला. मंत्रीगटाच्या सूचना आता पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविल्या गेल्या आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात २.७ कोटी अपंग आहेत.सध्याच्या कायद्यानुसार सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये अपंगांसाठी तीन टक्के आरक्षणाची तरतूद आहे. हे आरक्षण शारीरिक अपंग, दृष्टिहिन आणि मूक-बधीर यांच्यासाठी प्रत्येकी एक टक्का आहे. नव्या विधेयकाच्या मसुद्यात हे आरक्षण दोन टक्क्यांनी वाढवून पाच टक्के करण्याचा प्रस्ताव आहे.अपंगत्वाची व्याख्या अधिक व्यापक करून आरक्षणासाठी पात्र असणाऱ्यांची वर्गवारी सातवरून वाढवून १९ करण्याचेही सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने प्रस्तावित केले आहे. यात काही प्रकारचे मानसिक आजार हेही अपंगत्व मानावे, असे सुचविण्यात आले आहे. विशेष म्हणजे अ‍ॅसिड हल्ल्यामुळे विद्रुपता येणाऱ्या व्यक्तींचाही अपंगामध्ये समावेश करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>दोन मंत्रालयांमध्ये मतभेदविधेयकातील काही तरतुदींवरून सामाजिक न्याय आणि कार्मिक या दोन मंत्रालयांमध्ये मतभेद आहेत. सामाजिक न्याय मंत्रालयाने मानसिक आजार असलेल्या व्यक्तींनाही अपंग मानावे असे प्रस्तावित केले असून त्यात स्क्रिझोफ्रेनिया (दुभंग व्यक्तिमत्व), एपिलेप्सी (अपस्मार) आणि बायपोलर डिस्आॅर्डर (उन्माद) या मानसिक व्याधींचाही समावेश केला आहे. मात्र कार्मिक मंत्रालयाचा यास आक्षेप असून अशा मनोरुग्णांची सरकारी नोकरीसाठी योग्यता व उपयुक्तता कशी ठरवावी, असा त्यांचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे कार्मिक मंत्रालय पंतप्रधानांकडेच आहे. दोन्ही मंत्रालयांनी आपापली मते दिली आहेत. आता त्यावर निवाडा पंतप्रधानांनी करायचा आहे.