शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता नव्हे हा तर राज्याच्या विकासाचा राजमार्ग

By admin | Updated: January 1, 2016 02:07 IST

देशभर भव्य महामार्गांची वेगाने निर्मिती हा केंद्र सरकारचा अग्रक्रम आहे. त्याला अनुसरून तयार होणारा, दिल्ली- डासना- मेरठ एक्स्प्रेस हायवे केवळ रस्ता नव्हे, तर उत्तर प्रदेशच्या

- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीदेशभर भव्य महामार्गांची वेगाने निर्मिती हा केंद्र सरकारचा अग्रक्रम आहे. त्याला अनुसरून तयार होणारा, दिल्ली- डासना- मेरठ एक्स्प्रेस हायवे केवळ रस्ता नव्हे, तर उत्तर प्रदेशच्या विकासाचा राजमार्ग ठरणार आहे. कालांतराने हा राजमार्ग लखनौपर्यंत पुढे नेण्यात येईल. महामार्गापासून १00 कि.मी.च्या व्यासात जितकी गावे आणि शहरे येतील, विकासाची तुफान घोडदौड तिथे सुरू होईल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.दिल्ली-मेरठ या ७४ कि.मी. अंतराच्या १४ लेन एक्स्प्रेस हायवेच्या शिलान्यासप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. नोएडा सेक्टर ६२ मध्ये आयोजित या भव्य सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक परिवहनमंत्री नितीन गडकरींनी केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासह मोदी मंत्रिमंडळातले अनेक मंत्री कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. वर्षअखेरीला दिल्ली, गाझियाबाद, नोएडा व मेरठवासीयांना या विस्तीर्ण महामार्गाची अपूर्व भेट मोदी सरकारने दिली. अडीच वर्षांत हा महामार्ग तयार झाल्यानंतर, ज्या दिल्ली, मेरठ अंतरासाठी सध्या ३ तास प्रवास करावा लागतो ते अंतर अवघ्या ४0 मिनिटांत पार करता येईल. शिलान्यास सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत वाजपेयींच्या स्वप्नांचे स्मरण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला जागतिक स्तरावर नेण्याचे स्वप्न पंतप्रधान असताना वाजपेयींनी पाहिले. चार महानगरांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोन, भारताच्या उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम सीमा जोडणारे भव्य कॉरिडॉर्स निर्माण करण्याचे काम त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाले. ग्रामीण भारतातल्या गावांचीही वाजपेयींना चिंता आहे. मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणारे रस्ते तयार करण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना त्यांनी सुरू केली. त्यानंतर दहा वर्षांत काय झाले आणि काय नाही, याचा हिशेब सांगण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की, वाजपेयींच्या स्वप्नांना गती देण्याचे काम आता माझ्या सरकारने सुरू केले आहे. त्यात सर्वाधिक प्राधान्य पायाभूत सुविधांचा विकास आणि महामार्गांच्या निर्मितीला आम्ही दिले आहे. दिल्ली, मेरठ १४ लेन एक्स्प्रेस हायवेच्या शिलान्यासाच्या निमित्ताने भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरींनी उत्तर प्रदेशसह साऱ्या देशाला सुखद धक्का देणाऱ्या अनेक घोषणा आपल्या प्रास्ताविकात केल्या.रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा सरकारचा निर्णयअतिवृष्टीनंतरच्या महापुरात या राज्यातली काही गावे आणि बद्रिनाथ केदारनाथपर्यंतचा बहुतांश रस्ता वाहून गेला होता.परिवहन मंत्रालयाने आता दिल्लीपासून बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमनोत्रीपर्यंतच्या एक हजार कि.मी.च्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.या क्षेत्रात वारंवार होणाऱ्या भूस्खलनाचा धोका यापुढे उद्भवणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याची ग्वाही गडकरींनी दिली. वाहतूक कोंडीच्या समस्येतून राजधानी दिल्लीची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ व २४ चे १४ लेनपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे, अशी घोषणाही यावेळी गडकरींनी केली. शिलान्यास सोहळा व त्यानंतरच्या जाहीर सभेसाठी सुमारे ५0 हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता.