शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

आधी समस्यांचे निदान मग उपाय

By admin | Updated: July 29, 2015 03:01 IST

भारतातील संरक्षित व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांची संख्या लवकरात लवकर २५00 पर्यंत वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे. ते साधताना आधी हा संपूर्ण विषय समग्र विचारात घेऊन समस्यांचे निदान होणे गरजेचे आहे.

- खासदार विजय दर्डा(सदस्य, नॅशनल टायगर कन्झर्वेशन कमिटी)

भारतातील संरक्षित व्याघ्र प्रकल्पांमधील वाघांची संख्या लवकरात लवकर २५00 पर्यंत वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे. ते साधताना आधी हा संपूर्ण विषय समग्र विचारात घेऊन समस्यांचे निदान होणे गरजेचे आहे. मगच प्रभावी उपाययोजना शक्य होईल. २0१२ हे वाघांसाठी क्रौैर्याचे वर्ष ठरले. त्यावर्षी ७८ वाघ मारले गेले. सरकारी आणि प्रशासकीय पातळीवर वाघ वाचविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत; पण ते पुरेसे नाहीत. शिकारी अजून थांबलेल्या नाहीत. वाघाच्या शरीराचे भाग अजूनही दक्षिण-पूर्व आशियात सर्रास निर्यात होत आहेत. एकीकडे हे कटु वास्तव अधोरेखित होत असतानाच सगळा दोष जंगलातल्या शिकारी जनजातींच्या माथ्यावर मारून त्यांना विस्थापित करण्याची चर्चा सुरू आहे. त्यांचे विस्थापन नव्हे, तर पुनर्वसन आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर हा संपूर्ण विषय समग्रपणे विचारात घ्यायला हवा. समस्यांचे निदान होत नाही तोवर इलाज अवघड आहे. वाघांच्या शिकारींसाठी आणि त्यांच्या संवर्धनातील अडथळ्यांसाठी फक्त आदिवासी जनजातींना जबाबदार धरणे गैर आहे. जंगलाची खडान्खडा माहिती असलेल्या जनजातींचा शिकारी धूर्तपणाने वापर करून घेत आहेत. लौकिक स्वार्थाचा पुरता स्पर्श न झालेल्या या जनजातींचा वापर वाघांना विषबाधा करण्यापासून त्यांचा माग काढण्यापर्यंत अनेक बाबतीत करून घेतला जातो. त्यांना जंगलातून पूर्णत: विस्थापित करणे अवघड आहे. म्हणूनच वाघांच्या संवर्धन आणि संरक्षणात त्यांना सहभागी करून घेणे अधिक फायद्याचे ठरेल.व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणात राज्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. संरक्षित व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातून हमरस्ते काढले जाणार नाहीत याची कटाक्षाने काळजी घेणे आवश्यक आहे. माणूूस आणि जंगलातील प्राणी यांच्यातील संघर्षाला कमीत कमी वाव ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या सर्व संरक्षित व्याघ्र प्रकल्पांमध्ये योग्य अधिकाऱ्यांची नेमणूक होणे आवश्यक आहे.परदेशातील उद्योगांवर बंदी आणा : वाघाच्या अवयवांवर आधारित औषधी द्रव्ये निर्माण करणारे उद्योग परदेशांमध्ये आहेत. तेथून मागणी आहे, म्हणून येथून पुरवठा होत असतो. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने पुढाकार घेऊन परदेशांमधील अशा उद्योगांवर पूर्णत: बंदी आणण्यासाठी रेटा लावणे अत्यावश्यक आहे. यासाठी समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.