शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

नितीन गडकरी आधुनिक श्रावणबाळ, नरेंद्र मोदींची स्तुतीसुमनं

By admin | Updated: December 27, 2016 14:25 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळत आधुनिक श्रावणबाळ असा उल्लेख केला आहे

ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळत आधुनिक श्रावणबाळ असा उल्लेख केला आहे. 'जुन्या काळात आई-वडिलांना यात्रेसाठी घेऊन जाणा-या श्रावणबाळाची ज्याप्रमाणे आठवण काढली जायची. त्याप्रमाणे आधुनिक काळात केदारनाथ, बद्रिनाथची यात्रा सुखरुप होईल तेव्हा लोक सरकार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरींची आठवण काढतील', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. उत्तराखंडमधील परिवर्तन रॅलीत ते बोलत होते. 
 
'चारधामसाठी बांधण्यात येणा-या रस्त्यांमुळे तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल', असंही नरेंद्र मोदी बोलले आहेत. 'घाईघाईने बनवण्यात आलेल्या योजना तात्पुरता राजकीय फायदा मिळवून देऊ शकतात, पण त्याला मर्यादा असते. विनाकारण दगडं ठेवली तर योजना तयार होणार का ?', असा टोलाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला आहे. 
 
(गडकरींमध्ये स्वप्नातलं जग सत्यात उतरवण्याची क्षमता - विजय दर्डा)
 
'लोकांनी मी काहीतरी करत राहावं यासाठी मला पंतप्रधान केलं आहे. लोकांनी मला सुरक्षारक्षकाचं काम दिलं आहे. मी माझं काम करत आहे तर काहींना त्याचा त्रास होत आहे. हा सुरक्षारक्षक तर सरळ चोरांच्या प्रमुखावरच हल्ला करत असल्याने ते चिंतेत असल्याचं', मोदी बोलले आहेत. ओरओपीवर बोलताना जवानांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजे यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून आग्रही होतो असं सांगितलं आहे.
 
'नोटाबंदी करुन आम्ही अनेकांना उघडं पाडलं, पण काही लोकांच्या रक्तातच भ्रष्टाचार घुसला आहे. त्यांनी मागून पैसे बदलण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यावरही उपाय केले होते. नोटाबंदी ही स्वच्छता मोहीम आहे. जोपर्यंत देशवासियांचा सुरक्षाकवच आहे, तोपर्यंत कोणी माझ्याकडे बोट दाखवू शकणार नाही', असं मोदी बोलले आहेत. 'उत्तराखडंला खड्ड्यातून बाहेर काढायचं असेल तर दोन इंजिन लावावे लागणार आहेत, एक दिल्लीचं दुसरं उत्तराखंडचं'. असं सांगत मोदींनी भाजपा सरकार निवडून देण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.