शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

रस्ता नव्हे हा तर राज्याच्या विकासाचा राजमार्ग

By admin | Updated: January 1, 2016 02:07 IST

देशभर भव्य महामार्गांची वेगाने निर्मिती हा केंद्र सरकारचा अग्रक्रम आहे. त्याला अनुसरून तयार होणारा, दिल्ली- डासना- मेरठ एक्स्प्रेस हायवे केवळ रस्ता नव्हे, तर उत्तर प्रदेशच्या

- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीदेशभर भव्य महामार्गांची वेगाने निर्मिती हा केंद्र सरकारचा अग्रक्रम आहे. त्याला अनुसरून तयार होणारा, दिल्ली- डासना- मेरठ एक्स्प्रेस हायवे केवळ रस्ता नव्हे, तर उत्तर प्रदेशच्या विकासाचा राजमार्ग ठरणार आहे. कालांतराने हा राजमार्ग लखनौपर्यंत पुढे नेण्यात येईल. महामार्गापासून १00 कि.मी.च्या व्यासात जितकी गावे आणि शहरे येतील, विकासाची तुफान घोडदौड तिथे सुरू होईल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.दिल्ली-मेरठ या ७४ कि.मी. अंतराच्या १४ लेन एक्स्प्रेस हायवेच्या शिलान्यासप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. नोएडा सेक्टर ६२ मध्ये आयोजित या भव्य सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक परिवहनमंत्री नितीन गडकरींनी केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासह मोदी मंत्रिमंडळातले अनेक मंत्री कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. वर्षअखेरीला दिल्ली, गाझियाबाद, नोएडा व मेरठवासीयांना या विस्तीर्ण महामार्गाची अपूर्व भेट मोदी सरकारने दिली. अडीच वर्षांत हा महामार्ग तयार झाल्यानंतर, ज्या दिल्ली, मेरठ अंतरासाठी सध्या ३ तास प्रवास करावा लागतो ते अंतर अवघ्या ४0 मिनिटांत पार करता येईल. शिलान्यास सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत वाजपेयींच्या स्वप्नांचे स्मरण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला जागतिक स्तरावर नेण्याचे स्वप्न पंतप्रधान असताना वाजपेयींनी पाहिले. चार महानगरांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोन, भारताच्या उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम सीमा जोडणारे भव्य कॉरिडॉर्स निर्माण करण्याचे काम त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाले. ग्रामीण भारतातल्या गावांचीही वाजपेयींना चिंता आहे. मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणारे रस्ते तयार करण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना त्यांनी सुरू केली. त्यानंतर दहा वर्षांत काय झाले आणि काय नाही, याचा हिशेब सांगण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की, वाजपेयींच्या स्वप्नांना गती देण्याचे काम आता माझ्या सरकारने सुरू केले आहे. त्यात सर्वाधिक प्राधान्य पायाभूत सुविधांचा विकास आणि महामार्गांच्या निर्मितीला आम्ही दिले आहे. दिल्ली, मेरठ १४ लेन एक्स्प्रेस हायवेच्या शिलान्यासाच्या निमित्ताने भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरींनी उत्तर प्रदेशसह साऱ्या देशाला सुखद धक्का देणाऱ्या अनेक घोषणा आपल्या प्रास्ताविकात केल्या.रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा सरकारचा निर्णयअतिवृष्टीनंतरच्या महापुरात या राज्यातली काही गावे आणि बद्रिनाथ केदारनाथपर्यंतचा बहुतांश रस्ता वाहून गेला होता.परिवहन मंत्रालयाने आता दिल्लीपासून बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमनोत्रीपर्यंतच्या एक हजार कि.मी.च्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.या क्षेत्रात वारंवार होणाऱ्या भूस्खलनाचा धोका यापुढे उद्भवणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याची ग्वाही गडकरींनी दिली. वाहतूक कोंडीच्या समस्येतून राजधानी दिल्लीची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ व २४ चे १४ लेनपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे, अशी घोषणाही यावेळी गडकरींनी केली. शिलान्यास सोहळा व त्यानंतरच्या जाहीर सभेसाठी सुमारे ५0 हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता.