शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

कोणीही आम्हाला देशभक्ती शिकवू नका - पंतप्रधान

By admin | Updated: March 9, 2015 16:19 IST

आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला लगावत देशाची एकात्मता व अखंडतेबाबत कोणतीही तडजोड आम्हाला मान्य नसल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ -  देशाची एकात्मता व अखंडतेबाबत आम्हाला कोणतीही तडजोड मान्य नाही,आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवायची गरज नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला. मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारने केंद्र सरकारशी कोणतही चर्चा केलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आलमच्या सुटकेबाबतचा आक्रोश हा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व देशाचा असून असून यात पक्षीय राजकारण नको असेही त्यांनी सुनावले.
फुटीरतवादी नेता मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात विरोधकांनी लोकसभेत गदारोळ माजवल्यानंतर याच मुद्यावर लोकसभेत स्पष्टीकरण देताना त्यांनी देशाच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही असे स्पष्ट केले. फुटीरतावादी व दहशातवादाविरोधात लढा देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत याप्रकरणी योग्य ती पावले उचलू असे आश्वासनही त्यांनी दिले.
मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत जम्मू-काश्मीर सरकारने केंद्र सरकारशी कुठलीही चर्चा केलेली नाही असे सांगत काश्मीरमधील घटनांबद्दल आम्ही अनभिज्ञ असल्याचेही ते म्हणाले. 
मसरत आलमच्या सुटकेबाबत पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत गदारोळ माजवला होता. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मसरत आलमचीही शनिवारी सुटका करण्यात आली आहे. २०१० मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्याने सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका सुरू आहे.